शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

उमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम:  राजन तेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 13:28 IST

rajanteli, sindhududrgnews उमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम राज्य सरकारकडून केले जात आहे. सिंधुदुर्गनगरी येथे ५ हजार महिलांच्या मोर्चासमोर पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या वल्गना केल्या होत्या. मात्र, त्या फोल ठरल्या आहेत. ठाकरे सरकार नेमके कोणासाठी काम करीत आहे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केलेली नाहीत. याउलट विविध माध्यमातून जनतेची थट्टाच चालविली आहे, अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी केली.

ठळक मुद्देउमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे कामसरकारकडून जनतेची थट्टा  :  राजन तेली

कणकवली : उमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम राज्य सरकारकडून केले जात आहे. सिंधुदुर्गनगरी येथे ५ हजार महिलांच्या मोर्चासमोर पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या वल्गना केल्या होत्या. मात्र, त्या फोल ठरल्या आहेत. ठाकरे सरकार नेमके कोणासाठी काम करीत आहे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केलेली नाहीत. याउलट विविध माध्यमातून जनतेची थट्टाच चालविली आहे, अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी केली.कणकवली येथील भाजपाच्या कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजन तेली म्हणाले, भाजपाला बिहार निवडणुकीत खूप चांगले यश प्राप्त झाले आहे. बूथ अध्यक्ष यांना याचे श्रेय जाते. महाराष्ट्र सरकारने अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. या मंडळाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळण्यासाठी काम केले जात होते. सरकारने मत्स्य पॅकेज जाहीर केले. पण त्या पॅकेजमध्ये एकालाच लाभ मिळणार आहे. मच्छिमार बांधवांचे संपूर्ण कुटूंब काम करीत असते. मात्र, पॅकेजमधून मदत मिळण्यासाठी जाचक अटी सरकारने घातल्या आहेत. त्या पूर्ण करता येणे शक्य नाही.पालकमंत्री, खासदार व शिवसेनेचे आमदार एकमेकांचे कौतुक करीत असतात. मात्र, जनतेच्या समस्या सुटत नाहीत. वाळू लिलाव झालेले नसताना कोल्हापूर व गोवा येथे जिल्ह्यातून शेकडो ट्रक जात आहेत. या चोरट्या वाळूच्या मागे कोण आहे? अधिकाऱ्यांशी हितसबंध कोणाचे आहेत ? गोवा येथून दारू जिल्ह्यात येतेच कशी ? याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर अवैध धंद्यांविरोधात दिवाळीनंतर भाजपा सर्व ताकदीनिशी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत प्रशासनाला जाब विचारेल, असा इशाराही राजन तेली यांनी यावेळी दिला.सिंधुदुर्गातील सर्वच निवडणुका जिंकणारजिल्हा बँक व ७१ ग्रामपंचायती, ५० टक्के विकास संस्था, दोन नगरपंचायती यांच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार आहे. उर्वरित पक्ष एकत्र आले तरी भाजपावर व खासदार नारायण राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर जनतेचा विश्वास असल्याचे राजन तेली यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Rajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्ग