शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीतील प्रकल्प सुरू करा

By admin | Updated: February 16, 2015 23:12 IST

लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत

महादेव भिसे -आंबोली हे राज्यात थंड हवेचे ठिकाण तसेच उत्कृष्ट पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे येथील पर्यटन प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. याचा परिणाम येथील पर्यटकांच्या उपस्थितीवर होत आहे. एकीकडे पर्यटनातून समृद्धी आणण्याच्या आणाभाका घेतल्या जात असताना, आंबोलीतील बंद पर्यटन प्रकल्पांकडे मात्र, दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येथील बंद पर्यटन प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. आंबोलीला २००५ साली कोकण पॅकेजच्या माध्यमातून सुमारे चार कोटी निधी देण्यात आला होता. परंतु गचाळ नियोजनामुळे हा निधी अनावश्यक व चुकीच्या पद्धतीने खर्च करण्यात आला. यात जंगल सफारी रस्त्यासाठी २५ लाख, पर्यटन महामंडळाच्या इमारती उभारणीसाठी पावणेदोन कोटी, हर्बेरिअम सेंटरसाठी ६० लाख, नांगरतास धबधबा, हिरण्यकेशी नदीचा उगम व मुख्य धबधबा नूतनीकरणासाठी मिळून दोन कोटी रुपये खर्ची घालण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, यातला एकही प्रकल्प पूर्ण न करताच निधी खर्च करण्यात आला. आज दहा वर्षानंतरही हे प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. यातल्या हर्बेरिअम सेंटर, फुलपाखरू उद्यान, पर्यटन महामंडळाच्या इमारतीत सध्या कुत्री, गायी वास्तव्यास असतात. याबाबत वारंवार सूचना देऊनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, असे ग्रामस्थ सांगतात. इतके सगळे जुने प्रकल्प बंद अवस्थेत असताना बांधकाम विभाग, वनविभाग व पर्यटन महामंडळ मिळून आणखी अनावश्यक पर्यटन प्रकल्प आंबोलीवर लादत आहेत. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कावळेशेत येथे बांधण्यात आलेली व्हीव्हीएम मेलरी. मुळातच खाली उभे राहून सुंदर नजारा दिसत असताना बांधकाम विभागाने पंधरा लाख रुपये खर्चून अक्राळविक्राळ अशी इमारत या पर्यटनस्थळावर उभारली. त्यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्यच नष्ट झाले आहे.आंबोलीतील सर्वच्या सर्व पर्यटनस्थळांवर चेंजींग रूम व शौचालय उभारण्यात आली. परंतु ही शौचालये व चेजींग रुम एकदाही कामी न येता त्याची मोडतोड झाली आहे. काहींचे दरवाजे गायब आहेत, तर पाणीच नसल्याने याचा कुणी वापरही करताना दिसत नाही. सौरउर्जेवर चालणारे दिवेही सर्व पर्यटनस्थळांवर उभारण्यात आले होते. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या दिव्यांच्या बॅटरी व सोलर पॅनलच एका महिन्याच्या आत चोरट्यांनी आणि अतिउत्साही पर्यटकांनी लांबविल्या. नूतनीकरण असो वा नव्या प्रकल्पांची उभारणी, आंबोली म्हणजे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे कुरणच बनले आहे. गेल्या दहा वर्षांत शासनाच्या अनेक विभागांकडून कोट्यवधी रुपये गडप करण्यात आले आहेत. पर्यटनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी आणायचा आणि ठेकेदार व संबंधित विभाग यांनी संगनमत करून तो निधी गडप करायचा, असा जणू सपाटाच आंबोलीत सुरू आहे. याउलट पर्यटनाचा गाजावाजा करणारे सिंधुदुर्गचे प्रशासनाला वारंवार आंबोलीत एकही सार्वजनिक शौचालय नसल्याची आठवण करून देऊनही अद्याप शौचालय उभारण्यात आलेले नाही. आंबोली रहिवाशी हॉटेल्सची शौचालये वगळता एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने पर्यटकही आंबोलीत थांबेनासे झाले आहेत.ग्रामपंचायतीचे दुर्लक्षआंबोली ग्रामपंचायत तर पर्यटनाशी आपले काही देणेघेणे नसल्याप्रमाणे वागत आहे. ग्रामपंचायत आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बेसुमार निधी अनावश्यक ठिकाणी खर्च करताना दिसत आहे. परंतु पर्यटनासाठी आवश्यक बाबींवर एकही रुपया खर्च करताना दिसत नाही. आंबोलीतील व्यावसायिकही पर्यटन विकासाच्या दृष्टीने उदास असल्याचे चित्र आहे. आंबोलीचा इतिहास पाहता आंबोलीत गेल्या दहा वर्षांत पर्यटनस्थळांची व येणाऱ्या पर्यटकांची अधोगतीच झाल्याचे दिसते. यावर स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला असून, येत्या काळातील पर्यटन विकासकामे जर स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना घेऊन करण्यात आली नाही, तर सर्वच्या सर्व कामे बंद करण्यात येतील, असा इशाराही दिला आहे.