शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

लाच घेताना साळगावच्या महिला तलाठी गजाआड

By admin | Updated: October 6, 2014 23:43 IST

५० हजारांची लाच : दोन दिवसांची पोलीस कोठडी

कुडाळ : जमिनीच्या सातबारावर नाव चढविण्यासंदर्भात ४० हजारांची लाच स्वीकारताना साळगावच्या महिला तलाठी पूजा प्रकाश प्रभूखानोलकर हिला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले असून, तिला अटक करण्यात आली आहे.  -कुडाळ तालुक्यातील महिन्याभरातील ही दुसरी कारवाई आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही तलाठी महिला असल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. प्रभूखानोलकर यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. साळगावच्या तलाठी म्हणून पूजा प्रभूखानोलकर (पूर्वाश्रमीच्या कृष्णाबाई सामंत) गेली आठ वर्षे काम पाहत आहेत. मुंबई-बदलापूर येथे राहणारे गुरुदास शरद भोजने यांनी साळगाव येथे सहा गुंठे जमीन खरेदी केली होती. जमिनीचे खरेदी खत सात महिन्यांपूर्वी पूर्ण झालेले होते. मात्र, त्यांचे नाव सातबारावर चढले नव्हते जमिनीच्या सातबारावर नाव चढविण्यासाठी गुरुदास भोजने यांंनी ४ आॅक्टोबरला साळगाव तलाठी पूजा प्रभूखानोलकर यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान पूजा यांनी नाव चढवून देण्याकरिता ५० हजार रुपयांची मागणी केली. गुरुदास भोजने यांनी ही मागणी मान्य केली. पूजा यांचे पती प्रकाश प्रभूखानोलकर यांनी भोजने यांना रविवारी दूरध्वनीवरून रात्री ८ वाजता विष्णूबुवा बिल्डिंग, प्रथमेश कॉम्प्लेक्स येथे राहत असलेल्या खोलीवर पैसे आणण्यास सांगितले. तलाठी लाच मागत असल्याची तक्रार रविवारी भोजने यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविली. त्यानुसार पैसे देण्याच्या ठिकाणाकडे लाचलुचपतचे उपअधीक्षक जगदीश सातव यांनी पोलिसांना घेऊन सापळा रचला. रात्री ८ वाजता पूजा यांचे पती प्रकाश यांनी सांगितलेल्या ठिकाणी भोजने रक्कम घेऊन गेले. ही रक्कम पूजा यांच्या घरी देतानाच लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूजा प्रभूखानोलकर यांना रंगेहात पकडले. वीस दिवसांतील दुसरी कारवाई वीस दिवसांपूर्वीच बिबवणे येथील तलाठी मनीषा शिपुगडे यांना चारशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच साळगाव येथील पूजा प्रभूखानोलकर या दुसऱ्या महिला तलाठीला पकडण्यात आले आहे. गेली आठ वर्षे साळगाव येथे तलाठी पदावर काम करीत असलेल्या पूजा प्रभूखानोलकर यांच्या काम करण्याच्या पद्धतीबाबत ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींमुळे तहसीलदार जयराज देशमुख यांनी पूजा यांची सेवा वर्ग करून तात्पुरती आस्थापना विभागात बदली केली होती. या प्रकरणात पूजा प्रभूखानोलकर यांचे पती प्रकाश खानोलकर यांचाही हात असल्याने त्यांच्यावर कारवाई होणार की नाही, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. (प्रतिनिधी)