शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच व्यवसायात परप्रांतीयांचा सुळसुळाट :उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 12:20 IST

राजकर्त्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सामान्य जनतने याबाबत उठाव करणे गरजेचे आहे असे मत मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसर्वच व्यवसायात परप्रांतीयांचा सुळसुळाट : उपरकर निक युवक बेरोजगार : परशुराम उपरकर यांचे मत

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच व्यवसायात परप्रांतीयांचा सुळसुळाट झाला आहे. परप्रांतीयांच्या या घुसखोरी धोरणामुळे जिल्ह्यातील तरुण व्यावसायिक हतबल झाले आहेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वारंवार निवेदने आणि पत्रव्यवहार करण्यात आला आहे. राजकर्त्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सामान्य जनतने याबाबत उठाव करणे गरजेचे आहे असे मत मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी व्यक्त केले.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी परशुराम उपरकर पुढे म्हणाले, कणकवली तालुक्यातील काही तरुण मोबाईल विक्रेते यांनी आपल्याला निवेदन देत आपली व्यथा मांडली आहे.

कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही परप्रांतीय मोबाईल व्यावसायिक ठाण मांडू पाहत आहेत. ग्राहकांना आमिषे दाखवून आपल्या दुकानाकडे आकर्षित करण्याचे काम हे व्यावसायिक करत आहेत. धनाडय परप्रांतीय व्यावसायिक स्थानिक व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय बंद करून आयुष्यातून उठवून पाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मोबाईल व्यावसायिक अडचणीत आले आहेत.मोबाइल व्यवसायाव्यतिरिक्त कपडे, बिल्डिंग मटेरियल, हार्डवेअर,टेलरिंग व्यवसाय, केशकर्तनालय यांसारखे अनेक व्यवसाय परप्रांतीय करत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यवसाय करणारे तरुण आणि व्यावसायिक हतबल झाले आहेत. आता मुंबईतील मराठी प्रमाणेच जिल्ह्यातील मालवणी माणसांचा टक्का कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

असेच चित्र राहिले तर काही दिवसात नोकरी किंवा कोणताही व्यवसाय नसल्यामुळे जिल्ह्यातील भावी पिढी वाममागार्ला जाण्याची भीती आहे. त्यामुळे या परप्रांतीय व्यावसायिकांना जिल्ह्यातील जनतेने आणि तरुणांनी हद्दपार करावे असे आवाहन आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करत आहोत असेही यावेळी उपरकर म्हणाले.सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष !परप्रांतीयांच्या होणाऱ्या आक्रमणाकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्थानिक युवक बेरोजगार होत आहेत. सिंधुदुर्गात येऊन परप्रांतीय आपली वस्ती वाढवत आहेत. तसेच आपली प्रार्थनास्थळेही उभारत आहेत. त्यांच्या अशा कृत्यामुळे भविष्यात स्थानिकांबरोबर तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग