शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम सुजाण मतदारांचे, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेंचे मत

By अनंत खं.जाधव | Updated: September 5, 2023 17:38 IST

सावंतवाडीत लोकशाही जीवन प्रणाली व शिक्षण यावर परिसंवाद 

सावंतवाडी : भारताच्या लोकशाही समोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत, परंतु भारतीय लोकशाही अधिक प्रौढ झाली. स्वातंत्र्यानंतर भारतीय लोकशाही तोडण्याचे काम अनेक वेळा झाले. परंतु लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम येथील सुजाण मतदारांनी केले आहे. सुजाण मतदार हे भारतीय लोकशाहीचे मर्मस्थान, बलस्थान आहे असे मत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मांडले.राज्य निवडणूक आयोग, भोसले नॉलेज सिटी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यावतीने आज, मंगळवारी भोसले नॉलेज सिटी येथे लोकशाही जीवन प्रणाली आणि शिक्षण या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देशपांडे बोलत होते.देशपांडे म्हणाले, भारतीय लोकशाहीचा विचार करता अजून काही घटक परीघाबाहेर आहेत त्यांना लोकशाही प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे. आज भारतात तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तरुण मतदार 5.5% आहेत त्यापैकी 0.68% इतक्याच तरुण मतदारांचे नाव मतदार यादीत आहे हे चित्र बदलले पाहिजे.मतदानाप्रती असलेली उदासीनता ही चिंतेची बाब आहे. युवा मतदारांना लोकशाही प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे त्यांनी जास्तीत जास्त मतदान केले पाहिजे. या संदर्भात लोकशिक्षण महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही लोकशाही गप्पाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.प्रकाश परब म्हणाले, सध्या समाजाची दोन विभागात विभागणी झाली आहे. आभाषी  समाज आणि डिजिटल समाज अशी ही विभागणी आहे. सोशल मीडियाने जग व्यापले आहे. अशा परिस्थितीत लोकशाही समोर आव्हान निर्माण झाले आहे. त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. लोकसहभाग हा लोकशाहीचा आत्मा आहे असे परब यांनी स्पष्ट केले.अभिनेत्री संपदा जोगळेकर यांनी आपण शेती क्षेत्रात उतरलो रसायनमुक्त अन्नधान्य मिळणे या पुढच्या काळात महत्त्वाचे आहे भविष्यात अन्नाचे दुर्भक्ष जाणवणार आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वतः पुरते का होईना शेती केली पाहिजे कोरोनाचे संकट येईल असे दहा वर्षापूर्वी कोणाला वाटले नव्हते परंतु ते आले हीच बाब अन्नाच्या दुर्लक्षा बाबत होणार आहे असे सांगितले.या परिसंवादामध्ये भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब, अभिनेत्री संपदा जोगळेकर, प्राचार्य शमशुद्दीन नसीरुद्दीन आत्तार, सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर, छायाचित्रकार इंद्रजीत खांबे, मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार  जुईली पांगम, मोहम्मद शेख, प्रसाद गावडे, पंकज दळवी, हसन खान हे युवा प्रतिनिध सहभागी झाले होते.तर जिल्हाधिकारी किशोर तावडे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर तहसीलदार श्रीधर पाटील भोसले नॉलेज सिटी चे अच्युत सावंत भोसले यावेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गdemocracyलोकशाहीElectionनिवडणूकVotingमतदान