शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

CoronaVirus Lockdown : कणकवली बाजारपेठेत शुकशुकाट, नागरिकांचा संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 16:22 IST

कणकवली शहरात संचारबंदीचे नियम कडक केल्यानंतर बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पसरला आहे. दुचाकींना रस्त्यावर फिरण्यास बंदी केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली बाजारपेठांमध्ये गर्दी करणाऱ्यांना आळा बसला आहे. सकाळच्या वेळेत काही प्रमाणात अजूनही नागरिक रस्त्यावर दिसून येत असले तरी दुपारी १२ वाजल्यानंतर मात्र सर्वत्र शांतता पसरलेली दिसून येते.

ठळक मुद्देकणकवली बाजारपेठेत शुकशुकाट, नागरिकांचा संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद घरपोच जीवनावश्यक वस्तू देण्यावर शहरातील व्यापाऱ्यांचा भर

कणकवली : कणकवली शहरात संचारबंदीचे नियम कडक केल्यानंतर बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पसरला आहे. दुचाकींना रस्त्यावर फिरण्यास बंदी केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली बाजारपेठांमध्ये गर्दी करणाऱ्यांना आळा बसला आहे. सकाळच्या वेळेत काही प्रमाणात अजूनही नागरिक रस्त्यावर दिसून येत असले तरी दुपारी १२ वाजल्यानंतर मात्र सर्वत्र शांतता पसरलेली दिसून येते.दरम्यान, पोलिसांकडून शुक्रवारीही संचारबंदी कडक करण्यात आली होती. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळाव्यात यासाठी प्रशासनाने व्यापारी तसेच विक्रेते यांच्याशी चर्चा करून नियोजन केले आहे.त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी कमी होत आहे. सकाळी ८ ते ११ यावेळेत नागरिक बाजारपेठेत दिसत आहेत. मात्र, सकाळी ११ वाजल्यानंतर गर्दी ओसरून बाजारपेठेत शुकशुकाट पसरत आहे. दुपारी १२ वाजल्यानंतर उन्हाचे प्रमाण जास्त असल्याने लोक घराबाहेर पडायला बघत नाहीत. मात्र, सायंकाळी ५ वाजल्यानंतर पुन्हा लोकांचा फेरफटका सुरू होतो. तो कमी होणे आवश्यक आहे.

पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात केल्याने आता गर्दी कमी झाली आहे. पण घराबाहेर पडण्याची संधी कधी मिळते असे अनेकांना झालेले पहायला मिळते. यामध्ये तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्याला होईल. या भीतीने घराबाहेर न पडणाºयांची संख्या फारच कमी आहे. त्यापेक्षा पोलीस कारवाईची भीती बाळगून अनेक जण घरात बसत आहेत. मात्र, नागरिकांनी घरातच बसणे त्यांच्या व समाजाच्या सध्याच्या या काळात हिताचे आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे.भाजीपाला, दूध, कडधान्य आदी जीवनावश्यक साहित्य नागरिकांना घरपोच देण्याची सुविधा कणकवली शहरात उपलब्ध करण्यात आली आहे. आजूबाजूच्या गावातही अशाच प्रकारची सेवा हळूहळू देण्यात येत आहे. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होण्याचे प्रमाण कमी होत आहे. पण उत्सुकतेपोटी बाजारात येणाऱ्या लोकांची काही कमी नाही. त्यांना आता पोलीस कारवाईला सामोरे जावे लागत आहे.सतत गजबजणारे बसस्थानक सुने सुनेसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या कणकवली शहरातील बसस्थानक नेहमीच गजबजलेले असते. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रवासीच नसल्याने एसटीच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कणकवली बसस्थानक प्रवासी व गाड्यांच्या अभावी सुने सुने झाले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग