शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्यातच ‘समाधान’

By admin | Updated: October 7, 2015 00:01 IST

ग्रामस्थांच्या डोळेझाकवृत्तीने उद्देशाला बगल : योजना राबविण्यासाठी प्रबोधनाची गरज

राजन वर्धन --सावंतवाडी--शासनामार्फत राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणींचा आढावा घेण्यासाठी शासन स्तरावर समाधान योजना राबविण्यात येते; पण यावेळी उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्यातच ठरावीक ग्रामस्थ समाधान मानत आहेत. केवळ ग्रामस्थांच्या या डाळेझाकपणामुळे समाधान योजनेच्या मुख्य उद्देशाला बगल मिळत आहे. यासाठी शासनासह पक्षीय तसेच संघटनात्मक पातळीवरही प्रबोधन होणे गरजेचे बनले आहे. ग्रामस्थांच्या ‘समाधाना’साठी अधिकाऱ्यांचा अनमोल वेळ आणि योजनांची सखोल मिळणारी माहिती शासनाचे ‘असमाधान’ करणारी ठरत आहे. शासनाच्या विविध योजनांतून समाजातील सर्व थरांचा, सर्व घटकांचा विकास साधण्यासाठी रोज नवनवीन प्रयत्न सुरू असतात. यातीलच एक भाग म्हणून जवळपास २५५ च्या वर जनकल्याण योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहेत. यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत पातळीवरील योजनांचा समावेश आहे. शिवाय या योजनांत कृषी, आरोग्य, समाजकल्याण, रोजगार हमी योजना आदी क्षेत्रातील योजनांचा समावेश आहे. या सर्व योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळून त्यातून सामाजिक सर्वांगीण विकास व्हावा, असा दृष्टिकोन ठेवून योजना राबविल्या जात आहेत. काही अपवादात्मक स्थितीत सार्वत्रिकदृष्ट्या ‘उपेक्षित’ असणाऱ्यांनाही या योजनांचा लाभ वरिष्ठांच्या कायदेशीर संमतीने दिला जातो. यामुळे या योजनांमधून सर्वांगीण विकासाठीची कवाडे खुली झाली आहेत. या योजनांतून उपेक्षित, समाजातील मागास राहिलेल्यांचीही प्रगती झाली आहे. त्यांचा उंचावलेला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर या योजनांचीच परिणिती आहे. एकंदरीत समाजाचा अपेक्षित विकास होण्यासाठीच्या या विविध योजना प्रगतीचा मुख्याधार बनून राहिल्या आहेत. शासन अशा योजनांवर म्हणूनच कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत आहेत. या योजनांमध्ये शासनाचाही चेहरा अप्रत्यक्षपणे दडलेला असतो. शासकीय योजनांची ही एक बाजू जरी खरी असली; तरी दुसऱ्या बाजूने विचार करता, अनेक ठिकाणी या योजना लाटण्याचे प्रकार घडलेत. शिवाय ‘कागदोपत्री’च काही योजना राबविण्यात आल्याचेही निदर्शनास आले. यामुळे अनेकजण गब्बरही झाले आहेत, तर अनेकांचे राजकीय व सामाजिक जीवन यावरच आधारलेले आहे. जर या व्यक्तींच्या आयुष्यातून या योजना वजा केल्या, तर त्यांच्या जीवनातील ‘अर्थ’ संपणार आहे, यात तीळमात्र शंका नाही. याची प्रचिती आल्यानंतर शासन पातळीवरून सजग होऊन विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. यामध्ये योजनांची घटनास्थळी पाहणी, लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची सत्यता तपासणी, अधिकाऱ्यांचे शेरे, प्रकल्पाचा लाभार्थ्यांसह फोटो आदी बाबींची तपासणी करण्यात येऊ लागली. प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या चौकशीसाठीही प्रशासनाने कंबर कसली, पण सारासार विचार करता ग्रामस्थ व संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी किंवा संगनमताने या योजना लाटण्याचा प्रकार वाढीस लागल्याचे आढळून आले. त्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे होते. यातूनच प्रत्यक्षात या योजना राबविण्यासाठी जबाबदार असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांसमक्ष ग्रामस्थांची बैठक बोलावून योजनेची खल करण्याच्या दृष्टीने समांतर बैठक घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम म्हणजेच ‘राजस्व अभियान समाधान योजना’ होय. यावेळी घेण्यात येणाऱ्या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांत, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती सभापती तसेच महसूल, ग्रामपंचायत विभाग व ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती असते. यावेळी ग्रामस्थांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून योजनेबाबत सर्व माहिती, लाभार्थ्यांची निवड आणि योजनेची नेटकी अंमलबजावणी कशी करता येईल, याचा ऊहापोह होणे गरजेचे होते. मात्र, योजनेच्या या मुख्य उद्देशालाच बगल दिली जात आहे. योजनेची ना माहिती, ना उद्देश आणि लाभार्थी पात्रतेच्या निकषाची माहिती न घेताच अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याच्या पद्धतीत वाढ झाली आहे. ठिकठिकाणच्या समाधान योजनेच्या बैठकीत अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याच्या या प्रकाराची अनुभूती येत आहे. त्यामुळे ही योजना राबविण्यास भविष्यात अधिकाऱ्यांची नकारार्थी भूमिका तयार झाल्यास नवल वाटावयास नको. वास्तविक या योजनेतून अधिकाऱ्यांच्या संमतीने, सहविचाराने पात्र योजना मिळविणे आणि त्यांची अंमलबजावणी करून विकास साधण्यासाठी सविस्तर माहिती मिळविणे हे अपेक्षित आहे. मात्र, याला बगल देत अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्यातच समाधान मानले जात आहे.जनतेच्या डोळेझाक वृत्तीने काही ‘ठरावीक’ मंडळी या प्रकाराने शासकीय अधिकाऱ्यांवर आपला दबाव राखण्याचा शिताफीने प्रयत्न करत आहेत; पण जनतेने हे वेळीच ओळखून ही योजना राबविण्यासाठी स्वपुढाकार घेणे अत्यावश्यक आहे. राजकीय पक्षांनीही याबाबत गांभीर्याने लक्ष घालून जनतेचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यांनाही ही जनसंपर्र्काची नवी संधीच मिळणार आहे. आगामी नियोजित असणाऱ्या बैठकांमध्येतरी हा बदल अनुभवावयास मिळणे गरजेचे आहे. ‘समाधान योजना’ ही खऱ्या अर्थाने शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची अंमलबजावणी बरोबरच लाभार्थी आणि संबंधित अधिकाऱ्यांसमक्ष प्रशासनात प्रामाणिक बांधिलकी जोपासणारी उत्तम योजना आहे. पण या योजनेबाबत वेगळाच गैरसमज करून अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रकार अनुभवावयास मिळत आहे. जनतेने सजगतेने या बैठकीला सामोरे जाताना शासकीय योजनांची सविस्तर माहिती घेणे आणि त्याचा लाभ मिळविण्यासाठी किंबहुना प्रत्यक्षात लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिक व नि:पक्षपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरी आगामी गावात राबविण्यात येणाऱ्या या योजनेबाबत ग्रामस्थांनी ग्रामसेवक, तलाठी व संबंधित अधिकाऱ्यांकडून योजनांची, लाभार्थ्यांची माहिती घ्यावी व योजनेचा उद्देश सफल करावा. - व्ही. बी. वरेरकरतहसीलदार उपविभागीय अधिकारी सावंतवाडी.योजेनेच्या पुढील बैठकांचे नियोजन१३ आॅक्टोबर २०१५- आंबेली (दोडामार्ग), १० नोव्हेंबर- सांगेली (सावंतवाडी), ८ डिसेंबर-पालये (दोडामार्ग), १२ जानेवारी २०१६-पलतड (वेंगुर्ले), ९ फेब्रुवारी-नाणोस (सावंतवाडी), १५ मार्च- मळई (वेंगुर्ले), १२ एप्रिल-विलवडे (सावंतवाडी), १० मे- झोंळब े(दोडामार्ग).