शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जीवरक्षकांच्याच जीवाला धोका

By admin | Updated: May 9, 2017 23:47 IST

जीवरक्षकांच्याच जीवाला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : वायरी, तारकर्ली व देवबाग या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढले आहे. पर्यटकांना नेमण्यात आलेल्या जीवरक्षकांना न जुमानता पर्यटक अतिउत्साहीपणा दाखवून जीवरक्षकांशी अर्वाच्य भाषेत बोलत आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या जीवरक्षकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पर्यटकांना रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना आखाव्यात अशी मागणी पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर यांनी केली. जीवरक्षक ओळखता यावेत यासाठी त्यांना ओळखपत्र व ड्रेसकोड देण्यात आल्याचे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ‘किल्ला विकणे आहे’ असे फलक लावून ऐतिहासिक अस्मितेची अवहेलना केल्याबद्दल निषेधाचा ठराव तर आचरा येथे जीवरक्षकांनी पर्यटकांना वाचविल्याबद्दल निधी मुणगेकर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. तर सोनाली कोदे यांनी कोळंब पुलाला पर्यायी मार्ग असलेला कातवड-ओझर हा मार्ग खड्डेमय बनल्याने पावसाळ्यात धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी डागडुजी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती मनीषा वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. यावेळी उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील, सदस्य कमलाकर गावडे, विनोद आळवे, सुनील घाडीगांवकर, राजू परुळेकर, अजिंक्य पाताडे, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर, सोनाली कोदे, सागरिका लाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी निधी मुणगेकर यांनी वायंगणी बौद्धवाडी येथील सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसा करण्याची मागणी केली तर आचरा हिर्लेवाडी ते वायंगणी गावासाठी मंजूर झालेल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना रस्ता कामाची तत्काळ कार्यवाही करावी, अशी सूचना केली. या मार्गावरील खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजविण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले. तर मधुरा चोपडेकर यांनी पावसाळ्यात देवबागला उधाणाचा फटका बसतो. प्रशासनाकडून त्यांना स्थलांतराच्या नोटीसा बजावण्यात येतात. मात्र, उधाणाचे पाणी रोखण्यासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे, असे सांगितले.राजू परुळेकर यांनी बीएसएनएलच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. केबल टाकण्यासाठी खोदण्यात आलेली गटारे नष्ट केली आहेत. त्यामुळे कित्येक वर्षांनी बनविलेले चांगले रस्ते पावसाळ्यात वाहून जाण्याच्या स्थितीत आहेत. यावर गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी ठेकेदाराला सूचना करून कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. तर मठबुद्रुक गावाला गेली १५ वर्षे आरोग्य सेवक नाही. गावाला आरोग्य सेवक न मिळाल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशारा परुळेकर यांनी दिला.मासिक सभेचे निमंत्रण ‘ईमेल’वर मासिक सभेची तारीख संबंधित विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेळेत मिळत नसल्याने सभेला उपस्थिती दर्शवू शकत नाही, अशी ओरड मारणाऱ्या विभागासाठी पंचायत समिती प्रशासनाने यापुढे बैठका, सभा आदींचे नियोजन संबंधित विभागाच्या "इमेल"वर पाठविण्याची पद्धत अवलंबविण्यात येईल, असे गटविकास अधिकारी अविनाश पराडकर यांनी स्पष्ट केले. एसटी प्रशासनावर ताशेरेउपसभापती अशोक बागवे यांनी एसटी प्रशासनावर हल्लाबोल चढविला. आचरा येथील वाहतूक नियंत्रक कार्यालय बंद आहे. त्यामुळे प्रवासी, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तसेच बांदिवडे पुलावरून मसुरे आचरा बसफेरी तत्काळ सुरू करा. कोणतेही कारणे न देता बसफेरी व प्रवाशांना सेवा द्या, असे आवाहन बागवे यांनी केले. ग्रामसेवकांचा मनमानी कारभारशिरवंडे मतदारसंघात टॉवर उभारणीसाठी आम्ही जागा उपलब्ध करून देऊ, कार्यवाही केव्हा केली जाईल, असे सुनील घाडीगांवकर यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना विचारले. तालुक्यातील काही गावात ग्रामसेवक मनमानी करत असल्याचा आरोपही घाडीगांवकर यांनी केला. ग्रामसेवक केव्हा येतात, केव्हा जातात याकडे गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली. तर पावसाळ्यात सर्व ग्रामपंचायतींना वीजरोधक उपाययोजना करण्याच्या सूचना कराव्यात असेही घाडीगांवकर यांनी सांगितले.