शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

नगराध्यक्षांसह कणकवली नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल उद्या संपणार, समारोपाच्या सभेत सर्वजण झाले भावूक

By सुधीर राणे | Updated: May 4, 2023 16:07 IST

कणकवली नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट लागणार

कणकवली: कणकवली नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाल ५ मे रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी नगरपंचायतीच्या प.पू.भालचंद्र महाराज सभागृहात विशेष सभा झाली. समारोपाच्या या सभेत सर्वच नगरसेवकांबरोबरच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षही भावूक झाले. गत आठवणींना उजाळा देताना नगराध्यक्ष समीर नलावडे यांना अश्रू अनावर झाले. उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत घडलेल्या काही घटना तसेच कटू प्रसंगांबद्दल एकमेकांची माफी मागितली.तसेच दिलगिरीही व्यक्त केली. मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या उपस्थितीत ही सभा झाली. यावेळी मनोगत व्यक्त करताना कणकवलीच्या विकासासाठी जनतेने ठरविले तर नगरपंचायत मध्ये 'मी पुन्हा येईन' असे उदगार नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी काढले. सर्वांच्या सहकार्यामुळेच चांगले काम करून जनतेचे प्रश्न सोडवत नगराध्यक्ष पदाला आपण न्याय  देवू शकलो. आजचा आनंदाचा आणि दुःखाचाही दिवस आहे. यापुढे निवडणुका येतील  आणि जातीलही. मात्र, जनसेवा करण्यासाठी आपण यापुढेही तत्पर राहणार आहोत. आता खुर्चीवरून पाय उतार होत असलो तरी पुढील निवडणूक होईपर्यंत प्रशासकीय राजवट लागणार असून शहराचे काय होईल? याची चिंता वाटते. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत  ५० कोटी ६० लाखांचा निधी आम्ही शहरासाठी आणला. राज्यात आमची सत्ता नसतानाही तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी आम्हाला मदत केली. आमदार वैभव नाईक माझे मित्र आहेत त्यांनीही मदत केली.अशी अनेकांची मदत आम्हाला लाभली आहे.कोविड काळात अगदी जीवावर उदार होऊन कणकवलीत विविध उपक्रम राबविले. वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे कणकवली नगरपंचायतीचा राज्यात प्रथम क्रमांक आला. विरोधी नगरसेवकांबरोबर मतभेद होते. पण मनभेद कधीही ठेवला नाही. त्यामुळे त्यांच्या प्रभागातील विकासकामेही केली असेही ते म्हणाले.अबीद नाईक म्हणाले, राजकारणापेक्षा समाजकारण करण्याकडे माझा कल राहिला आहे.  समीर नलावडे यांनी जबरदस्तीने मला नगरसेवक पदाच्या निवडणुकीला उभे केले. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असतानाच नगरसेवक पदाच्या माध्यमातून जनसेवेला प्राधान्य दिले. यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका मेघा सावंत, मेघा गांगण, शिशिर परुळेकर, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, अभिजित मुसळे, विराज भोसले, संजय कामतेकर, कन्हैया पारकर, सुशांत नाईक आदी नगरसेवकांनीही मनोगत व्यक्त केले. विरोधी नगरसेवक स्ट्रॉंग असल्यानेच चांगली कामे!कणकवली नगरपंचायत मध्ये विरोधी नगरसेवकांची जबाबदारी आम्ही पूर्ण क्षमतेने निभावली आहे.विरोधी नगरसेवक स्ट्रॉंग असल्यानेच शहरात चांगली कामे झाली आहेत. मात्र, जुन्या भाजीमार्केट जवळील स्वच्छता गृहासाठी ८६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ते कशासाठी? याचे उत्तर जनतेला मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ए.जी.डॉटर्सचा प्रकल्प,शहराचा डीपी प्लॅन याबाबतही पुढे काय झाले?ते जनतेला सत्ताधाऱ्यानी सांगावे.असे यावेळी सुशांत नाईक म्हणाले.तर कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर यांनी या मुद्द्यांना दुजोरा दिला. 

तुम्ही कायम विरोधकच राहा!शहरात झालेली विकासकामे ही तुम्ही सक्षम विरोधक असल्यानेच चांगली झाली,असे तुमचे म्हणणे आहे. तसे असेल तर पुढील कालावधीतही तुम्ही नगरपंचायतीत विरोधकच राहा.असा टोला उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी विरोधी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर यांना लगावला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली