शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

किनारपट्टीवर जोरदार वारे; मासेमारी, सागरी पर्यटन थंडावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 12:02 IST

मागील १५ दिवसांपासूनची परिस्थिती आठवडाभर राहण्याची शक्यता

संदीप बोडवेमालवण : महाशिवरात्रीच्या कालावधीत कोकण किनारपट्टीवर वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे येथील मासेमारी व्यवसाय १५ दिवसांपासून थंडावला आहे. एरवी समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटी किनाऱ्यांवर नांगरून ठेवण्यात आल्यामुळे मासळीचे दर सुद्धा गगनाला भिडले आहेत.जोरदार वाऱ्यांचा परिणाम किनारपट्टीवरील पर्यटनावर सुद्धा झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अशी परिस्थिती अजून आठवडाभर राहण्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या कालावधीत कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहतात. अशावेळी समुद्रात बोटी घेऊन जाणे धोकादायक असते.येथील किनारपट्टीवर वावळ (हूक फिशिंग), गीलनेट, न्हय, रापण आणि ट्रॉलिंग पद्धतीची मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. या पद्धतीच्या मासेमारीतून सुरमई, पापलेट, बांगडे, गोबरा, तांबोशी, कोकरी, बोईट, सावंदाळा, टोकी, पेडवे, तारली, कोलंबी, कुर्ले, म्हाकुल, मोडुसा, काडय आदी मासे बाराजांतून दुर्मिळ झाले आहेत.

मासळीचे दर अवाक्याबाहेरमासळीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सुरमय १२०० रुपये किलो, बांगड्यांची टोपली (८० नग) १५००, मोठ्या बांगड्यांची टोपली (४५ नग) २००० रुपये, सरंगा ८०० किलो, सवंदळा ८ नग २०० रुपये, कोलंबी ३५० ते ४०० रुपये किलो या दराने मासे विकले गेले आहेत.

जोराच्या वाऱ्यांचा किनारपट्टीवरील सागरी पर्यटनावरही परिणाम झाला आहे. स्कूबा डायव्हिंग, बोटिंग सफारी, पॅरासेलिंग आदी सागरी पर्यटनाला जोराच्या वाऱ्यांचा फटका बसला आहे. - समीर गोवेकर, सागरी पर्यटन व्यवसायिक. 

गेले महिनाभर येथील मत्स्य व्यवसायाची परिस्थिती खूपच निराशाजनक आहे. वेगाच्या वाऱ्यांमुळे मासळी खोल समुद्राच्या दिशेने सरकली आहे. मासेमारीसाठी समुद्रात बोटी घेऊन जाणे धोकादायक बनले आहे. मासळी मिळत नसल्यामुळे खलाशांचा खर्च भागात नाही. ५०० ते १००० रुपये इंधन खर्च होत असून, जाळ्याला मासळी मिळत नसल्यामुळे मासेमारी तोट्यात चालली आहे.- रश्मीन रोगे, पारंपरिक मच्छीमार

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमारtourismपर्यटन