शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पंधरा वर्षात काय विकास केला तो जनतेला सांगा, राजन तेलींचे दीपक केसरकरांना खुले आव्हान

By अनंत खं.जाधव | Updated: July 22, 2024 17:59 IST

'हिम्मत असेल तर आमने-सामने या' 

सावंतवाडी : जिल्ह्याचा विकास करण्यासाठी संपत्ती विकणार अशी भाषा करणाऱ्या मंत्री दीपक केसरकर यांनी हिम्मत असेल तर चर्चासत्राच्या माध्यमातून आमने सामने यावे आणि पंधरा वर्षात जिल्हयाचे किंबहूना मतदारसंघाचे काय भलं केलं हे लोकांसमोर मांडावे असे खुले आव्हान माजी आमदार राजन तेली यांनी दिले. शिक्षण खात्यामध्ये निर्विदा न काढताच तब्बल ८० कोटी रुपयांची कामे वाटण्यात आली असून पुजा खेडेकर प्रकरणातही मंत्री केसरकर यांचा संबध असल्याचे वृत्त खासगी वाहिन्यावर प्रसारित करण्यात आले आहे असा दावा ही तेली यांनी केला.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तेली म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर नवनवीन घोषणा करायच्या हा जुनाच धंदा आहे. पंधरा वर्षांमध्ये केवळ येथील जनतेला फसवण्याचे काम केले आहे. पंचतारांकितच्या घोषणा केसरकर करत आहेत, परंतु स्वतःच्या घरासमोरील एसटी बस स्थानक साडेसात वर्ष होऊनही ते सुधारू शकले नाहीत ही शोकांतिका आहे. रेडी येथे सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत ते बोलत आहेत तसेच पंचतारांकित ताज हॉटेलही दोन महिन्यात सुरु होणार असल्याचे ते म्हणत आहेत. या ठिकाणी उद्योग व्यवसाय यायलाच पाहिजे त्याबाबत आमचा विरोध नाही. परंतु उद्योग येताना स्थानिकांना तिकडून विस्थापित करू नये ही आमची भूमिका आहे. त्यामुळे उद्या तुम्ही कुठल्याही नेत्यांना बोलवा परंतु त्या नेत्यांनी आधी जनतेचे प्रश्न ऐकून घ्यावे लागतील अशी माझी विनंती आहे.पक्ष तिकीट देईल की नाही ही दूरची गोष्ट, परंतु..रेडी येथे कुठल्याही प्रकारची जमीन नसताना शेवटची घोषणा ते करत आहे.निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे गोड बोलून इथल्या जनतेची आणि तरुण पिढीची फसवणूक करण्याची संधी मी केसरकर यांना देणार नाही पक्ष मला तिकीट देईल की नाही ही दूरची गोष्ट आहे. परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये गावागावात जाऊन केसरकर यांच्या आश्वासनांचा त्यांनी केलेल्या घोषणांचा बुरखा मी फाडणार आहे.हिम्मत असेल तर आमने-सामने या मंत्री केसरकर प्रॉपर्टी विकण्याची भाषा पुन्हा एकदा करू लागले आहेत. परंतु गेल्या पंधरा वर्षात आमदारकी मंत्रीपद बघून ज्यांना काही करता आले नाही ते आता पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी सज्जनतेची भाषा करत आहेत. परंतु विकास बाजूला ठेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक तरी असा विकास सांगा की जो तुम्ही केलात आणि त्यातून तुम्ही इथल्या पाच-दहा तरुणांना रोजगार देऊ शकला. त्यामुळे हिम्मत असेल तर चर्चासत्राच्या माध्यमातून आमने सामने या असे आव्हानही तेली यांनी दिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली Deepak Kesarkarदीपक केसरकर