शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सर्वच व्यवसायात परप्रांतीयांचा सुळसुळाट :उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 12:20 IST

राजकर्त्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सामान्य जनतने याबाबत उठाव करणे गरजेचे आहे असे मत मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसर्वच व्यवसायात परप्रांतीयांचा सुळसुळाट : उपरकर निक युवक बेरोजगार : परशुराम उपरकर यांचे मत

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच व्यवसायात परप्रांतीयांचा सुळसुळाट झाला आहे. परप्रांतीयांच्या या घुसखोरी धोरणामुळे जिल्ह्यातील तरुण व्यावसायिक हतबल झाले आहेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वारंवार निवेदने आणि पत्रव्यवहार करण्यात आला आहे. राजकर्त्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सामान्य जनतने याबाबत उठाव करणे गरजेचे आहे असे मत मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी व्यक्त केले.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी परशुराम उपरकर पुढे म्हणाले, कणकवली तालुक्यातील काही तरुण मोबाईल विक्रेते यांनी आपल्याला निवेदन देत आपली व्यथा मांडली आहे.

कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही परप्रांतीय मोबाईल व्यावसायिक ठाण मांडू पाहत आहेत. ग्राहकांना आमिषे दाखवून आपल्या दुकानाकडे आकर्षित करण्याचे काम हे व्यावसायिक करत आहेत. धनाडय परप्रांतीय व्यावसायिक स्थानिक व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय बंद करून आयुष्यातून उठवून पाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मोबाईल व्यावसायिक अडचणीत आले आहेत.मोबाइल व्यवसायाव्यतिरिक्त कपडे, बिल्डिंग मटेरियल, हार्डवेअर,टेलरिंग व्यवसाय, केशकर्तनालय यांसारखे अनेक व्यवसाय परप्रांतीय करत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यवसाय करणारे तरुण आणि व्यावसायिक हतबल झाले आहेत. आता मुंबईतील मराठी प्रमाणेच जिल्ह्यातील मालवणी माणसांचा टक्का कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

असेच चित्र राहिले तर काही दिवसात नोकरी किंवा कोणताही व्यवसाय नसल्यामुळे जिल्ह्यातील भावी पिढी वाममागार्ला जाण्याची भीती आहे. त्यामुळे या परप्रांतीय व्यावसायिकांना जिल्ह्यातील जनतेने आणि तरुणांनी हद्दपार करावे असे आवाहन आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करत आहोत असेही यावेळी उपरकर म्हणाले.सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष !परप्रांतीयांच्या होणाऱ्या आक्रमणाकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्थानिक युवक बेरोजगार होत आहेत. सिंधुदुर्गात येऊन परप्रांतीय आपली वस्ती वाढवत आहेत. तसेच आपली प्रार्थनास्थळेही उभारत आहेत. त्यांच्या अशा कृत्यामुळे भविष्यात स्थानिकांबरोबर तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग