शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

उमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम:  राजन तेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 13:28 IST

rajanteli, sindhududrgnews उमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम राज्य सरकारकडून केले जात आहे. सिंधुदुर्गनगरी येथे ५ हजार महिलांच्या मोर्चासमोर पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या वल्गना केल्या होत्या. मात्र, त्या फोल ठरल्या आहेत. ठाकरे सरकार नेमके कोणासाठी काम करीत आहे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केलेली नाहीत. याउलट विविध माध्यमातून जनतेची थट्टाच चालविली आहे, अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी केली.

ठळक मुद्देउमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे कामसरकारकडून जनतेची थट्टा  :  राजन तेली

कणकवली : उमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम राज्य सरकारकडून केले जात आहे. सिंधुदुर्गनगरी येथे ५ हजार महिलांच्या मोर्चासमोर पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या वल्गना केल्या होत्या. मात्र, त्या फोल ठरल्या आहेत. ठाकरे सरकार नेमके कोणासाठी काम करीत आहे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केलेली नाहीत. याउलट विविध माध्यमातून जनतेची थट्टाच चालविली आहे, अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी केली.कणकवली येथील भाजपाच्या कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजन तेली म्हणाले, भाजपाला बिहार निवडणुकीत खूप चांगले यश प्राप्त झाले आहे. बूथ अध्यक्ष यांना याचे श्रेय जाते. महाराष्ट्र सरकारने अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. या मंडळाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळण्यासाठी काम केले जात होते. सरकारने मत्स्य पॅकेज जाहीर केले. पण त्या पॅकेजमध्ये एकालाच लाभ मिळणार आहे. मच्छिमार बांधवांचे संपूर्ण कुटूंब काम करीत असते. मात्र, पॅकेजमधून मदत मिळण्यासाठी जाचक अटी सरकारने घातल्या आहेत. त्या पूर्ण करता येणे शक्य नाही.पालकमंत्री, खासदार व शिवसेनेचे आमदार एकमेकांचे कौतुक करीत असतात. मात्र, जनतेच्या समस्या सुटत नाहीत. वाळू लिलाव झालेले नसताना कोल्हापूर व गोवा येथे जिल्ह्यातून शेकडो ट्रक जात आहेत. या चोरट्या वाळूच्या मागे कोण आहे? अधिकाऱ्यांशी हितसबंध कोणाचे आहेत ? गोवा येथून दारू जिल्ह्यात येतेच कशी ? याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर अवैध धंद्यांविरोधात दिवाळीनंतर भाजपा सर्व ताकदीनिशी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत प्रशासनाला जाब विचारेल, असा इशाराही राजन तेली यांनी यावेळी दिला.सिंधुदुर्गातील सर्वच निवडणुका जिंकणारजिल्हा बँक व ७१ ग्रामपंचायती, ५० टक्के विकास संस्था, दोन नगरपंचायती यांच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार आहे. उर्वरित पक्ष एकत्र आले तरी भाजपावर व खासदार नारायण राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर जनतेचा विश्वास असल्याचे राजन तेली यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Rajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्ग