शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

तारकर्ली निष्कलंक रहायला हवी - मधु मंगेश कर्णिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 15:41 IST

पर्यटनाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केलेले तारकर्ली गाव झपाट्याने प्रगती साधत आहे. यात अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत

 

मालवण : पर्यटनाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केलेले तारकर्ली गाव झपाट्याने प्रगती साधत आहे. यात अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून घडणाºया वाईट गोष्टींना गावात थारा असता कामा नये. तारकर्ली आज जशी निष्कलंक आहे तशीच ती कायम रहायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिलेल्या ‘तारकर्ली’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा रविवारी सायंकाळी तारकर्ली महापुरुष मंदिर येथे मोठ्या थाटात झाला. यावेळी व्यासपीठावर गंगाराम गवाणकर, महेश केळुसकर, वैशाली पंडित, रूजारिओ पिंटो, शशिकांत तिरोडकर, मंगेश मस्के, डॉ. जितेंद्र केरकर, स्नेहा केरकर, अनंत कोळंबकर, दादा कोळंबकर, नमिता कीर, रमेश कीर, अरुण नेरकर, महेंद्र पराडकर आदी उपस्थित होते.

यावेळी वस्त्रहरणकार गवाणकर म्हणाले, ज्या तारकर्ली गावच्या नावाने ही कादंबरी आहे त्याच तारकर्ली गावात कादंबरीचे प्रकाशन होत आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे. यावेळी त्यांनी ‘अच्छी मच्छी’ ही विविध मासळीची ओळख करून देणारी कविता सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. सूत्रसंचालन शशिकांत तिरोडकर यांनी केले. मंगेश मस्के यांनी आभार मानले. तारकर्लीची अवस्था गोव्यातील कलंगुट बिचसारखी होता कामा नयेयावेळी कर्णिक म्हणाले, तारकर्ली गावाची स्थित्यंतरे या नव्या कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पूर्वीची तारकर्ली ही गरीब होती. परंतु आताच्या तारकर्लीत फार बदल झाल्याचे दिसून येते. कादंबरी वाचताना वाचकाला काल्पनिक तसेच वास्तववादी वाटेल. 

वाचकाने कादंबरीतील वास्तवाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये. या कादंबरीत समाजवाद नाही. पण समाजाचा आविष्कार आहे आणि तो वाचकाला जाणवेल. तारकर्लीत पर्यटनाच्या माध्यमातून चांगले बदल होत आहेत. परंतु तारकर्लीची अवस्था गोव्यातील कलंगुट बिचसारखी होता कामा नये. 

मात्र, असे होणार नाही याची जबाबदारी तारकर्लीतील ग्रामस्थांनी घ्यायला हवी. कादंबरी लिहीत असताना ज्ञानेश देऊलकर, रूजारिओ पिंटो, महेंद्र पराडकर यांची मोलाची मदत झाली आहे. त्यामुळे त्यांची आठवण आज काढणे आवश्यक असल्याचे मत मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केले.

तारकर्ली येथील महापुरुष मंदिरात ‘तारकर्ली’ कादंबरीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात लेखक मधु मंगेश कर्णिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गंगाराम गवाणकर, महेश केळुसकर, वैशाली पंडित, डॉ. जितेंद्र केरकर, स्नेहा केरकर आदी उपस्थित होते.