शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

मार्चअखेर निधी खर्ची घालण्याची प्रथा बंद करा, पालकमंत्री रवींद्र चव्हाणांनी अधिकाऱ्यांना खडसावलं 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 22, 2023 17:36 IST

केवळ २० टक्के खर्चाबाबत जिल्हा नियोजन समिती सभेत व्यक्त केली नाराजी 

सिंधुदुर्ग : जिल्हा नियोजनकडील चालू वर्षातील केवळ २० टक्केच निधी खर्च झाला असून, उर्वरित ८० टक्के निधी २ महिन्यांत कसा काय खर्च करणार, असा प्रश्न करत जिल्हा नियोजनाचा ८० तक्के निधी अखर्चित असल्याकडे आमदार वैभव नाईक यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. केवळ २० टक्के खर्चाबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. गतवर्षी एका अधिकाऱ्याने निधी खर्च केला नाही, त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली असल्याचे सांगतानाच मार्चअखेर निधी खर्ची घालण्याची प्रथा बंद करा. आणि फेब्रुवारी अखेर १०० टक्के निधी खर्च करा, अशी सक्त ताकीद शुक्रवारी झालेल्या नियोजन समिती सभेत दिली.येथील नवीन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भगवान पवार, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते.

सावंतवाडी तालुक्यातील क्रीडा संकूल बांद्यातसावंतवाडी तालुक्यात मंजूर असलेले क्रीडा संकूल बांदा येथे बांधण्यात येणार असून, यासाठी जिल्हा नियोजनमधून ३ कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी केली. तसेच या ठिकाणी शासकीय बोर्डिंग सुरू केले जाणार असून, त्यांच्यामार्फत या क्रीडा संकूलची देखभाल केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.सावंतवाडी टर्मिनलला जोडणारा रस्ता खराबजिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जात आहे. मात्र, सावंतवाडी टर्मिनल याठिकाणी जाणाऱ्या काँक्रिटीकरण रस्त्याला जोडणारा ७०० मीटरचा रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे त्या रस्त्यासाठी निधी द्या अशी मागणी मंत्री केसरकर यांनी केली.

त्याच ठिकाणी पुन्हा नियुक्ती

मालवण तालुक्यातील चिंदर येथील तलाठ्यांचे एका प्रकरणात निलंबन करण्यात आले होते. मात्र, काही महिन्यांनी त्यांना सेवेत घेताना अन्य ठिकाणी नियुक्ती न देता त्याच ठिकाणी नियुक्ती दिल्याकडे आमदार वैभव नाईक यांनी सभेत सांगितले. तसेच प्रशासनाच्या भोंगळ कारभाराकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPlanning Commissionनियोजन आयोगguardian ministerपालक मंत्री