शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दूध उत्पादकांच्या समस्या सोडविणार

By admin | Updated: January 12, 2015 21:47 IST

रणजीत देसाई : सिंधुदुर्गनगरीत दूध उत्पादक संस्थांची बैठक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू झाले असून त्याचे चांगले चित्र जिल्ह्यात दिसू लागले आहे. मात्र, तरीही जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असून त्या गोकुळ आणि जिल्हा परिषद लक्ष घालून सोडवेल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी सिंधुदुर्गनगरी येथील दुग्ध उत्पादक संस्थांच्या बैठकीत दिली.जिल्हा परिषद भवनातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुग्ध उत्पादक सहकारी संस्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी व या संस्थांना बळकटी देण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने या बैठकीचे आयोजन केले होते. यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी ‘गोकुळ’चे व्यवस्थापक डॉ. मोजक, जिल्हा परिषद सदस्य सतीश सावंत, जिल्हा बँकेच्या संचालिका नीता राणे, सुगंधा साटम, संग्राम प्रभूगावकर, गोकुळचे तानाजी डोगळे, संस्था अध्यक्ष, सचिव, आदी उपस्थित होते.जिल्ह्यात दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी गोकुळबरोबरच जिल्हा परिषदही आपल्या योजना प्रभावीपणे राबवील, अशी ग्वाही रणजीत देसाई यांनी दिली. गोकुळचे नियम, निकष आणि योजनाही कोल्हापूर आणि अन्य भागांप्रमाणे सिंधुदुर्गसाठीही तशाच आहेत. यातून शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल, तर ते प्रश्न सोडविण्यात येतील, असेही गोकुळचे व्यवस्थापक डॉ. मोगल यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू : सावंतशेतकऱ्यांनी दुग्ध उत्पादन वाढविताना त्याच्या दर्जाकडेही लक्ष द्यावे. दर्जा टिकविण्यास त्याला चांगला दरही मिळेल. जर दर्जा असतानाही दर मिळाला नाही, संकलनामध्ये दुधाची तूट आली आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर हे प्रश्न गोकुळमार्फत सोडविले जातील, असेही सतीश सावंत यांनी सांगितले.