शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे बळीराजा लागला कामाला, बांदा परिसरात पेरणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 13:34 IST

गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या मान्सुनपूर्व पावसाने बांदा परीसरात मंगळवारपासून दमदार हजेरी लावली. दिवसभर मान्सुनपूर्व पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे मृग नक्षत्र कोरडे गेल्याने आज येणार, उद्या येणार अशा हुलकावणी देणाऱ्या वातावरणामुळे चिंताग्रस्त बनलेल्या बळीराजाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. मान्सुनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा आपल्या शेतीच्या कामात व्यस्थ असल्याचे चित्र दिसत आहे. ​

ठळक मुद्देपावसामुळे बळीराजा लागला कामाला, बांदा परिसरात पेरणीला वेगमृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी होता चिंतातूर

बांदा : गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या मान्सुनपूर्व पावसाने बांदा परीसरात मंगळवारपासून दमदार हजेरी लावली. दिवसभर मान्सुनपूर्व पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे मृग नक्षत्र कोरडे गेल्याने आज येणार, उद्या येणार अशा हुलकावणी देणाऱ्या वातावरणामुळे चिंताग्रस्त बनलेल्या बळीराजाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. मान्सुनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा आपल्या शेतीच्या कामात व्यस्थ असल्याचे चित्र दिसत आहे.बांदा परिसरात मान्सुनपूर्व पावसाची प्रतीक्षा होती. वरूणराजाच्या आगमनाकडे बळीराजा चातकाप्रमाने डोळे लावून बसला होता. संपूर्ण मृगनक्षत्र यावर्षी कोरडे गेले. त्यामुळे चिंता वाढली होती. त्यातच चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. यामुळे चिंतेत आणखीनच भर पडली होती. पावसाने हजेरी लावल्यामुळे उष्णतेच्या माऱ्याने हैराण झालेल्या बळीराजाला दिलासा मिळाला.दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी शेतीकामात गुंतला असून भात पेरणीच्या कामाने आता वेग घेतला आहे. बाजारपेठेत भात बियाण्यांचे दर वाढलेले असताना सुद्धा शेतकऱ्यांचा कल खरेदी करताना दिसत आहे. बांदा, वाफोली, विलवडे, इन्सुली, पाडलोस, मडुरा, रोणापाल, शेर्ले, न्हावेली, कास, सातोसे, निगुडे भागातील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. वर्षभर पुरेल एवढे धान्य (भात) राबवून घेतले जाते.यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावल्याने मशागत पूर्ण करून बळीराजाचे डोळे पावसाकडे लागले होते. मात्र, प्रत्यक्षात मंगळवारपासून वरुणराजा बरसण्यास प्रारंभ झाल्यामुळे बळीराजा पेरणीच्या कामात गुंतला आहे.पारंपरिक व आधुनिक पद्धतीने शेतीचे काम सुरु असून मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. बहुतांश या भागातील शेतकऱ्यांनी रानटी प्राण्यांच्या उपद्रवाला कंटाळून शेतीकडे पाठ फिरवली असूनशेकडो एकर जमीन पडीक राहिली आहे. उपद्रवी प्राण्यांचा वावर वनविभागाने थांबवून आमची शेती, बागायती तसेच अन्य लागवड वाचविण्याची मागणी स्थानिक शेतककडून होत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग