शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

मालवणात लवकरच मत्स्य दुष्काळ परिषद :२० रोजी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 13:00 IST

जिल्ह्यातील रापण आणि गिलनेटधारक मच्छिमारांना भेडसावणाऱ्या मत्स्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मालवणात लवकरच मत्स्य दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमालवणात लवकरच मत्स्य दुष्काळ परिषद :२० रोजी बैठकपरिषदेबाबत मत्स्य दुष्काळाबाबतची भूमिका जाणून घेतली जाणार

मालवण : जिल्ह्यातील रापण आणि गिलनेटधारक मच्छिमारांना भेडसावणाऱ्या मत्स्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मालवणात लवकरच मत्स्य दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.

अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यांचा फटकाही मत्स्य व्यवसायास बसत असल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही परिषद घेतली जाणार आहे. दुष्काळ परिषदेचे स्वरूप व रुपरेषा आखण्यासाठी जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमारांची बैठक २० जानेवारी रोजी मालवणात होणार असल्याचे मच्छिमारांनी सांगितले.मत्स्य दुष्काळाच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासंदर्भात पारंपरिक मच्छिमारांची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत मत्स्य दुष्काळ परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आली. यावेळी मिथुन मालंडकर, आबा वाघ, महेंद्र पराडकर, नितीन परुळेकर, भाऊ मोरजे, वसंत गावकर, संतोष देसाई, रॉकी डिसोजा, संजय जामसंडेकर, संदीप शेलटकर, नारायण शेलटकर आदी उपस्थित होते.या परिषदेस पारंपरिक मच्छिमारांसाठी कार्यरत असलेल्या देश व राज्यस्तरावरील विविध मच्छिमार संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मत्स्य अभ्यासक यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच लोकप्रतिनिधींनाही या बैठकीस आमंत्रित करून त्यांची मत्स्य दुष्काळाबाबतची भूमिका जाणून घेतली जाणार आहे.सिंधुदुर्गसह राज्यातील सागरी पारंपरिक मच्छिमार शासनाकडे मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याची मागणी गेले वर्षभर करीत आहेत. परंतु मत्स्य दुष्काळ जाहीर केला गेलेला नाही. मत्स्य दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासकीय निकष आडवे येत असतील तर ते बदलण्याची आज गरज आहे इतकी परिस्थिती गंभीर आहे.यावर्षीच्या मत्स्य हंगामात बांगडा, पापलेट, तारली, सौंदाळा, पेडवे, कोळंबी आदी महत्त्वाचे मासे पारंपरिक मच्छिमारांना मिळण्याचे प्रमाण प्रचंड घटले आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.बेकायदेशीर मासेमारीमुळेच मत्स्य दुष्काळमासे मिळत नसल्याने मासेमारीचे प्रमाण घटले आहे. मच्छिमारांच्या जेवणातूनही मासे गायब झाले आहेत. हीच परिस्थिती शासनासमोर व्यापक स्वरूपात मांडून पारंपरिक मच्छिमारांना न्याय मिळवून देण्यासाठी मत्स्य दुष्काळ परिषदेचे आयोजन करणार असल्याचे पारंपरिक मच्छिमारांनी सांगितले. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स आणि एलईडी पर्ससीनद्वारे होणारी बेकायदेशीर अतोनात मासेमारी यामुळे मत्स्य दुष्काळाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग