शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

आंबोलीतील प्रकल्प सुरू करा

By admin | Updated: February 16, 2015 23:12 IST

लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत

महादेव भिसे -आंबोली हे राज्यात थंड हवेचे ठिकाण तसेच उत्कृष्ट पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे येथील पर्यटन प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. याचा परिणाम येथील पर्यटकांच्या उपस्थितीवर होत आहे. एकीकडे पर्यटनातून समृद्धी आणण्याच्या आणाभाका घेतल्या जात असताना, आंबोलीतील बंद पर्यटन प्रकल्पांकडे मात्र, दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येथील बंद पर्यटन प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. आंबोलीला २००५ साली कोकण पॅकेजच्या माध्यमातून सुमारे चार कोटी निधी देण्यात आला होता. परंतु गचाळ नियोजनामुळे हा निधी अनावश्यक व चुकीच्या पद्धतीने खर्च करण्यात आला. यात जंगल सफारी रस्त्यासाठी २५ लाख, पर्यटन महामंडळाच्या इमारती उभारणीसाठी पावणेदोन कोटी, हर्बेरिअम सेंटरसाठी ६० लाख, नांगरतास धबधबा, हिरण्यकेशी नदीचा उगम व मुख्य धबधबा नूतनीकरणासाठी मिळून दोन कोटी रुपये खर्ची घालण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, यातला एकही प्रकल्प पूर्ण न करताच निधी खर्च करण्यात आला. आज दहा वर्षानंतरही हे प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. यातल्या हर्बेरिअम सेंटर, फुलपाखरू उद्यान, पर्यटन महामंडळाच्या इमारतीत सध्या कुत्री, गायी वास्तव्यास असतात. याबाबत वारंवार सूचना देऊनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, असे ग्रामस्थ सांगतात. इतके सगळे जुने प्रकल्प बंद अवस्थेत असताना बांधकाम विभाग, वनविभाग व पर्यटन महामंडळ मिळून आणखी अनावश्यक पर्यटन प्रकल्प आंबोलीवर लादत आहेत. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कावळेशेत येथे बांधण्यात आलेली व्हीव्हीएम मेलरी. मुळातच खाली उभे राहून सुंदर नजारा दिसत असताना बांधकाम विभागाने पंधरा लाख रुपये खर्चून अक्राळविक्राळ अशी इमारत या पर्यटनस्थळावर उभारली. त्यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्यच नष्ट झाले आहे.आंबोलीतील सर्वच्या सर्व पर्यटनस्थळांवर चेंजींग रूम व शौचालय उभारण्यात आली. परंतु ही शौचालये व चेजींग रुम एकदाही कामी न येता त्याची मोडतोड झाली आहे. काहींचे दरवाजे गायब आहेत, तर पाणीच नसल्याने याचा कुणी वापरही करताना दिसत नाही. सौरउर्जेवर चालणारे दिवेही सर्व पर्यटनस्थळांवर उभारण्यात आले होते. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या दिव्यांच्या बॅटरी व सोलर पॅनलच एका महिन्याच्या आत चोरट्यांनी आणि अतिउत्साही पर्यटकांनी लांबविल्या. नूतनीकरण असो वा नव्या प्रकल्पांची उभारणी, आंबोली म्हणजे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे कुरणच बनले आहे. गेल्या दहा वर्षांत शासनाच्या अनेक विभागांकडून कोट्यवधी रुपये गडप करण्यात आले आहेत. पर्यटनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी आणायचा आणि ठेकेदार व संबंधित विभाग यांनी संगनमत करून तो निधी गडप करायचा, असा जणू सपाटाच आंबोलीत सुरू आहे. याउलट पर्यटनाचा गाजावाजा करणारे सिंधुदुर्गचे प्रशासनाला वारंवार आंबोलीत एकही सार्वजनिक शौचालय नसल्याची आठवण करून देऊनही अद्याप शौचालय उभारण्यात आलेले नाही. आंबोली रहिवाशी हॉटेल्सची शौचालये वगळता एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने पर्यटकही आंबोलीत थांबेनासे झाले आहेत.ग्रामपंचायतीचे दुर्लक्षआंबोली ग्रामपंचायत तर पर्यटनाशी आपले काही देणेघेणे नसल्याप्रमाणे वागत आहे. ग्रामपंचायत आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बेसुमार निधी अनावश्यक ठिकाणी खर्च करताना दिसत आहे. परंतु पर्यटनासाठी आवश्यक बाबींवर एकही रुपया खर्च करताना दिसत नाही. आंबोलीतील व्यावसायिकही पर्यटन विकासाच्या दृष्टीने उदास असल्याचे चित्र आहे. आंबोलीचा इतिहास पाहता आंबोलीत गेल्या दहा वर्षांत पर्यटनस्थळांची व येणाऱ्या पर्यटकांची अधोगतीच झाल्याचे दिसते. यावर स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला असून, येत्या काळातील पर्यटन विकासकामे जर स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना घेऊन करण्यात आली नाही, तर सर्वच्या सर्व कामे बंद करण्यात येतील, असा इशाराही दिला आहे.