शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

स्वाभिमान, शिवसेनेच्या नेत्यांनी नाणारबद्दल फेरविचार करावा : प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 13:17 IST

नाणार प्रकल्पाबाबत संबधित चौदा गावातील आठ हजार एकर जमिनीच्या मालकांनी प्रकल्पासाठी जागा देण्याचे कबूल करीत आपले समर्थन नोटरी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. संबंधित जमिन मालकांनी नाणार प्रकल्प समर्थक समितीची स्थापना केली आहे. तसेच ज्या गावांमध्ये विरोध आहे ती गावे वगळून अन्य गावांमध्ये प्रकल्प करण्यात यावा़ अशी मागणीही त्या जमिन मालकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व स्वाभिमान पक्षप्रमुख नारायण राणे यांनी नाणार बद्दल फेरविचार करावा, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले.

ठळक मुद्देस्वाभिमान, शिवसेनेच्या नेत्यांनी नाणारबद्दल फेरविचार करावा :  प्रमोद जठार यांचे आवाहनविरोध आहे ती गावे वगळून अन्य गावांमध्ये प्रकल्प करण्यात यावा़

कणकवली : नाणार प्रकल्पाबाबत संबधित चौदा गावातील आठ हजार एकर जमिनीच्या मालकांनी प्रकल्पासाठी जागा देण्याचे कबूल करीत आपले समर्थन नोटरी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. संबंधित जमिन मालकांनी नाणार प्रकल्प समर्थक समितीची स्थापना केली आहे. तसेच ज्या गावांमध्ये विरोध आहे ती गावे वगळून अन्य गावांमध्ये प्रकल्प करण्यात यावा़ अशी मागणीही त्या जमिन मालकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व स्वाभिमान पक्षप्रमुख नारायण राणे यांनी नाणार बद्दल फेरविचार करावा, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले.कणकवली येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जि़ल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, सरचिटणीस रविंद्र शेटये, चंद्रकांत हरयाण, बाबा कोकाटे, अरविंद कुडतरकर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.प्रमोद जठार पुढे म्हणाले, नाणार रिफायनरी हा कोकणात आर्थिक क्रांती घडविणारा मोठा प्रकल्प आहे. १३ हजार एकर जमिन या प्रकल्पासाठी आवश्यक असून त्यापैकी बाधीत गावांतील आठ हजार एकर जमीन असलेल्या शोतकऱ्यांनी प्रकल्पाला समर्थन दिले आहे. निवडणुकांमध्ये राजकीय लाभासाठी नाणारला विरोधाचे राजकारण झाले़ आहे. ज्या स्वाभिमानने गिर्येत प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने भुमिका बजावली. तेथील बुथवर केवळ ६० मते राणेंना मिळाली आहेत. त्यामुळे राजकीय लाभ किंवा श्रेयवादात न अडकता बेरोजगारांच्या पोटापाण्यासाठी हा प्रकल्प होण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावेत.दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जनतेला प्रकल्प हवा असल्यास आमचा विरोध नाही, अशी भूमिका अनेकदा घेतली होती. त्यामुळे नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी हा प्रकल्प होण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घ्यावी .मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प रोहा येथे स्थलांतरीत करण्याची घोषणा जरी केली असली तरी अजुनही वेळ गेलेली नाही. शेतकऱ्यांचे जर समर्थन असेल तर राजकीय मतभेद विसरून कोकणातील पुढील पिढीसाठी आपण सर्व पक्षीयांनी एकत्र येण्याची गरज आहे़. रोहा येथे प्रकल्प होत असेल तर त्या ठिकाणी प्रदुषण होणार नाही का? त्या ठिकाणी राष्ट्रवादीसह शिवसेनेचे समर्थन मिळाले आहे़. केवळ शेकापचा विरोध दिसत आहे़ . तर दुसरीकडे स्वाभिमान पक्ष तिथपर्यंत अद्यापही पोहोचला नाही, असा टोला प्रमोद जठार यांनी यावेळी लगावला.प्रमोद जठार पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, देवगड, तळेरे या चारही बसस्थानकांच्या प्रश्नी प्रभारी विभाग नियंत्रक रमेश कांबळे यांची मी भेट घेतली. वैभववाडी बसस्थानकाचा प्रश्न २२५ स्क्वेअरमिटर जागेच्या वादात अडकला आहे़ . हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने माझा पाठपुरावा राहिला आहे़. या बसस्थानकाबरोबरच कणकवली, तळेरे, आणि देवगड या तिनही बसस्थानकांच्या नुतणीकरणाचा प्रस्ताव घेऊन येत्या आठ दिवसात मंत्रालयात संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत बैठक घेऊन अद्ययावत बसस्थानक तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पsindhudurgसिंधुदुर्ग