शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाहतूक नियमांची होणार कडक अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:30 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. सरद कारवाई अधिक कडक व प्रभावीपणे करण्याच्या सूचना आज येथे निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रस्ते सुरक्षा समितीची बैठक झाली त्यावेळी या सूचना देण्यात आल्या.

ठळक मुद्दे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाहतूक नियमांची होणार कडक अंमलबजावणीवाहतूक नियम भंगाबद्दल २५ लाखांपेक्षा जास्त दंड वसूल

सिंधुदुर्गनगरी : सर्वोच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. सरद कारवाई अधिक कडक व प्रभावीपणे करण्याच्या सूचना आज येथे निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रस्ते सुरक्षा समितीची बैठक झाली त्यावेळी या सूचना देण्यात आल्या.सर्वोच्च न्यायालयाने वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगून निवासी उपजिल्हाधिकारी  जोशी पुढे म्हणाले की, विना हेल्मेट वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, सीट बेल्टचा वापर न करणे, मद्य प्राशन करुन वाहन चालवणे या सारख्या जीविताशी संबंधीत गुन्ह्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याची आमंलबजावणी प्रभावीपणे करावी तसेच कारवाई आणखी कडक करावी.

या कारवाईअंतर्गत शासकीय वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलिस विभागाच्या वाहनांवरही कारवाई केली आहे. या कारवाई विषयी नागरिकांमध्ये जागृती होण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी कारवाई व दंडाच्या रकमेविषयी माहिती देणारे बॅनर्स लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.या कारवाई अंतर्गत आतापर्यंत साडे तीन हजार पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करण्यात आली असून दंडापोटी पंचवीस लाखांपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती बैठकीमध्ये देण्यात आली. तसेच बसस्थानक, बाजरपेठांसह नगरपालीका क्षेत्रांमध्ये बॅनर्स लावण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.

याशिवाय या कारवाई दरम्यान काही नागरिक दबाव आणत असल्याचा मुद्दा ही उपस्थित करण्यात आला. यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व नागरिकांच्या जीविताचा विचार करता कोणत्याही प्रकारच्या दबावास बळी न पडण्याच्या सूचना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

नागरिकांना वाहतूक नियमांचे योग्य रित्या पालन करावे व कोणत्याही प्रकारच्या कारवाईवेळी दबावतंत्राचा वापर करु नये असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले. सदर कारवाई ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे. कोणत्याही प्रकारचा दंड वसुल करणे किंवा महसूल वाढवणे यासाठीची ही कारवाई नसून जीविताच्या सुरक्षेशी संबंधीत कारवाई आहे.

रस्ते सुरक्षा हा जिवन मरणाचा प्रश्न असून रस्ते वाहतुकीच्या नियमांचे सर्वांनी योग्य पालन करणे महत्वाचे आहे. अशा कारवाईवेळी दबाव आणून कारवाई टाळणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हे सर्वस्वी नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. त्यामुळे कारवाईमध्ये कोणताही अडथळा आणू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीsindhudurgसिंधुदुर्ग