शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कणकवलीत मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 05:14 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना कणकवली शहरात मात्र प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे गेले काही महिने काम थांबविण्यात आले होते.

कणकवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना कणकवली शहरात मात्र प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे गेले काही महिने काम थांबविण्यात आले होते. अखेर २० आॅक्टोबरपासून कणकवली शासकीय विश्रामगृह येथून महामार्ग रुंदीकरणाचे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे. तर शहरातील अनेक प्रकल्पग्रस्तांनी स्वत:हून महामार्ग सीमांकन क्षेत्रातील अतिक्रमण किंवा आपली दुकाने, घरे रिकामी केली. रविवारी जानवली नदीपासून विविध दुकानांचे फलक संबंधित ठेकेदाराने यंत्राच्या साहाय्याने हटविले.सिंधुदुर्गातील संवेदनशील शहर म्हणून कणकवलीची ओळख आहे. या शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न महामार्गाचे काम करत असताना निर्माण होण्याची शक्यता आहे. काम गतीने करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी विरोध झाला तरी वेळप्रसंगी पोलिसी बळाचा वापर करू, असा इशारा दिला आहे. कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम ४५ मीटरनुसार होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची यापूर्वीच भूसंपादन असलेली जागा ३० मीटर आहे. या ३० मीटरमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे, घरे, स्टॉल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी आम्ही काम सुरू केलेले आहे. महामार्ग रुंदीकरण करण्याची पहिली प्रक्रिया करण्यात येईल. त्यानंतर फ्लायओव्हरचे काम हाती घेण्यात येईल. फ्लाय ओव्हरचे पीलर उभे करण्यापूर्वी वाहतुकीसाठी सर्व्हिस रोड बांधण्यात येणार असल्याचे शेडेकर यांनी सांगितले .मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ चे चौपदरीकरण करत असताना कणकवली शहराचा विकास होण्याच्या दृष्टीने आमचे सर्वतोपरी प्रयत्न असणार आहेत. कणकवलीत बॉक्ससेल ब्रिज मंजूर असताना तो रद्द करून शासनाने आता वाय आकाराच्या ब्रिजची मंजुरी दिली आहे. त्यामुळे कणकवली शहराला साजेसा हा रस्ता होणार आहे. ४५ पीलर या ब्रिजसाठी लागणार आहेत. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम करत असताना प्रकल्पग्रस्त आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शेडेकर यांनी केले आहे.>कणकवली शहरातील ४५ मीटरची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. वीजवाहिन्या, दूरध्वनी सेवेच्या वायर व वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या ४५ मीटरमध्ये गटार व पदपथाबरोबरच सर्व्हिस रोड असणार आहेत. वीजवाहिन्या अंडर ग्राउंड टाकण्यात येणार आहेत. दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी खुले असणार आहेत. त्यानंतर ४५ पीलरचा सहा पदरी फ्लायओव्हर ब्रिज बांधण्यात येणार आहे.- प्रकाश शेडेकर, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण