शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या सहा महिन्यांची वीज देयके माफ करा ! भाजपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 16:14 IST

राज्य शासनाने दरमहा ३०० युनिट पर्यंत वापर असणारे सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील ६ महिन्यांची वीज देयके माफ करावी . अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपच्यावतीने विजवितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देगेल्या सहा महिन्यांची वीज देयके माफ करा ! भाजपची मागणी कणकवली येथे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

कणकवली : कोरोना महामारीमुळे देशात आणि राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. या काळात रोजीरोटीच बंद असल्याने उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय या सर्वांचीच दमछाक झाली आहे. त्यामुळे सर्व महिन्यांची वीज देयके येताच जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

राज्य शासनाने दरमहा ३०० युनिट पर्यंत वापर असणारे सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील ६ महिन्यांची वीज देयके माफ करावी . अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपच्यावतीने विजवितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याकडे केली आहे.कणकवली येथील वीज वितरणच्या विभागीय कार्यालयावर मंगळवारी भाजपच्या शिष्टमंडळाने धडक दिली . तसेच जनतेच्या व्यथा कार्यकारी अभियंत्यांसमोर मांडल्या. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली , कणकवली मंडल अध्यक्ष राजन चिके,संतोष कानडे, वैभववाडी मंडल अध्यक्ष नासीर काझी, देवगड मंडल अध्यक्ष रवी पाळेकर ,भालचंद्र साठे, जिल्हापरिषद समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, वैभववाडी माजी उपसभापती हर्षदा हरयाण ,रमेश पावसकर,बुलंद पटेल,मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, पप्पू पुजारे, बबलू सावंत, राजू पेडणेकर, सुशील सावंत,प्रकाश पारकर, अण्णा कोदे , समर्थ राणे आदी उपस्थित होते.यावेळी कार्यकारी अभियंत्यांना निवेदनही देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे गेले ६ महिने घरात बसून काढावे लागल्याने हातावर पोट असलेल्या आणि पगारावर अवलंबून असलेल्या सर्वांचीच दमछाक झाली आहे. लॉकडाऊन काही अंशी कमी असले तरी अजूनही अनेकांची रोजीरोटी सुरु झालेली नाही. गाठीशी असलेला थोडाबहुत पैसाही संपत आला आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात उपासमारीची भीती डोकावू लागली आहे. अनेकांना घरभाडे भरता आलेले नाही . त्याचबरोबर वीज बिलही भरता येत नाही.वीजदर वाढीबद्दल अगोदरच लोकांच्या मनात नाराजी आहे. त्यातच रोजीरोटी सुरु नसताना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा ? असा प्रश्न आहे. याचवेळी महावितरण कडून वीज बिले भरण्याचा तगादा सुरु आहे. त्यामुळे लोकांमधील असंतोष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्य वीज नियामक कायद्यातील कलम ४ चा वापर करुन तातडीने सर्व वीज देयकांना स्थगिती देऊन ३०० युनिट पर्यत वीज वापर करणाऱ्या सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील ६ महिन्यांची वीज देयके माफ करावी.केंद्र शासनाने जाहीर केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेजमध्ये सर्व राज्याच्या वीज वितरण कंपनींना ९० हजार कोटींचे अर्थ सहाय्य जाहीर केलेले आहे. यातील सुमारे ३ हजार कोटी रुपये राज्य सरकार वीज वितरण कंपनीकडे जमा झाले आहेत. यामुळे राज्यातील जनतेची ३०० युनिटपर्यंतची वीज बिल माफ करणे सहज शक्य आहे. त्यामुळे आमची असलेली वीज बिल माफ करण्याची मागणी शासनापर्यंत पोहचवावी. असेही या निवेदनात म्हटले आहे.कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी !यावेळी ' सत्ताधारी महाविकास आघाडीचा निषेध असो' , 'ठाकरे सरकार हाय, हाय' , 'भरमसाठ विजबिले मागे घ्या', ' वाढीव वीजबिल आकार कमी करा' अशा जोरदार घोषणा भाजप कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग