शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

चाकरमान्यांसाठी गाड्यांची खास सोय, एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:08 IST

गणेशोत्सवासाठी मुंबईहून सिंधुदुर्गात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाकडून ३० आॅगस्टपर्यंत ११७ गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये २१ गाड्यांचे ग्रुप बुकींग आतापर्यंत झाले असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देचाकरमान्यांसाठी गाड्यांची खास सोय, परतीच्या प्रवासासाठी सज्ज एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाचे नियोजन

कणकवली : गणेशोत्सवासाठी मुंबईहून सिंधुदुर्गात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्यासिंधुदुर्ग विभागाकडून ३० आॅगस्टपर्यंत ११७ गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये २१ गाड्यांचे ग्रुप बुकींग आतापर्यंत झाले असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.सिंधुदुर्गातील विविध बसस्थानकांवरून ठाणे, मुंबई सेंट्रल व बोरिवली आदी स्थानकांपर्यंत या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातून शुक्रवारी १५ जादा गाड्या चाकरमान्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या. एसटीच्या या व्यवस्थेमुळे चाकरमान्यांची चांगली सोय झाली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवातही मुंबईवरून चाकरमान्यांना गावी येण्यासाठी एसटी महामंडळाकडून जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. १२ आॅगस्टपर्यंत या जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या जादा गाड्यांचा अनेक चाकरमान्यांनी लाभ घेतला.आता या चाकरमान्यांना परत मुंबईला जाण्यासाठी सिंधुदुर्गातून जादा गाड्या सोडण्यास सुरुवात झाली आहे. ३० आॅगस्टपर्यंत या जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत.कणकवली, सावंतवाडी, मालवण, देवगड, विजयदुर्ग, फोंडाघाट, वेंगुर्ला, कुडाळ आदी बसस्थानकांवरून या गाड्या मुंबईला सोडण्यात येत आहेत. एसटीच्या गाडीमध्ये २२ प्रवाशांना घेऊन या गाड्या सोडण्यात येत आहेत. या गाड्यांमधील प्रवाशांकडून सर्व नियमांचे पालन होत आहे.चाकरमान्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवरून ९६ गाड्या तर ग्रुप बुकींगच्या २१ गाड्या सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, प्रवाशांनी मागणी केल्यास त्यांच्या गावातून ग्रुप बुकींगच्या माध्यमातून एसटीच्या गाडीची मुंबई येथे जाण्यासाठी सोय उपलब्ध केली जाणार आहे.गाड्या उपलब्धसिंधुदुर्गातील बसस्थानकांवरून थेट प्रवाशांना घेऊन या गाड्या मुंबईला जाणार आहेत. त्यामुळे अद्यापही गाड्यांचे प्रवाशांकडून आरक्षण केले जात आहे. तसेच ग्रुप बुकींगसाठीही गाड्या उपलब्ध केल्या जात आहेत. चाकरमान्यांना मुंबईला परत जाणे सोयीचे व्हावे यासाठी एसटी महामंडळाकडून या जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. 

टॅग्स :state transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग