शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मालवण बंदर जेटी येथील स्टॉल धारकांनी छेडले उपोषण, पुनर्वसन करताना प्रशासनाचा चालढकलपणा

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 20, 2023 17:12 IST

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी सहकार्य करत स्टॉलधारकांनी स्टॉल काढले होते

सिंधुदुर्ग : नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर मालवण येथे पंतप्रधान येणार असल्याने गेली कित्येक वर्षे मालवण बंदर जेटी परिसरात आपला वसविलेला व्यवसाय बंद करून ज्या प्रशासनाला सहकार्य केले तेच प्रशासन आता या स्टॉलधारकांच्या उदरनिर्वाहावर उटले आहेत. नौदल दिन उलटून १५ दिवसांचा कालावधी उलटला तरी या स्टॉलधारकांचे पुनर्वसन करण्याकडे महाराष्ट्र बंदर विभाग दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे या स्टॉल धारकांवर आता उपासमारीची वेळ आली असून, या स्टॉलधारकांनी आपल्याला मालवण बंदर जेटी परिसरात तात्पुरत्या स्वरूपात स्टॉल लावण्यास परवानगी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.मालवण जेटी बंदर आणि तारकर्ली बंदर जेटी परिसरात गेली कित्येक वर्षे स्थानिक तरुण तरुणी आणि नागरिक लहान मोठा स्टॉल लावून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र, ४ डिसेंबरला नौदल दिन साजरा होत असल्याने आणि या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी येत असल्याने या स्टॉलधारकांना आपले स्टॉल काढण्यासाठी बंदर विभागाकडून सांगण्यात आले होते. तसेच हा कार्यक्रम झाला की स्टॉलधारकांचे पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते असे यावेळी या स्टॉलधारकांचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितेंद्र केरकर यांनी सांगितले.

या स्टॉलधारकांनी प्रशासनाला आणि बंदर विभागाला पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी सहकार्य करत आपले स्टॉल काढले होते. मात्र, नौदल दिन साजरा होऊन १५ दिवसांचा कालावधी झाला तरी बंदर विभाग व प्रशासनाकडून या स्टॉल धारकांच्या पुनर्वसन केले जात नाही, तसेच त्यांना तात्पुरत्या स्वरूपात स्टॉल लावण्यास परवानगी दिली होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनाराfishermanमच्छीमार