शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

तारकर्ली निष्कलंक रहायला हवी - मधु मंगेश कर्णिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 15:41 IST

पर्यटनाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केलेले तारकर्ली गाव झपाट्याने प्रगती साधत आहे. यात अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत

 

मालवण : पर्यटनाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केलेले तारकर्ली गाव झपाट्याने प्रगती साधत आहे. यात अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून घडणाºया वाईट गोष्टींना गावात थारा असता कामा नये. तारकर्ली आज जशी निष्कलंक आहे तशीच ती कायम रहायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिलेल्या ‘तारकर्ली’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा रविवारी सायंकाळी तारकर्ली महापुरुष मंदिर येथे मोठ्या थाटात झाला. यावेळी व्यासपीठावर गंगाराम गवाणकर, महेश केळुसकर, वैशाली पंडित, रूजारिओ पिंटो, शशिकांत तिरोडकर, मंगेश मस्के, डॉ. जितेंद्र केरकर, स्नेहा केरकर, अनंत कोळंबकर, दादा कोळंबकर, नमिता कीर, रमेश कीर, अरुण नेरकर, महेंद्र पराडकर आदी उपस्थित होते.

यावेळी वस्त्रहरणकार गवाणकर म्हणाले, ज्या तारकर्ली गावच्या नावाने ही कादंबरी आहे त्याच तारकर्ली गावात कादंबरीचे प्रकाशन होत आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे. यावेळी त्यांनी ‘अच्छी मच्छी’ ही विविध मासळीची ओळख करून देणारी कविता सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. सूत्रसंचालन शशिकांत तिरोडकर यांनी केले. मंगेश मस्के यांनी आभार मानले. तारकर्लीची अवस्था गोव्यातील कलंगुट बिचसारखी होता कामा नयेयावेळी कर्णिक म्हणाले, तारकर्ली गावाची स्थित्यंतरे या नव्या कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पूर्वीची तारकर्ली ही गरीब होती. परंतु आताच्या तारकर्लीत फार बदल झाल्याचे दिसून येते. कादंबरी वाचताना वाचकाला काल्पनिक तसेच वास्तववादी वाटेल. 

वाचकाने कादंबरीतील वास्तवाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये. या कादंबरीत समाजवाद नाही. पण समाजाचा आविष्कार आहे आणि तो वाचकाला जाणवेल. तारकर्लीत पर्यटनाच्या माध्यमातून चांगले बदल होत आहेत. परंतु तारकर्लीची अवस्था गोव्यातील कलंगुट बिचसारखी होता कामा नये. 

मात्र, असे होणार नाही याची जबाबदारी तारकर्लीतील ग्रामस्थांनी घ्यायला हवी. कादंबरी लिहीत असताना ज्ञानेश देऊलकर, रूजारिओ पिंटो, महेंद्र पराडकर यांची मोलाची मदत झाली आहे. त्यामुळे त्यांची आठवण आज काढणे आवश्यक असल्याचे मत मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केले.

तारकर्ली येथील महापुरुष मंदिरात ‘तारकर्ली’ कादंबरीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात लेखक मधु मंगेश कर्णिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गंगाराम गवाणकर, महेश केळुसकर, वैशाली पंडित, डॉ. जितेंद्र केरकर, स्नेहा केरकर आदी उपस्थित होते.