शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

गेल्या सहा महिन्यांची वीज देयके माफ करा ! भाजपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 16:14 IST

राज्य शासनाने दरमहा ३०० युनिट पर्यंत वापर असणारे सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील ६ महिन्यांची वीज देयके माफ करावी . अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपच्यावतीने विजवितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देगेल्या सहा महिन्यांची वीज देयके माफ करा ! भाजपची मागणी कणकवली येथे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

कणकवली : कोरोना महामारीमुळे देशात आणि राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. या काळात रोजीरोटीच बंद असल्याने उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय या सर्वांचीच दमछाक झाली आहे. त्यामुळे सर्व महिन्यांची वीज देयके येताच जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

राज्य शासनाने दरमहा ३०० युनिट पर्यंत वापर असणारे सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील ६ महिन्यांची वीज देयके माफ करावी . अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपच्यावतीने विजवितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याकडे केली आहे.कणकवली येथील वीज वितरणच्या विभागीय कार्यालयावर मंगळवारी भाजपच्या शिष्टमंडळाने धडक दिली . तसेच जनतेच्या व्यथा कार्यकारी अभियंत्यांसमोर मांडल्या. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली , कणकवली मंडल अध्यक्ष राजन चिके,संतोष कानडे, वैभववाडी मंडल अध्यक्ष नासीर काझी, देवगड मंडल अध्यक्ष रवी पाळेकर ,भालचंद्र साठे, जिल्हापरिषद समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, वैभववाडी माजी उपसभापती हर्षदा हरयाण ,रमेश पावसकर,बुलंद पटेल,मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, पप्पू पुजारे, बबलू सावंत, राजू पेडणेकर, सुशील सावंत,प्रकाश पारकर, अण्णा कोदे , समर्थ राणे आदी उपस्थित होते.यावेळी कार्यकारी अभियंत्यांना निवेदनही देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे गेले ६ महिने घरात बसून काढावे लागल्याने हातावर पोट असलेल्या आणि पगारावर अवलंबून असलेल्या सर्वांचीच दमछाक झाली आहे. लॉकडाऊन काही अंशी कमी असले तरी अजूनही अनेकांची रोजीरोटी सुरु झालेली नाही. गाठीशी असलेला थोडाबहुत पैसाही संपत आला आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात उपासमारीची भीती डोकावू लागली आहे. अनेकांना घरभाडे भरता आलेले नाही . त्याचबरोबर वीज बिलही भरता येत नाही.वीजदर वाढीबद्दल अगोदरच लोकांच्या मनात नाराजी आहे. त्यातच रोजीरोटी सुरु नसताना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा ? असा प्रश्न आहे. याचवेळी महावितरण कडून वीज बिले भरण्याचा तगादा सुरु आहे. त्यामुळे लोकांमधील असंतोष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्य वीज नियामक कायद्यातील कलम ४ चा वापर करुन तातडीने सर्व वीज देयकांना स्थगिती देऊन ३०० युनिट पर्यत वीज वापर करणाऱ्या सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील ६ महिन्यांची वीज देयके माफ करावी.केंद्र शासनाने जाहीर केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेजमध्ये सर्व राज्याच्या वीज वितरण कंपनींना ९० हजार कोटींचे अर्थ सहाय्य जाहीर केलेले आहे. यातील सुमारे ३ हजार कोटी रुपये राज्य सरकार वीज वितरण कंपनीकडे जमा झाले आहेत. यामुळे राज्यातील जनतेची ३०० युनिटपर्यंतची वीज बिल माफ करणे सहज शक्य आहे. त्यामुळे आमची असलेली वीज बिल माफ करण्याची मागणी शासनापर्यंत पोहचवावी. असेही या निवेदनात म्हटले आहे.कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी !यावेळी ' सत्ताधारी महाविकास आघाडीचा निषेध असो' , 'ठाकरे सरकार हाय, हाय' , 'भरमसाठ विजबिले मागे घ्या', ' वाढीव वीजबिल आकार कमी करा' अशा जोरदार घोषणा भाजप कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग