शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

भविष्यात भाजपमधून हकालपट्टी होणाऱ्या तेली यांनी राणें विषयी बोलू नये : सतीश सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 16:43 IST

भाजप मधून भविष्यात हकालपट्टी होणाऱ्या राजन तेली यांनी नारायण राणें विषयी काही बोलू नये, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देभविष्यात भाजपमधून हकालपट्टी होणाऱ्या तेली यांनी राणें विषयी बोलू नये  कणकवली येथे पत्रकार परिषदेत सतीश सावंत यांचा टोला

कणकवली : स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकलेल्या राजन तेली यांना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा हे सांगण्याचा अधिकार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपची युती झाल्यास तेली बंडखोरी करून आमदारकी लढवतील. त्यामुळे भाजप मधून भविष्यात हकालपट्टी होणाऱ्या राजन तेली यांनी नारायण राणें विषयी काही बोलू नये, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे.कणकवली येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आनंद ठाकुर उपस्थित होते.सतीश सावंत पुढे म्हणाले, नारायण राणेंवर टिका करणाऱ्या राजन तेली यांनी आपले भाजप पक्षा मधील वय किती ते आधी सांगावे. सन 2014 मध्ये एका रात्रीत त्यांचा स्वाभिमान काय असतो ते जनतेने पाहिले आहे. त्यामुळे त्याना राणेंवर टिका करण्याचा नैतिक अधिकार नाही.

राज्यात तसेच देशात सध्या असलेल्या वस्तुस्थितिला धरूनच नारायण राणे बोलत आहेत. जनतेला होणारा त्रास ते आपल्या भाषणातून मांडत आहेत. त्यामुळे राणेना काही सांगायचेच असेल तर भाजप मधील वरिष्ठ काय ते सांगतील. त्याची काळजी तेली यानी करु नये.आमदारकीवर डोळा ठेवून राजन तेली यांनी टिका करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवू नये. नारायण राणे यांनी 14 वर्षात काय केले ? असा प्रश्न राजन तेली विचारत आहेत. मात्र, या काळात त्यानी इतर काम काय केले यापेक्षा राजन तेली यानाच सर्वार्थाने प्रथम उभे करायचे काम केले एवढे मात्र निश्चित आहे. त्यामुळे केलेल्या उपकाराची जाण तेली यानी ठेवावी.आकारीपड, वनसंज्ञा असे प्रश्न राणेनी मार्गी लावले नसतील तर त्याला सर्वस्वी कारणीभूत राजन तेली आहेत. कारण त्याकाळी पाठपुरावा करण्याचे काम तेली करीत असत. कार्यकर्त्याना राणेपर्यन्त पोहोचू न देणे, अडचणी आणून विकासकामे ठप्प करणे हे काम तेली करीत असत. नारायण राणेनी नेमके काय केले हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही जनतेसाठी काय केले ते सांगा.शिवसेना व भाजप युती झाली तर भविष्यात स्वतःचा विचार करून तेली आमदारकी लढवतील. तेली यांच्या जाण्यामुळे आमच्या पक्षाचे नुकसान काहीही झालेले नाही. याउलट फायदाच झाला. पण भाजप मधील अनेक पदाधिकारी त्यांच्यामुळे नाराज असून ते योग्य वेळी काय तो निर्णय घेतील. हे तेली यांनी लक्षात घ्यावे.असेही सतीश सावंत यावेळी म्हणाले.राणे सहयोगी पक्षाचे खासदार !नारायण राणे हे स्वाभिमान पक्षाचेच सदस्य असून ते भाजप सहयोगी पक्षाचे खासदार आहेत. याबाबत तेली यांना माहिती नसल्यास त्यांनी भाजपच्या वरिष्ठ सरचिटणीसांकडून ती करून घ्यावी. अलीकडेच महसुलमंत्री चंद्रकांत पाटील या मुद्यावर बोलले आहेत. त्यांच्याकडून माहिती घ्यावी. असेही सतीश सावंत यावेळी म्हणाले.

टॅग्स :Satish Sawantसतीश सावंतsindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली