शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

CoronaVirus Lockdown : कणकवली बाजारपेठेत शुकशुकाट, नागरिकांचा संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 16:22 IST

कणकवली शहरात संचारबंदीचे नियम कडक केल्यानंतर बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पसरला आहे. दुचाकींना रस्त्यावर फिरण्यास बंदी केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली बाजारपेठांमध्ये गर्दी करणाऱ्यांना आळा बसला आहे. सकाळच्या वेळेत काही प्रमाणात अजूनही नागरिक रस्त्यावर दिसून येत असले तरी दुपारी १२ वाजल्यानंतर मात्र सर्वत्र शांतता पसरलेली दिसून येते.

ठळक मुद्देकणकवली बाजारपेठेत शुकशुकाट, नागरिकांचा संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद घरपोच जीवनावश्यक वस्तू देण्यावर शहरातील व्यापाऱ्यांचा भर

कणकवली : कणकवली शहरात संचारबंदीचे नियम कडक केल्यानंतर बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पसरला आहे. दुचाकींना रस्त्यावर फिरण्यास बंदी केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली बाजारपेठांमध्ये गर्दी करणाऱ्यांना आळा बसला आहे. सकाळच्या वेळेत काही प्रमाणात अजूनही नागरिक रस्त्यावर दिसून येत असले तरी दुपारी १२ वाजल्यानंतर मात्र सर्वत्र शांतता पसरलेली दिसून येते.दरम्यान, पोलिसांकडून शुक्रवारीही संचारबंदी कडक करण्यात आली होती. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळाव्यात यासाठी प्रशासनाने व्यापारी तसेच विक्रेते यांच्याशी चर्चा करून नियोजन केले आहे.त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी कमी होत आहे. सकाळी ८ ते ११ यावेळेत नागरिक बाजारपेठेत दिसत आहेत. मात्र, सकाळी ११ वाजल्यानंतर गर्दी ओसरून बाजारपेठेत शुकशुकाट पसरत आहे. दुपारी १२ वाजल्यानंतर उन्हाचे प्रमाण जास्त असल्याने लोक घराबाहेर पडायला बघत नाहीत. मात्र, सायंकाळी ५ वाजल्यानंतर पुन्हा लोकांचा फेरफटका सुरू होतो. तो कमी होणे आवश्यक आहे.

पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात केल्याने आता गर्दी कमी झाली आहे. पण घराबाहेर पडण्याची संधी कधी मिळते असे अनेकांना झालेले पहायला मिळते. यामध्ये तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्याला होईल. या भीतीने घराबाहेर न पडणाºयांची संख्या फारच कमी आहे. त्यापेक्षा पोलीस कारवाईची भीती बाळगून अनेक जण घरात बसत आहेत. मात्र, नागरिकांनी घरातच बसणे त्यांच्या व समाजाच्या सध्याच्या या काळात हिताचे आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे.भाजीपाला, दूध, कडधान्य आदी जीवनावश्यक साहित्य नागरिकांना घरपोच देण्याची सुविधा कणकवली शहरात उपलब्ध करण्यात आली आहे. आजूबाजूच्या गावातही अशाच प्रकारची सेवा हळूहळू देण्यात येत आहे. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होण्याचे प्रमाण कमी होत आहे. पण उत्सुकतेपोटी बाजारात येणाऱ्या लोकांची काही कमी नाही. त्यांना आता पोलीस कारवाईला सामोरे जावे लागत आहे.सतत गजबजणारे बसस्थानक सुने सुनेसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या कणकवली शहरातील बसस्थानक नेहमीच गजबजलेले असते. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रवासीच नसल्याने एसटीच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कणकवली बसस्थानक प्रवासी व गाड्यांच्या अभावी सुने सुने झाले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग