शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

चिपी विमानतळाला गती द्या, राजन तेलींची केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडे मागणी 

By अनंत खं.जाधव | Updated: July 1, 2024 16:06 IST

सावंतवाडी : चिपी विमानतळ प्रकल्प हा पर्यटन सिंधुदुर्गच्या विकासाचा मानबिंदू आहे. त्यामुळे विमानतळ सुव्यवस्थितरित्या सुरू राहणे हे जिल्हयाच्या विकासाला ...

सावंतवाडी : चिपी विमानतळ प्रकल्प हा पर्यटन सिंधुदुर्गच्या विकासाचा मानबिंदू आहे. त्यामुळे विमानतळ सुव्यवस्थितरित्या सुरू राहणे हे जिल्हयाच्या विकासाला अधिक गती देणारे ठरणार आहे. सद्यस्थितीत हा प्रकल्प गतीमान करण्याची मागणी भाजपचे नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, चिपी विमानतळाला योग्य प्रतिसाद मिळवायचा असल्यास या दरम्यानच्या परिसरात राज्य शासनाच्या माध्यमातून उद्योग खात्यातर्फे एमआयडीसी निर्मितीला चालना मिळावी. परिसरातील शेतकऱ्यांच्या संमतीने एमआयडीसी सुरू करता येईल का, याची पाहणी करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत आपल्याकडे ही विमानसेवा सुरू आहे. मुंबई ते चिपी तिकीट ४० टक्के कमी दरात उपलब्ध होत आहे. केंद्र सरकारकडे पुढील काही वर्ष ही विशेष सेवा सुरू राहण्यासाठी प्रस्ताव मांडावा.सिंधुदुर्ग जिल्हयाच्या सीमेवर मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू झाला आहे. तिथे प्रतिदिन विमान उड्डाणसेवा जास्त व दर माफक असल्याने तेथे प्रवासी संख्या जास्त आहे. चिपी एअरपोर्टवरील तिकीट दर कमी ठेवला आणि उड्डाण संख्या वाढली तर प्रवासी संख्या नक्की वाढेल, यादृष्टीने विचार व्हावा. एअरपोर्ट अॅथॉरिटीमार्फत उत्तर गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हवाई कॉम्बो प्लॅनचा पर्याय द्यावा. त्यासाठी समोरील खाडीत जेटी उभारून जलप्रवास सोय/परवानगी उपलब्ध करून द्यावी. बॅ. नाथ पै विमानतळाला नाईट लैंडिंगची परवानगी असूनही कंपनीला परवडत नसल्यामुळे ती सुरू करत नाहीत. यात लक्ष घालून मार्ग काढावा, असे त्यांनी सूचित केलेय. यावर मंत्री मोहोळ यांनी यात लक्ष घालू असे आश्वासन दिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गmurlidhar moholमुरलीधर मोहोळRajan Teliराजन तेली Airportविमानतळ