शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

व्यवस्थेतील परिवर्तन सामान्य जनतेपर्यंत पोचण्याची गरज - माधव भांडारी

By सुधीर राणे | Updated: September 26, 2022 14:02 IST

भारत देश आज जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे सगळे बदल व्यवस्था परिवर्तनामुळे आलेले आहेत.

कणकवली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात व्यवस्था परिवर्तनाचे पर्व सुरू आहे. व्यवस्था परिवर्तन ही केवळ एका रात्रीत घडणारी गोष्ट नसून त्यासाठी मोठे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी मोठी हिम्मत लागते. या सगळ्या बाबी नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वात आहेत. व्यवस्थेतील हे सकारात्मक बदल जाणीवपूर्वक जनतेपर्यंत जायला हवेत असे प्रतिपादन भाजप प्रदेशचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी यावेळी केले.भाजपच्या 'सेवा पंधरवडा' या अभियानांतर्गत कणकवली येथील बुद्धिजीवी व्यक्तींच्या संमेलनात 'व्यवस्था परिवर्तनाची २० वर्षे' या विषयावर ते बोलत होते. यावेळी संपूर्ण जिल्हाभरातून डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर, सी.ए., प्राध्यापक, शिक्षक असा प्रज्ञावंत परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.माधव भांडारी म्हणाले, काही वर्षांपूर्वी कागदपत्र 'ट्रू कॉपी' म्हणजे अटेस्टेड करण्याची 'व्यवस्था' होती. काही ठिकाणी यासाठी किंमतही मोजावी लागत होती. त्याचा त्रास सहन केलेली आपली पिढी आहे. आता ही व्यवस्था बदलून 'सेल्फ अटेस्टशन' पद्धत आली. हा खूप मोठा दिलासादायक बदल आहे. पण याची कधी चर्चा झाली नाही. त्यामुळे या नवीन व्यवस्थेचे महत्व लोकांच्या लक्षात आले नाही. काही वर्षांपूर्वी इतर विकसित देशांकडून अवहेलना सहन करणारा आपला भारत देश आज जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे सगळे बदल व्यवस्था परिवर्तनामुळे आलेले आहेत.नरेंद्र मोदी मुख्यमंत्री पदाची १२ वर्षे आणि पंतप्रधान पदाची ८ वर्षे अशा २० वर्षाच्या वाटचालीचा आढावा 'मोदी@२०' या पुस्तकात आहे. अनेक मान्यवरांनी त्यात मोदी आणि त्यांच्या कार्यशैलीवर लिहिलेले आहे. देशातल्या डिजिटल क्रांतीने तर अनेक देशांना मागे टाकलेले आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सेवा पंधरवडा या विषयावर  मनोगत व्यक्त केले. संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रसन्ना देसाई यांनी आभार मानले. यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे,शरद चव्हाण, उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी