शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावल्यास एसटी टिकेल : दिलीप पांढरपट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:48 IST

खेड्यापाड्यातील सर्वसामान्य प्रवाशांचा आधार एसटीची सेवा आहे. ही सेवा देत असताना सुरक्षितता व जागरूकताही तेवढीच महत्वाची आहे. सिंधुदुर्ग एस . टी . विभागात अपघातांचे प्रमाण कमी आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र , सर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावली तरच एसटी टिकेल, असे मत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावल्यास एसटी टिकेल : दिलीप पांढरपट्टे यांचे मत कणकवली येथे एसटीच्या सुरक्षितता मोहिम पंधरवड्याचे आयोजन

कणकवली : खेड्यापाड्यातील सर्वसामान्य प्रवाशांचा आधार एसटीची सेवा आहे. ही सेवा देत असताना सुरक्षितता व जागरूकताही तेवढीच महत्वाची आहे. सिंधुदुर्ग एस . टी . विभागात अपघातांचे प्रमाण कमी आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र , सर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावली तरच एसटी टिकेल, असे मत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केले.राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने ११ ते २५ जानेवारी २०२० या कालावधीत सुरक्षितता मोहिम पंधरवड्याचे आयोजन केले आहे . या मोहिमेच्या शुभारंभ शनिवारी कणकवली येथे झाला . यावेळी डॉ. दिलीप पांढरपट्टे बोलत होते .यावेळी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ , उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ . नितीन कटेकर , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी , तहसिलदार आर. जे. पवार, एसटीचे विभागिय यंत्र अभियंता आर. एल. कांबळे, कणकवली आगार व्यवस्थापक प्रमोद यादव, इंटकचे विभागिय अध्यक्ष अशोक राणे, कामगार संघटनेचे विभागिय सचिव विनय राणे, श्रीमती कुबडे, निलेश लाड, वाहन निरीक्षक जावेद शिकलगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, गोसावी, सरनोबत व इतर अधिकारी उपस्थित होते .डॉ. पांढरपट्टे म्हणाले, एसटीला लोकवाहिनी म्हटले जाते. एसटीचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास ही बाब ग्रामिण भागातील प्रत्येकाच्या मनावर बिंबलेली आहे. एखाद्या किरकोळ चुकीमुळेही गंभीर अपघात होऊ शकतो, यासाठी सुरक्षितता ही अत्यंत महत्वाची आहे. मार्गावर असणाऱ्या होडींग, बॅनर यांच्यावरही नियंत्रण असायला हवे , कारण त्यापासूनही अपघात होऊ शकतात. तसेच चालकांचे आरोग्यही तेवढेच महत्वाचे आहे.त्यादृष्टीने लक्ष देण्याची गरज आहे . जागरूकता कायम ठेवली तर अपघाताचे प्रमाण आणखीन कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असेही पांढरपट्टे म्हणाले. यावेळी नितीन कटेकर यांनी सुरक्षिततेकडे लक्ष केंद्रीत केले जात आहे, ही बाब निश्चितच चांगली असल्याचे स्पष्ट करताना जगभरातील एकून वाहन संख्येच्या १ टक्के वाहने भारतात आहेत .मात्र जगभरात होणाऱ्या रस्ते अपघाताच्या ६ टक्के अपघात भारतात होतात व एकूण मृत्यूच्या १० टक्के लोक भारतातील मरतात , असे स्पष्ट केले . अनेकदा अपघात वाहनांचा जास्त वेग , दारू पिऊन वाहन चालविणे , वाहन चालविताना बोलणे किंवा चालकाला पुरेशी विश्रांती नसणे यामुळे होत असतात.

प्रसाद दळवी म्हणाले, अपघात सांगून येत नसतात . पण आवश्यक काळजी , सुरक्षितता घेतली तर अपघात टाळता येऊ शकतात . यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना . कायदे करण्यात येत आहेत . मात्र ,केवळ कायदे करून दंड वाढवून प्रश्न सुटणार नाहीत. तर मानसिकतेत बदल व्हायला हवा , असे सांगितले .तर अवैध वाहतूक रोखण्यासाठी पथक कार्यरत असल्याचे सांगितले.प्रास्ताविक करताना प्रकाश रसाळ म्हणाले, गत वर्षभरात सिंधुदुर्ग विभागात ५३ अपघात झाले . यात ६ प्राणांतीक , ३४ गंभीर व १३ किरकोळ होते . यापोटी ८६ लाखांची भरपाई एसटीकडून देण्यात आले आहेत. एसटीकडून सुरक्षिततेबाबतच्या सूचना देण्यात येत असतात. हा पंधरवडा सुरक्षितता मोहिम म्हणून राबविण्यात येत असला तरीही आपण कायम सुरक्षिततेला प्राधान्य देत काम केले पाहिजे , असे संगितले . यावेळी आर . एल . कांबळे , अशोक राणे . विनय राणे आदींनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन अभय खडपकर यांनी केले तर आभार रविंद्र भिसे यांनी मानले . 

टॅग्स :state transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग