शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
2
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
3
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
4
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
5
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
6
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
7
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
8
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
9
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
10
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
11
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
12
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
13
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
14
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
15
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
16
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
17
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
18
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
19
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
20
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...

कणकवलीत १७ ऑगस्टपासुन गणेशोत्सवासाठी खास नियोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 20:52 IST

कणकवली: गणेशोत्सवाला २२ ऑगस्ट पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने कणकवली शहरात विविध साहित्य खरेदीसाठी व इतर कारणांसाठी मोठ्या प्रमाणात ...

ठळक मुद्देपार्कींगबरोबरच भाजीपाला,फळे विक्रीची व्यवस्था;नियम तोडणार्‍यांवर करणार कारवाई :समीर नलावडे यांची माहिती

कणकवली: गणेशोत्सवाला २२ ऑगस्ट पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने कणकवली शहरात विविध साहित्य खरेदीसाठी व इतर कारणांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

या अनुषंगाने नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून कणकवली शहरात १७ ऑगस्ट पासून पार्कींग व्यवस्था, भाजीपाला विक्री, फळेविक्री, एकदिशामार्ग अमलबजावणी यांचे नियोजन करण्यात आले असून नगगरपंचायतीने ठरवुन दिलेल्या जागेतच व्यवसाय करण्याचे बंधन विक्रेत्यांवर घालण्यात आले आहे.

कणकवलीतयेणार्‍यांची कोणतीही गैरसोय होवू नये. त्याना सहजरित्या गर्दीविना साहित्य खरेदी करता यावे. या उद्देशाने नियोजन केले असल्याची माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठकीचे आयोजन बुधवारी कऱण्यात आले होते. यावेळी नगरसेवक बंडु हर्णे, मेघा गांगण, अभिजीत मुसळे, विराज भोसले यांच्यासह महेश सावंत, बंडु गांगण, मिथुन ठाणेकर आदी उपस्थित होते.त्या बैठकीनंतर सर्वानुमते झालेल्या निर्णयाची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यानी दिली.

ते म्हणाले, गणेशोत्सवानिमित्ताने शहरात पार्कींगची व्यवस्था करण्यात आली असून लक्झरी गाड्या व ट्रक , टेम्पोसाठी मराठा मंडळ रस्ता व नरडवे रोडवर व्यवस्था करण्यात आली आहे. धान्याचा ट्रक बाजारात आणण्यास परवानगी देण्यात येईल. त्याचप्रमाणे चारचाकी गाड्यांच्या पार्कींगची व्यवस्था हॉटेल हॉर्नबील समोर त्याचप्रमाणे एस.टी.स्टँन्डसमोरील पुलाखाली करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाजी,फळे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरुन व्यवस्था करण्यात आली आहे.

यामध्ये अप्पासाहेब पटवर्धन चौक ते एस.टी.स्टँन्डपर्यंत पुलाखाली दोन बाजूने बसण्यास परवानगी देण्यात आली आहे . त्याचप्रमाणे गावठी बाजार हा अप्पासाहेब पटवर्धन चौक ते अभ्युदय बँक पुलाखाली पिलरच्या बाजुने भरविला जाणार आहे.

त्याचप्रमाणे फिरते व्यावसायिक, फळविक्रेते याना बाजारपेठ व डिपीरोडवर बसण्यास परवानगी दिली जाणार नाही. तेलीआळी रोडवर ते व्यवसाय करु शकतील.कणकवली आचरा रोडवर होणारी वाहतुक कोंडी व अप्पासाहेब पटवर्धन चौकात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता असल्याने आचरा रोडवरुन येणारी वाहने जर नांदगाव, तळेरे येथे जाणार असतील तर त्याना मसुरकर किनई रस्त्याने वळविण्यासाठी तेथे पोलिस ठेवण्यात येतील. असे समीर नलावडे म्हणाले.

त्याचप्रमाणे कणकवलीत व्यापारासाठी महामार्गाच्या बाजूने रेषा आखली जाणार असून त्याच्या बाहेर बसणार्‍यांवर नगरपंचायत पथकाच्या माध्यमातुन कारवाई केली जाईल असेही समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले.

तसेच नियोजनात काही बदल झाल्यास नगरपंचायतीच्यावतीने नागरिकांना वेळोवेळी त्याबाबत सूचना देण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. असेही ते यावेळी म्हणाले.

अफवांवरविश्वासठेवूनका !

कणकवली बाजारपेठ सात ऑगस्टनंतर बंद ठेवणार असल्याची अफवा काही लोक पसरवित आहेत. अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये . कणकवलीत काही ठिकाणी असलेले कंटेन्मेंट झोन हे दोनचार दिवसात उठतील. त्यानंतर संपुर्ण बाजारपेठ सुरु राहणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन समीर नलावडे यानी यावेळी केले.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारsindhudurgसिंधुदुर्ग