शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

तारकर्ली निष्कलंक रहायला हवी - मधु मंगेश कर्णिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 15:41 IST

पर्यटनाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केलेले तारकर्ली गाव झपाट्याने प्रगती साधत आहे. यात अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत

 

मालवण : पर्यटनाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केलेले तारकर्ली गाव झपाट्याने प्रगती साधत आहे. यात अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून घडणाºया वाईट गोष्टींना गावात थारा असता कामा नये. तारकर्ली आज जशी निष्कलंक आहे तशीच ती कायम रहायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिलेल्या ‘तारकर्ली’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा रविवारी सायंकाळी तारकर्ली महापुरुष मंदिर येथे मोठ्या थाटात झाला. यावेळी व्यासपीठावर गंगाराम गवाणकर, महेश केळुसकर, वैशाली पंडित, रूजारिओ पिंटो, शशिकांत तिरोडकर, मंगेश मस्के, डॉ. जितेंद्र केरकर, स्नेहा केरकर, अनंत कोळंबकर, दादा कोळंबकर, नमिता कीर, रमेश कीर, अरुण नेरकर, महेंद्र पराडकर आदी उपस्थित होते.

यावेळी वस्त्रहरणकार गवाणकर म्हणाले, ज्या तारकर्ली गावच्या नावाने ही कादंबरी आहे त्याच तारकर्ली गावात कादंबरीचे प्रकाशन होत आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे. यावेळी त्यांनी ‘अच्छी मच्छी’ ही विविध मासळीची ओळख करून देणारी कविता सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. सूत्रसंचालन शशिकांत तिरोडकर यांनी केले. मंगेश मस्के यांनी आभार मानले. तारकर्लीची अवस्था गोव्यातील कलंगुट बिचसारखी होता कामा नयेयावेळी कर्णिक म्हणाले, तारकर्ली गावाची स्थित्यंतरे या नव्या कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पूर्वीची तारकर्ली ही गरीब होती. परंतु आताच्या तारकर्लीत फार बदल झाल्याचे दिसून येते. कादंबरी वाचताना वाचकाला काल्पनिक तसेच वास्तववादी वाटेल. 

वाचकाने कादंबरीतील वास्तवाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये. या कादंबरीत समाजवाद नाही. पण समाजाचा आविष्कार आहे आणि तो वाचकाला जाणवेल. तारकर्लीत पर्यटनाच्या माध्यमातून चांगले बदल होत आहेत. परंतु तारकर्लीची अवस्था गोव्यातील कलंगुट बिचसारखी होता कामा नये. 

मात्र, असे होणार नाही याची जबाबदारी तारकर्लीतील ग्रामस्थांनी घ्यायला हवी. कादंबरी लिहीत असताना ज्ञानेश देऊलकर, रूजारिओ पिंटो, महेंद्र पराडकर यांची मोलाची मदत झाली आहे. त्यामुळे त्यांची आठवण आज काढणे आवश्यक असल्याचे मत मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केले.

तारकर्ली येथील महापुरुष मंदिरात ‘तारकर्ली’ कादंबरीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात लेखक मधु मंगेश कर्णिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गंगाराम गवाणकर, महेश केळुसकर, वैशाली पंडित, डॉ. जितेंद्र केरकर, स्नेहा केरकर आदी उपस्थित होते.