शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी

मालवणात लवकरच मत्स्य दुष्काळ परिषद :२० रोजी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 13:00 IST

जिल्ह्यातील रापण आणि गिलनेटधारक मच्छिमारांना भेडसावणाऱ्या मत्स्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मालवणात लवकरच मत्स्य दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमालवणात लवकरच मत्स्य दुष्काळ परिषद :२० रोजी बैठकपरिषदेबाबत मत्स्य दुष्काळाबाबतची भूमिका जाणून घेतली जाणार

मालवण : जिल्ह्यातील रापण आणि गिलनेटधारक मच्छिमारांना भेडसावणाऱ्या मत्स्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मालवणात लवकरच मत्स्य दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.

अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यांचा फटकाही मत्स्य व्यवसायास बसत असल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही परिषद घेतली जाणार आहे. दुष्काळ परिषदेचे स्वरूप व रुपरेषा आखण्यासाठी जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमारांची बैठक २० जानेवारी रोजी मालवणात होणार असल्याचे मच्छिमारांनी सांगितले.मत्स्य दुष्काळाच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासंदर्भात पारंपरिक मच्छिमारांची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत मत्स्य दुष्काळ परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आली. यावेळी मिथुन मालंडकर, आबा वाघ, महेंद्र पराडकर, नितीन परुळेकर, भाऊ मोरजे, वसंत गावकर, संतोष देसाई, रॉकी डिसोजा, संजय जामसंडेकर, संदीप शेलटकर, नारायण शेलटकर आदी उपस्थित होते.या परिषदेस पारंपरिक मच्छिमारांसाठी कार्यरत असलेल्या देश व राज्यस्तरावरील विविध मच्छिमार संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मत्स्य अभ्यासक यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच लोकप्रतिनिधींनाही या बैठकीस आमंत्रित करून त्यांची मत्स्य दुष्काळाबाबतची भूमिका जाणून घेतली जाणार आहे.सिंधुदुर्गसह राज्यातील सागरी पारंपरिक मच्छिमार शासनाकडे मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याची मागणी गेले वर्षभर करीत आहेत. परंतु मत्स्य दुष्काळ जाहीर केला गेलेला नाही. मत्स्य दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासकीय निकष आडवे येत असतील तर ते बदलण्याची आज गरज आहे इतकी परिस्थिती गंभीर आहे.यावर्षीच्या मत्स्य हंगामात बांगडा, पापलेट, तारली, सौंदाळा, पेडवे, कोळंबी आदी महत्त्वाचे मासे पारंपरिक मच्छिमारांना मिळण्याचे प्रमाण प्रचंड घटले आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.बेकायदेशीर मासेमारीमुळेच मत्स्य दुष्काळमासे मिळत नसल्याने मासेमारीचे प्रमाण घटले आहे. मच्छिमारांच्या जेवणातूनही मासे गायब झाले आहेत. हीच परिस्थिती शासनासमोर व्यापक स्वरूपात मांडून पारंपरिक मच्छिमारांना न्याय मिळवून देण्यासाठी मत्स्य दुष्काळ परिषदेचे आयोजन करणार असल्याचे पारंपरिक मच्छिमारांनी सांगितले. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स आणि एलईडी पर्ससीनद्वारे होणारी बेकायदेशीर अतोनात मासेमारी यामुळे मत्स्य दुष्काळाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग