शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

मालवणात लवकरच मत्स्य दुष्काळ परिषद :२० रोजी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 13:00 IST

जिल्ह्यातील रापण आणि गिलनेटधारक मच्छिमारांना भेडसावणाऱ्या मत्स्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मालवणात लवकरच मत्स्य दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमालवणात लवकरच मत्स्य दुष्काळ परिषद :२० रोजी बैठकपरिषदेबाबत मत्स्य दुष्काळाबाबतची भूमिका जाणून घेतली जाणार

मालवण : जिल्ह्यातील रापण आणि गिलनेटधारक मच्छिमारांना भेडसावणाऱ्या मत्स्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मालवणात लवकरच मत्स्य दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.

अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यांचा फटकाही मत्स्य व्यवसायास बसत असल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही परिषद घेतली जाणार आहे. दुष्काळ परिषदेचे स्वरूप व रुपरेषा आखण्यासाठी जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमारांची बैठक २० जानेवारी रोजी मालवणात होणार असल्याचे मच्छिमारांनी सांगितले.मत्स्य दुष्काळाच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासंदर्भात पारंपरिक मच्छिमारांची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत मत्स्य दुष्काळ परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आली. यावेळी मिथुन मालंडकर, आबा वाघ, महेंद्र पराडकर, नितीन परुळेकर, भाऊ मोरजे, वसंत गावकर, संतोष देसाई, रॉकी डिसोजा, संजय जामसंडेकर, संदीप शेलटकर, नारायण शेलटकर आदी उपस्थित होते.या परिषदेस पारंपरिक मच्छिमारांसाठी कार्यरत असलेल्या देश व राज्यस्तरावरील विविध मच्छिमार संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मत्स्य अभ्यासक यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच लोकप्रतिनिधींनाही या बैठकीस आमंत्रित करून त्यांची मत्स्य दुष्काळाबाबतची भूमिका जाणून घेतली जाणार आहे.सिंधुदुर्गसह राज्यातील सागरी पारंपरिक मच्छिमार शासनाकडे मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याची मागणी गेले वर्षभर करीत आहेत. परंतु मत्स्य दुष्काळ जाहीर केला गेलेला नाही. मत्स्य दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासकीय निकष आडवे येत असतील तर ते बदलण्याची आज गरज आहे इतकी परिस्थिती गंभीर आहे.यावर्षीच्या मत्स्य हंगामात बांगडा, पापलेट, तारली, सौंदाळा, पेडवे, कोळंबी आदी महत्त्वाचे मासे पारंपरिक मच्छिमारांना मिळण्याचे प्रमाण प्रचंड घटले आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.बेकायदेशीर मासेमारीमुळेच मत्स्य दुष्काळमासे मिळत नसल्याने मासेमारीचे प्रमाण घटले आहे. मच्छिमारांच्या जेवणातूनही मासे गायब झाले आहेत. हीच परिस्थिती शासनासमोर व्यापक स्वरूपात मांडून पारंपरिक मच्छिमारांना न्याय मिळवून देण्यासाठी मत्स्य दुष्काळ परिषदेचे आयोजन करणार असल्याचे पारंपरिक मच्छिमारांनी सांगितले. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स आणि एलईडी पर्ससीनद्वारे होणारी बेकायदेशीर अतोनात मासेमारी यामुळे मत्स्य दुष्काळाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग