शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

बेपत्ता अक्षयचा मृतदेह माडखोल धरणात सापडला, चिठ्ठीत मुंबईतील एका पोलीस उपनिरीक्षकासह नऊ जणांची नावे

By अनंत खं.जाधव | Updated: September 5, 2024 17:20 IST

इंजिनियर असलेल्या अक्षय साईल हा मंगळवारपासून बेपत्ता होता

सावंतवाडी : गाडीच्या अपघातानंतर सतत पैशांसाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून कोलगाव भोमवाडी येथील अक्षय जनार्दन साईल (वय २८) या युवकाने माडखोल धरणात आत्महत्या केल्याचे गुरूवारी उघडकीस झाले. अक्षय मंगळवार पासून बेपत्ता होता. त्याची दुचाकी, चप्पल हे माडखोल धरण परिसरात आढळून आल्याने त्याचा शोध घेण्यात येत होता. अखेर त्याचा मृतदेह आज आढळून आला.दरम्यान या आत्महत्येच्या प्रकारानंतर कोलगाव ग्रामस्थ आक्रमक झाले असून अक्षयच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या व चिठ्ठीत उल्लेख असलेल्या संशयितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचा काम सुरू होते.कोलगाव येथील व्यवसायाने इंजिनियर असलेल्या अक्षय साईल हा मंगळवारपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबाने पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडून शोध सुरू होता. त्यातच अक्षयची दुचाकी चप्पल हे माडखोल धरण परिसरात आढळून आले. त्याने बेपत्ता होण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. अखेर अक्षयचा मृतदेह सापडल्यानंतर सर्वच गोष्टीचा उलगडा झाला.धमकी देणाऱ्यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश अक्षयची आत्महत्या गाडीच्या अपघातानंतर व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून झाल्याचे पुढे आले आहे. आपल्याला ब्लॅकमेलिंग व मारहाण केल्यामुळे आपला जीवन प्रवास संपवत आहे. असे सांगून तब्बल ९ जणांच्या नावाचा उल्लेख या चिठ्ठीत केला आहे. यातील काहि जण कोलगाव येथील तर ५ जण तर मुंबईमधील ४ असा त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्याला धमकी देणाऱ्यामध्ये मुंबईतील एका पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. या सर्व प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर कोलगाव सरपंच संतोष राऊळ व अन्य ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत सावंतवाडी पोलीस ठाणे गाठले. यावेळी माजी आमदार राजन तेली हे ही उपस्थित होते. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार  हा सर्व प्रकार गाडीचा अपघात झाल्याच्या कारणावरून घडला आहे. मुंबईतील एका व्यक्तीची गाडी अन्य एकाला भाड्याला देण्यात आली होती. त्यात अक्षयाने मध्यस्थी केली होती. मात्र त्या गाडीचा अपघात झाला. त्यानंतर गाडीचा विमा देण्यासाठी विमा कंपनीने नकार दिला. त्यामुळे यातील तब्बल साडेआठ लाख रुपये हे अक्षय याच्याकडून वसूल करण्यासाठी तगादा लावण्यात आला होता. त्यातील तीन लाख रुपये घेण्यात आले. अन्य रक्कम ही देण्यासाठी त्याच्यावर जबरदस्ती करण्यात आली तसेच त्याला ब्लॅकमेलिंग करण्यात आले. या सर्व प्रकारानंतर अक्षयने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. स्टेटसवर चिठ्ठी, मित्रांना शेवटचे हायअक्षयने  झालेल्या मारहाणी नंतर नैराश्यातून चिठ्ठी लिहिली आणि संशयितांना व्हाट्सअपच्या माध्यमातून त्यांनी ही चिठ्ठी पाठवली व काही मित्रांना शेवटचे “हाय” असा मॅसेज टाकून आपल्या मोबाईलवर संशयितांचे फोटो आणि त्यांनी केलेले चॅटिंग स्टेटसवर ठेवले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस