शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच वैद्यकीय महाविद्यालयाला दंड, परशुराम उपरकर यांचा आरोप

By सुधीर राणे | Updated: July 19, 2024 16:06 IST

कणकवली:राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने राज्यामधील काही वैद्यकीय महाविद्यालयांना दंड केला आहे. त्यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश ...

कणकवली:राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने राज्यामधील काही वैद्यकीयमहाविद्यालयांना दंड केला आहे. त्यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश असून बारा लाखांचा दंड झाला आहे. हा दंड सत्ताधाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे केलेल्या दुर्लक्षामुळेच झाला असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. कणकवली येथील संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे सत्ताधाऱ्यांनी ज्यावेळी जाहीर केले. त्यावेळी त्या महाविद्यालयाला आवश्यक असणारी जागा, यंत्र सामग्री आदी बाबींची पूर्तता केल्यानंतरच ते सुरू करा अशी मागणी आम्ही केली होती. परंतु महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ.एस. एस. मोरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या नादाला लागून प्रतिज्ञापत्र करून आम्ही सर्व  निकष पूर्ण करतो असे सांगितले होते. मात्र, अद्याप पर्यंत त्याची पूर्तता झालेली नाही. या महाविद्यालयाचे हे तिसरे वर्ष  असून वैद्यकीय शिक्षकांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने शिक्षण मिळत नाही. तसेच वैद्यकीय शिक्षक नसल्याने ते महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण मंडळाकडे दिले आहे.  असे असतानाही त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याने बाह्यरुग्ण विभागातील १० रुग्ण तपासणे गरजेचे आहे.मात्र, सुविधाअभावी बाह्यरुग्ण विभागात रुग्णच नसतात, असे उपरकर यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयाला आवश्यक असणारी नियमाप्रमाणे २१ एकर जागा उपलब्ध नाही. फक्त नऊ एकर जिल्हा रुग्णालयाच्या जागेमध्येच हे महाविद्यालय  सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान सत्ताधारी लोकप्रतिनिधी करत आहेत. त्या महाविद्यालयाच्या वैद्यकीय शिक्षक भरती बद्दल विचारणा केली असता त्यांनी एमपीएससीच्या माध्यमातून जाहिरात दिली आहे .परंतु या महाविद्यालयामध्ये येण्यास कोणीही इच्छुक नसल्याचे सांगितले. परंतु या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ शिक्षक कसे आणता येतील यासाठी सत्ताधाऱ्यांनी कोणते प्रयत्न केले? असा सवालही उपरकर यांनी उपस्थित केला.राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. परंतु त्यांच्याजवळ पैसेच नसल्याचे जिल्हा नियोजन समीतीच्या सभेमधून समोर आले आहे. २०० कोटी रुपयांचा आराखडा करून फक्त ८३ कोटी रुपये येतात. तरीही राज्य सरकार विविध घोषणा करत आहे. या घोषणांचा एक भाग म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी तळेरे- विजयदुर्ग रस्ता काँक्रिटीकरण करणार असे सांगितले होते. त्याचे भूमिपूजनही झाले होते. मात्र, त्या कामास अद्यापही सुरुवात केलेली नाही असेही उपरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयParshuram Upkarपरशुराम उपरकर