शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

आंबोलीतील प्रकल्प सुरू करा

By admin | Updated: February 16, 2015 23:12 IST

लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत

महादेव भिसे -आंबोली हे राज्यात थंड हवेचे ठिकाण तसेच उत्कृष्ट पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे येथील पर्यटन प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. याचा परिणाम येथील पर्यटकांच्या उपस्थितीवर होत आहे. एकीकडे पर्यटनातून समृद्धी आणण्याच्या आणाभाका घेतल्या जात असताना, आंबोलीतील बंद पर्यटन प्रकल्पांकडे मात्र, दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येथील बंद पर्यटन प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. आंबोलीला २००५ साली कोकण पॅकेजच्या माध्यमातून सुमारे चार कोटी निधी देण्यात आला होता. परंतु गचाळ नियोजनामुळे हा निधी अनावश्यक व चुकीच्या पद्धतीने खर्च करण्यात आला. यात जंगल सफारी रस्त्यासाठी २५ लाख, पर्यटन महामंडळाच्या इमारती उभारणीसाठी पावणेदोन कोटी, हर्बेरिअम सेंटरसाठी ६० लाख, नांगरतास धबधबा, हिरण्यकेशी नदीचा उगम व मुख्य धबधबा नूतनीकरणासाठी मिळून दोन कोटी रुपये खर्ची घालण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, यातला एकही प्रकल्प पूर्ण न करताच निधी खर्च करण्यात आला. आज दहा वर्षानंतरही हे प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. यातल्या हर्बेरिअम सेंटर, फुलपाखरू उद्यान, पर्यटन महामंडळाच्या इमारतीत सध्या कुत्री, गायी वास्तव्यास असतात. याबाबत वारंवार सूचना देऊनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, असे ग्रामस्थ सांगतात. इतके सगळे जुने प्रकल्प बंद अवस्थेत असताना बांधकाम विभाग, वनविभाग व पर्यटन महामंडळ मिळून आणखी अनावश्यक पर्यटन प्रकल्प आंबोलीवर लादत आहेत. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कावळेशेत येथे बांधण्यात आलेली व्हीव्हीएम मेलरी. मुळातच खाली उभे राहून सुंदर नजारा दिसत असताना बांधकाम विभागाने पंधरा लाख रुपये खर्चून अक्राळविक्राळ अशी इमारत या पर्यटनस्थळावर उभारली. त्यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्यच नष्ट झाले आहे.आंबोलीतील सर्वच्या सर्व पर्यटनस्थळांवर चेंजींग रूम व शौचालय उभारण्यात आली. परंतु ही शौचालये व चेजींग रुम एकदाही कामी न येता त्याची मोडतोड झाली आहे. काहींचे दरवाजे गायब आहेत, तर पाणीच नसल्याने याचा कुणी वापरही करताना दिसत नाही. सौरउर्जेवर चालणारे दिवेही सर्व पर्यटनस्थळांवर उभारण्यात आले होते. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या दिव्यांच्या बॅटरी व सोलर पॅनलच एका महिन्याच्या आत चोरट्यांनी आणि अतिउत्साही पर्यटकांनी लांबविल्या. नूतनीकरण असो वा नव्या प्रकल्पांची उभारणी, आंबोली म्हणजे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे कुरणच बनले आहे. गेल्या दहा वर्षांत शासनाच्या अनेक विभागांकडून कोट्यवधी रुपये गडप करण्यात आले आहेत. पर्यटनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी आणायचा आणि ठेकेदार व संबंधित विभाग यांनी संगनमत करून तो निधी गडप करायचा, असा जणू सपाटाच आंबोलीत सुरू आहे. याउलट पर्यटनाचा गाजावाजा करणारे सिंधुदुर्गचे प्रशासनाला वारंवार आंबोलीत एकही सार्वजनिक शौचालय नसल्याची आठवण करून देऊनही अद्याप शौचालय उभारण्यात आलेले नाही. आंबोली रहिवाशी हॉटेल्सची शौचालये वगळता एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने पर्यटकही आंबोलीत थांबेनासे झाले आहेत.ग्रामपंचायतीचे दुर्लक्षआंबोली ग्रामपंचायत तर पर्यटनाशी आपले काही देणेघेणे नसल्याप्रमाणे वागत आहे. ग्रामपंचायत आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बेसुमार निधी अनावश्यक ठिकाणी खर्च करताना दिसत आहे. परंतु पर्यटनासाठी आवश्यक बाबींवर एकही रुपया खर्च करताना दिसत नाही. आंबोलीतील व्यावसायिकही पर्यटन विकासाच्या दृष्टीने उदास असल्याचे चित्र आहे. आंबोलीचा इतिहास पाहता आंबोलीत गेल्या दहा वर्षांत पर्यटनस्थळांची व येणाऱ्या पर्यटकांची अधोगतीच झाल्याचे दिसते. यावर स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला असून, येत्या काळातील पर्यटन विकासकामे जर स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना घेऊन करण्यात आली नाही, तर सर्वच्या सर्व कामे बंद करण्यात येतील, असा इशाराही दिला आहे.