शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

सुरेश प्रभूंमुळेच कोकण रेल्वेत बदल : राजन तेली, शिवसेनेकडून झालेली टीका दुर्दैवी असल्याचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 11:34 IST

गेल्या पंचवीस वर्षात कोकण रेल्वेकडे कोणीच लक्ष दिले नसताना सुरेश प्रभू यांच्या रूपाने कोकण रेल्वेत मोठा आमुलाग्र बदल पहायला मिळाला. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसही त्यांच्यामुळे होत आहे. असे असतानाही सुरेश प्रभू यांच्यावर शिवसेनेकडून झालेली टीका दुुर्दैवी असल्याचे भाजपा प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत सागितले. ​​​​​​​

ठळक मुद्देसुरेश प्रभू यांच्यावर शिवसेनेकडून झालेली टीका दुुर्दैवी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन, मात्र काम बंद प्रभू यांनी फसवणूक केल्याचा होता आरोप, याबाबत तेली यांनी साधला शिवसेनेवर निशाणा

सावंतवाडी : गेल्या पंचवीस वर्षात कोकण रेल्वेकडे कोणीच लक्ष दिले नसताना सुरेश प्रभू यांच्या रूपाने कोकण रेल्वेत मोठा आमुलाग्र बदल पहायला मिळाला. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसही त्यांच्यामुळे होत आहे. असे असतानाही सुरेश प्रभू यांच्यावर शिवसेनेकडून झालेली टीका दुुर्दैवी असल्याचे भाजपा प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत सागितले.सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन तत्कालीन रेल्वेमंत्री आणि विद्यमान केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दुसऱ्या टप्प्याचे काम बंद आहे. त्यामुळे प्रभू यांनी लोकांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. याबाबत तेली यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर निशाणा साधला.ते म्हणाले, या आधीचे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी, नितीशकुमार यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस होणार नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र सुरेश प्रभू रेल्वेमंत्री होताच त्यांनी टर्मिनस मंजूर क रून त्याचे कामही सुरू केले. मात्र हे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्याबाबत आपण सुरेश प्रभूंचे लक्ष वेधले असता प्रभूंनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क साधून कामाला गती देण्याबाबत सांगितले आहे. त्यामुळे हे काम लवकरच सुरू होईल.

प्रभूंनी आपल्या कार्यकाळात नवी १२ रेल्वेस्थानके आणली. विद्युतीकरणासाठी ८८ कोटी तसेच रेल्वे दुपदरीकरणासाठी ४०० कोटींची तरतूद केली. लोकांची मागणी लक्षात घेऊन वैभववाडी-कोल्हापूर, चिपळूण, कराड हे नवे मार्ग मंजूर केले. असे असताना सुरेश प्रभू लोकांची फसवणूक करत असल्याचा शिवसेनेचा आरोप चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार शिवसेनेचेच आहेत. असे असताना शिवसेनेने आपले निवेदन स्टेशनमास्तरांना देणे दुर्दैवी आहे. याकडे पालकमंत्री किंवा खासदारांचे लक्ष वेधले असते तर त्यांना संबंधित अधिकाऱ्याना सूचना देण्याचे किंवा बैठक घेण्याचे अधिकार आहेत.राणेंच्या रुग्णालयाला मंजुरी द्यागोवा मेडिकल कॉलेजमधील शुल्क आकारणीबाबत आपण जिल्ह्यात येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधणार आहोत. गोव्याच्या धर्तीवर येथील रूग्णांना दीनदयाळ उपाध्याय आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी करणार आहे.शिवाय येथील जनतेचे हित लक्षात घेता नारायण राणे यांच्या रूग्णालयाला तत्काळ मंंजुरी देण्याची मागणी आपण करणार आहोत. तसेच या रूग्णालयात रूग्णांना जास्त खर्च होऊ नये यासाठी शासनाने या रूग्णालयाला पैशांची तरतूद करावी, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Rajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्ग