शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

उमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम:  राजन तेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 13:28 IST

rajanteli, sindhududrgnews उमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम राज्य सरकारकडून केले जात आहे. सिंधुदुर्गनगरी येथे ५ हजार महिलांच्या मोर्चासमोर पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या वल्गना केल्या होत्या. मात्र, त्या फोल ठरल्या आहेत. ठाकरे सरकार नेमके कोणासाठी काम करीत आहे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केलेली नाहीत. याउलट विविध माध्यमातून जनतेची थट्टाच चालविली आहे, अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी केली.

ठळक मुद्देउमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे कामसरकारकडून जनतेची थट्टा  :  राजन तेली

कणकवली : उमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम राज्य सरकारकडून केले जात आहे. सिंधुदुर्गनगरी येथे ५ हजार महिलांच्या मोर्चासमोर पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या वल्गना केल्या होत्या. मात्र, त्या फोल ठरल्या आहेत. ठाकरे सरकार नेमके कोणासाठी काम करीत आहे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केलेली नाहीत. याउलट विविध माध्यमातून जनतेची थट्टाच चालविली आहे, अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी केली.कणकवली येथील भाजपाच्या कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजन तेली म्हणाले, भाजपाला बिहार निवडणुकीत खूप चांगले यश प्राप्त झाले आहे. बूथ अध्यक्ष यांना याचे श्रेय जाते. महाराष्ट्र सरकारने अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. या मंडळाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळण्यासाठी काम केले जात होते. सरकारने मत्स्य पॅकेज जाहीर केले. पण त्या पॅकेजमध्ये एकालाच लाभ मिळणार आहे. मच्छिमार बांधवांचे संपूर्ण कुटूंब काम करीत असते. मात्र, पॅकेजमधून मदत मिळण्यासाठी जाचक अटी सरकारने घातल्या आहेत. त्या पूर्ण करता येणे शक्य नाही.पालकमंत्री, खासदार व शिवसेनेचे आमदार एकमेकांचे कौतुक करीत असतात. मात्र, जनतेच्या समस्या सुटत नाहीत. वाळू लिलाव झालेले नसताना कोल्हापूर व गोवा येथे जिल्ह्यातून शेकडो ट्रक जात आहेत. या चोरट्या वाळूच्या मागे कोण आहे? अधिकाऱ्यांशी हितसबंध कोणाचे आहेत ? गोवा येथून दारू जिल्ह्यात येतेच कशी ? याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर अवैध धंद्यांविरोधात दिवाळीनंतर भाजपा सर्व ताकदीनिशी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत प्रशासनाला जाब विचारेल, असा इशाराही राजन तेली यांनी यावेळी दिला.सिंधुदुर्गातील सर्वच निवडणुका जिंकणारजिल्हा बँक व ७१ ग्रामपंचायती, ५० टक्के विकास संस्था, दोन नगरपंचायती यांच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार आहे. उर्वरित पक्ष एकत्र आले तरी भाजपावर व खासदार नारायण राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर जनतेचा विश्वास असल्याचे राजन तेली यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Rajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्ग