शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

सिंधुदुर्गची रसिकता प्रतिष्ठानने समृद्ध केली : प्रसाद कांबळी यांचे गौरवोद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:35 IST

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने गेली 27 वर्ष नाट्य चळवळ खऱ्या अर्थाने जीवंत ठेवली आहे. त्याचबरोबर नाट्यमहोत्सवात प्रायोगिक नाटके सादर करून सिंधुदुर्गची रसिकता समृद्ध केली आहे असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी काढले .

ठळक मुद्दे सिंधुदुर्गची रसिकता प्रतिष्ठानने समृद्ध केली : प्रसाद कांबळी यांचे गौरवोद्गारआचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्योत्सवाचे उद्घाटन

कणकवली : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने गेली 27 वर्ष नाट्य चळवळ खऱ्या अर्थाने जीवंत ठेवली आहे. त्याचबरोबर नाट्यमहोत्सवात प्रायोगिक नाटके सादर करून सिंधुदुर्गची रसिकता समृद्ध केली आहे असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी काढले .कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या 27 व्या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी प्रसाद कांबळी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे , आचरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित, अ‍ॅड.नारायण देसाई आदी उपस्थित होते.प्रसाद कांबळी म्हणाले, रंगभूमीच्या ऊर्जितावस्थेसाठी रसिकांचे पाठबळ महत्वाचे आहे. त्यासाठी प्रतिष्ठानसारख्या नाट्य संस्था भक्कम व्हायला हव्यात. सर्व रंगकर्मीनी जबाबदारीने काम करून रंगभूमीचे महत्त्व टिकवायला हवे आणि नवीन पिढी रंगभूमीवर यायला हवी. त्याअनुषंगाने यापुढे प्रतिष्ठानच्या नाट्य महोत्सवात दरवर्षी एक व्यावसायिक नाटक सादर करण्याची जबाबदारी माझी असेल.मी सध्या नाट्य परिषदेचा अध्यक्ष आहे. एका वर्षात आम्ही दोन नाट्यसंमेलने आयोजित केली. आता 100 व्या नाट्यसंमेलनात प्रतिष्ठानचा सहभाग महत्त्वाचा असेल. रंगभूमीविषयी इथली माणसं निष्ठेने काम करतात. कोकणातला माणूस चोखंदळ नाट्यरसिक आहे. मुंबईतील नाट्य चळवळ त्यांच्यामुळेच जिवंत राहिली आहे.

डॉ.दिलीप पांढरपट्टे म्हणाले, कोकणी माणूस हा सगळ्याच कलेवर प्रेम करणारा माणूस आहे. तरीही त्यात त्याचे नाटकावर जास्त प्रेम आहे कोकणच्या सांस्कृतिक क्षेत्रात नाटकाचे मोठे स्थान आहे. आचरेकर प्रतिष्ठानमुळे उत्तमोत्तम नाटके येथे पाहायला मिळाली.वामन पंडित म्हणाले, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानला जागा मिळवून देण्यात माजी जिल्हाधिकारी भूषण गगराणी यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी आपल्या अधिकार्‍यासह नाट्यगृहासाठी ही आताची जागा शोधण्याचा प्रयत्न केला. आपल्या सारख्या चोखंदळ नाट्य रसिकांमुळे हा नाट्योत्सव 27 वर्षे चालू आहे. यापुढेही रसिकांचे असेच सहकार्य लाभावे. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकsindhudurgसिंधुदुर्ग