शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सत्ताधाऱ्यांच्या कारभारामुळे सणासुदीत स्टॉल धारकांच्या डोळ्यात अश्रू, सतीश सावंत यांची टीका

By सुधीर राणे | Updated: March 21, 2023 17:32 IST

कणकवली : कणकवली येथील स्टॉलधारकांना विस्थापित करण्याचे काम सत्ताधारी आणि आमदार नितेश राणे यांनी केले आहे. वास्तविक गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ...

कणकवली: कणकवली येथील स्टॉलधारकांना विस्थापित करण्याचे काम सत्ताधारी आणि आमदार नितेश राणे यांनी केले आहे. वास्तविक गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला स्टॉलधारकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येणे अपेक्षित होते. मात्र, या सत्ताधाऱ्यांच्या कारभारामुळे स्टॉल धारकांच्या डोळ्यात दुःखाश्रू आले आहेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी केली आहे.कणकवली येथील मध्यवर्ती कार्यालयात आज, मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक कन्हैया पारकर, प्रमोद मसुरकर, विलास गुडेकर, सचिन आचरेकर उपस्थित होते.सतीश सावंत म्हणाले, चार वर्षापुर्वी बैठक घेत नितेश राणे यांनी कणकवली शहरातील स्टॉलधारकांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. मात्र, आता स्टॉल हटविण्यात आले. याबाबत आमदार नितेश राणे साधा ब्र पण काढत नाहीत. राणे यांनी ज्याप्रकारे इतर बाबतीत फसविण्याचे काम केले, तीच पद्धत येथेही केली. जर आता नगरपंचायत किंवा विधानसभेची निवडणूक असती तर ही स्टॉल हटाव मोहीम झालेच नसते. अशाचप्रकारे वैभववाडीमध्ये स्टॉलधारकांवर अन्याय करण्याचे काम करण्यात आले आहे.ग्लोबल असोसिएटसने  शहरातील भाजी मार्केटची इमारत तयार असल्याचे कळविले आहे.  त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने याबाबतची भूमिका जनतेसमोर जाहिर करावी. याबाबत प्रशासन निर्णय घेण्यास विलंब का करत आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याविषयात लक्ष घालून या स्टॉलधारकांवरील अन्याय दूर करावा. तसेच त्यांना हक्काची जागा द्यावी. १९९७ मध्ये अशाचप्रकारे स्टॉल हटविण्याचा मुद्दा आला. त्यावेळी पालकमंत्री असलेल्या नारायण राणे यांनी तातडीने हटाव मोहिम थांबविली होती. आता ते केंद्रीय मंत्री आहेत. तसेच आमदार, जिल्हाध्यक्ष यांच्या पक्षाची  सत्ता असतानाही त्यांच्याकडून जनतेला वेठीस धरले जात आहे.  

शहरासह अन्य भागात सध्या सुरू असलेली इतर कामेही दर्जाहीन आहेत. कामे दर्जेदार होण्यास या मंडळींना इंटरेस्ट नसल्याचे सांगतानाच बीबीएम रद्द करून बीएम करण्याचा निर्णय हा हॉटमिक्सवाल्यांच्या फायद्यासाठी घेण्यात आला आहे. कामे दर्जेदार न झाल्यास कार्यकारी अभियंता यांना  जाब विचारला जाईल.आमदार राणे सांगत असतील की आम्ही २२०० कोटीचा निधी आणला, तर त्यांनी त्या कामाचा कार्यारंभ आदेश दाखवावा. कारण यापूर्वी सुरू केलेले वॉटर स्पोर्ट्स व अन्य प्रकल्पांचे काय झाले? याची माहिती जनतेला आहे. त्यामुळे जनता आता त्यांच्या खोट्या आश्वासनाला भुलणार नाही असेही  सतीश सावंत म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली