शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाहतूक नियमांची होणार कडक अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:30 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. सरद कारवाई अधिक कडक व प्रभावीपणे करण्याच्या सूचना आज येथे निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रस्ते सुरक्षा समितीची बैठक झाली त्यावेळी या सूचना देण्यात आल्या.

ठळक मुद्दे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाहतूक नियमांची होणार कडक अंमलबजावणीवाहतूक नियम भंगाबद्दल २५ लाखांपेक्षा जास्त दंड वसूल

सिंधुदुर्गनगरी : सर्वोच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. सरद कारवाई अधिक कडक व प्रभावीपणे करण्याच्या सूचना आज येथे निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रस्ते सुरक्षा समितीची बैठक झाली त्यावेळी या सूचना देण्यात आल्या.सर्वोच्च न्यायालयाने वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगून निवासी उपजिल्हाधिकारी  जोशी पुढे म्हणाले की, विना हेल्मेट वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, सीट बेल्टचा वापर न करणे, मद्य प्राशन करुन वाहन चालवणे या सारख्या जीविताशी संबंधीत गुन्ह्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याची आमंलबजावणी प्रभावीपणे करावी तसेच कारवाई आणखी कडक करावी.

या कारवाईअंतर्गत शासकीय वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलिस विभागाच्या वाहनांवरही कारवाई केली आहे. या कारवाई विषयी नागरिकांमध्ये जागृती होण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी कारवाई व दंडाच्या रकमेविषयी माहिती देणारे बॅनर्स लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.या कारवाई अंतर्गत आतापर्यंत साडे तीन हजार पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करण्यात आली असून दंडापोटी पंचवीस लाखांपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती बैठकीमध्ये देण्यात आली. तसेच बसस्थानक, बाजरपेठांसह नगरपालीका क्षेत्रांमध्ये बॅनर्स लावण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.

याशिवाय या कारवाई दरम्यान काही नागरिक दबाव आणत असल्याचा मुद्दा ही उपस्थित करण्यात आला. यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व नागरिकांच्या जीविताचा विचार करता कोणत्याही प्रकारच्या दबावास बळी न पडण्याच्या सूचना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

नागरिकांना वाहतूक नियमांचे योग्य रित्या पालन करावे व कोणत्याही प्रकारच्या कारवाईवेळी दबावतंत्राचा वापर करु नये असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले. सदर कारवाई ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे. कोणत्याही प्रकारचा दंड वसुल करणे किंवा महसूल वाढवणे यासाठीची ही कारवाई नसून जीविताच्या सुरक्षेशी संबंधीत कारवाई आहे.

रस्ते सुरक्षा हा जिवन मरणाचा प्रश्न असून रस्ते वाहतुकीच्या नियमांचे सर्वांनी योग्य पालन करणे महत्वाचे आहे. अशा कारवाईवेळी दबाव आणून कारवाई टाळणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हे सर्वस्वी नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. त्यामुळे कारवाईमध्ये कोणताही अडथळा आणू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीsindhudurgसिंधुदुर्ग