शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पावसामुळे बळीराजा लागला कामाला, बांदा परिसरात पेरणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 13:34 IST

गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या मान्सुनपूर्व पावसाने बांदा परीसरात मंगळवारपासून दमदार हजेरी लावली. दिवसभर मान्सुनपूर्व पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे मृग नक्षत्र कोरडे गेल्याने आज येणार, उद्या येणार अशा हुलकावणी देणाऱ्या वातावरणामुळे चिंताग्रस्त बनलेल्या बळीराजाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. मान्सुनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा आपल्या शेतीच्या कामात व्यस्थ असल्याचे चित्र दिसत आहे. ​

ठळक मुद्देपावसामुळे बळीराजा लागला कामाला, बांदा परिसरात पेरणीला वेगमृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी होता चिंतातूर

बांदा : गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या मान्सुनपूर्व पावसाने बांदा परीसरात मंगळवारपासून दमदार हजेरी लावली. दिवसभर मान्सुनपूर्व पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे मृग नक्षत्र कोरडे गेल्याने आज येणार, उद्या येणार अशा हुलकावणी देणाऱ्या वातावरणामुळे चिंताग्रस्त बनलेल्या बळीराजाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. मान्सुनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा आपल्या शेतीच्या कामात व्यस्थ असल्याचे चित्र दिसत आहे.बांदा परिसरात मान्सुनपूर्व पावसाची प्रतीक्षा होती. वरूणराजाच्या आगमनाकडे बळीराजा चातकाप्रमाने डोळे लावून बसला होता. संपूर्ण मृगनक्षत्र यावर्षी कोरडे गेले. त्यामुळे चिंता वाढली होती. त्यातच चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. यामुळे चिंतेत आणखीनच भर पडली होती. पावसाने हजेरी लावल्यामुळे उष्णतेच्या माऱ्याने हैराण झालेल्या बळीराजाला दिलासा मिळाला.दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी शेतीकामात गुंतला असून भात पेरणीच्या कामाने आता वेग घेतला आहे. बाजारपेठेत भात बियाण्यांचे दर वाढलेले असताना सुद्धा शेतकऱ्यांचा कल खरेदी करताना दिसत आहे. बांदा, वाफोली, विलवडे, इन्सुली, पाडलोस, मडुरा, रोणापाल, शेर्ले, न्हावेली, कास, सातोसे, निगुडे भागातील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. वर्षभर पुरेल एवढे धान्य (भात) राबवून घेतले जाते.यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावल्याने मशागत पूर्ण करून बळीराजाचे डोळे पावसाकडे लागले होते. मात्र, प्रत्यक्षात मंगळवारपासून वरुणराजा बरसण्यास प्रारंभ झाल्यामुळे बळीराजा पेरणीच्या कामात गुंतला आहे.पारंपरिक व आधुनिक पद्धतीने शेतीचे काम सुरु असून मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. बहुतांश या भागातील शेतकऱ्यांनी रानटी प्राण्यांच्या उपद्रवाला कंटाळून शेतीकडे पाठ फिरवली असूनशेकडो एकर जमीन पडीक राहिली आहे. उपद्रवी प्राण्यांचा वावर वनविभागाने थांबवून आमची शेती, बागायती तसेच अन्य लागवड वाचविण्याची मागणी स्थानिक शेतककडून होत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग