शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांवर कारवाई करा : वाहनांवरही कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 17:29 IST

आडमार्गाने तालुक्यात लोक येत असल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे असे आडमार्ग तत्काळ बंद करावेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घ्यावी, असे पोलिसांना सांगितले. मात्र, बांधकाम विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाकारे यांनी सांगितले.

ठळक मुद्दे उदय सामंत यांचे आदेश ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला प्रशासकीय आढावा

वैभववाडी : लॉकडाऊन काळात संचारबंदी मोडून जिल्ह्याबाहेरून येणाºया व्यक्तींबरोबरच त्यांनी प्रवास केलेल्या वाहनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच तालुक्यात येणारे सर्व आडमार्ग तातडीने आजच बंद करण्याची ताकीद त्यांनी बांधकाम विभागाला दिली आहे.

पालकमंत्री सामंत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात प्रशासकीय आढावा घेतला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, तहसीलदार रामदास झळके, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील, नगराध्यक्षा अक्षता जैतापकर, मुख्याधिकारी सूरज कांबळे, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे आदी उपस्थित होते.

सामंत यांनी प्रशासनाचे कौतुक करीत जिल्ह्यातील ९० टक्के जनतेने घरात राहून प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच पुढेही अशीच स्थिती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया, असे आवाहन करतानाच एकाद्या व्यक्तीमुळे संपूर्ण गाव, तालुका, जिल्ह्याला त्रास होणार असेल तर अशांना सरकारी विलगीकरण कक्षात पाठविण्याची सूचना आरोग्य विभागास केली.

आडमार्गाने तालुक्यात लोक येत असल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे असे आडमार्ग तत्काळ बंद करावेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घ्यावी, असे पोलिसांना सांगितले. मात्र, बांधकाम विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाकारे यांनी सांगितले.

त्यामुळे सामंत यांनी तत्काळ बांधकामच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आज सायंकाळपर्यंत तहसीलदार व पोलीस यांच्यासमवेत बसून चोरवाटा बंद करण्यासंबंधी निर्णय घेण्याची सूचना केली. बांधकामकडून सहकार्य न मिळाल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे संकेतही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.

लेखी तक्रारसंचारबंदीमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद असताना चार दिवसांपूर्वी पुण्यातून वेंगसर येथे दाखल झालेल्या तरुणास तातडीने ह्यइन्स्टीट्यूशन क्वॉरंटाईनह्णमध्ये पाठविण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी आरोग्य विभागाला दिले. याबाबत वेंगसरचे सरपंच रामदास पावसकर यांनी पालकमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे.पालकमंत्री उदय सामंत यांनी वैभववाडी तहसील कार्यालयात कोरोनाबाबत आढावा घेतला. यावेळी रामदास झळके, सतीश सावंत, संदेश पारकर, अक्षता जैतापकर, दत्तात्रय बाकारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग