शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

नगराध्यक्षांसह कणकवली नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल उद्या संपणार, समारोपाच्या सभेत सर्वजण झाले भावूक

By सुधीर राणे | Updated: May 4, 2023 16:07 IST

कणकवली नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट लागणार

कणकवली: कणकवली नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाल ५ मे रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी नगरपंचायतीच्या प.पू.भालचंद्र महाराज सभागृहात विशेष सभा झाली. समारोपाच्या या सभेत सर्वच नगरसेवकांबरोबरच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षही भावूक झाले. गत आठवणींना उजाळा देताना नगराध्यक्ष समीर नलावडे यांना अश्रू अनावर झाले. उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत घडलेल्या काही घटना तसेच कटू प्रसंगांबद्दल एकमेकांची माफी मागितली.तसेच दिलगिरीही व्यक्त केली. मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या उपस्थितीत ही सभा झाली. यावेळी मनोगत व्यक्त करताना कणकवलीच्या विकासासाठी जनतेने ठरविले तर नगरपंचायत मध्ये 'मी पुन्हा येईन' असे उदगार नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी काढले. सर्वांच्या सहकार्यामुळेच चांगले काम करून जनतेचे प्रश्न सोडवत नगराध्यक्ष पदाला आपण न्याय  देवू शकलो. आजचा आनंदाचा आणि दुःखाचाही दिवस आहे. यापुढे निवडणुका येतील  आणि जातीलही. मात्र, जनसेवा करण्यासाठी आपण यापुढेही तत्पर राहणार आहोत. आता खुर्चीवरून पाय उतार होत असलो तरी पुढील निवडणूक होईपर्यंत प्रशासकीय राजवट लागणार असून शहराचे काय होईल? याची चिंता वाटते. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत  ५० कोटी ६० लाखांचा निधी आम्ही शहरासाठी आणला. राज्यात आमची सत्ता नसतानाही तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी आम्हाला मदत केली. आमदार वैभव नाईक माझे मित्र आहेत त्यांनीही मदत केली.अशी अनेकांची मदत आम्हाला लाभली आहे.कोविड काळात अगदी जीवावर उदार होऊन कणकवलीत विविध उपक्रम राबविले. वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे कणकवली नगरपंचायतीचा राज्यात प्रथम क्रमांक आला. विरोधी नगरसेवकांबरोबर मतभेद होते. पण मनभेद कधीही ठेवला नाही. त्यामुळे त्यांच्या प्रभागातील विकासकामेही केली असेही ते म्हणाले.अबीद नाईक म्हणाले, राजकारणापेक्षा समाजकारण करण्याकडे माझा कल राहिला आहे.  समीर नलावडे यांनी जबरदस्तीने मला नगरसेवक पदाच्या निवडणुकीला उभे केले. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असतानाच नगरसेवक पदाच्या माध्यमातून जनसेवेला प्राधान्य दिले. यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका मेघा सावंत, मेघा गांगण, शिशिर परुळेकर, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, अभिजित मुसळे, विराज भोसले, संजय कामतेकर, कन्हैया पारकर, सुशांत नाईक आदी नगरसेवकांनीही मनोगत व्यक्त केले. विरोधी नगरसेवक स्ट्रॉंग असल्यानेच चांगली कामे!कणकवली नगरपंचायत मध्ये विरोधी नगरसेवकांची जबाबदारी आम्ही पूर्ण क्षमतेने निभावली आहे.विरोधी नगरसेवक स्ट्रॉंग असल्यानेच शहरात चांगली कामे झाली आहेत. मात्र, जुन्या भाजीमार्केट जवळील स्वच्छता गृहासाठी ८६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ते कशासाठी? याचे उत्तर जनतेला मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ए.जी.डॉटर्सचा प्रकल्प,शहराचा डीपी प्लॅन याबाबतही पुढे काय झाले?ते जनतेला सत्ताधाऱ्यानी सांगावे.असे यावेळी सुशांत नाईक म्हणाले.तर कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर यांनी या मुद्द्यांना दुजोरा दिला. 

तुम्ही कायम विरोधकच राहा!शहरात झालेली विकासकामे ही तुम्ही सक्षम विरोधक असल्यानेच चांगली झाली,असे तुमचे म्हणणे आहे. तसे असेल तर पुढील कालावधीतही तुम्ही नगरपंचायतीत विरोधकच राहा.असा टोला उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी विरोधी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर यांना लगावला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली