शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिंधुदुर्ग : राणे स्वाभिमान मिळविणार की भाजपचे कमळ फुलणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 15:08 IST

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल गुरुवार १२ एप्रिल रोजी स्पष्ट होणार आहे. भाजपाच्या कोट्यातून राज्यसभा खासदार झालेले नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष आणि भाजप-शिवसेना युतीमध्ये ही याठिकाणी लढत होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. नारायण राणे यांच्यासाठी कणकवलीतील निवडणूक ही अस्तित्वाची लढाई आहे.

ठळक मुद्देराणे स्वाभिमान मिळविणार की भाजपचे कमळ फुलणार ?संपूर्ण राज्याचे लक्ष : कणकवली नगरपंचायतीचा गुरूवारी निकाल

महेश सरनाईक 

सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल गुरुवार १२ एप्रिल रोजी स्पष्ट होणार आहे. भाजपाच्या कोट्यातून राज्यसभा खासदार झालेले नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष आणि भाजप-शिवसेना युतीमध्ये ही याठिकाणी लढत होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. नारायण राणे यांच्यासाठी कणकवलीतील निवडणूक ही अस्तित्वाची लढाई आहे.नारायण राणे हे भाजपाचे खासदार आहेत असे असताना राणे यांनी कणकवलीत भाजपा विरोधातच दंड थोपटले आहेत. त्यामुळे राणे यांचा विजय होतो की भाजपाचा हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कणकवली नगरपंचायत निवडणूक ही सिंधुदुर्गच्या राजकारणाची दिशा ठरविणारी असते. नारायण राणे यांना विरोध म्हणून शिवसेनेने येथे भाजपाशी युती केली आहे.नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी भाजप शिवसेना युतीकडून नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे संदेश पारकर हे माजी नगराध्यक्ष निवडणूक रिंगणात आहेत. तर स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केल्याने या आघाडीचे समीर नलावडे हे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत. गाव विकास आघाडीतर्फे राकेश राणे आणि काँग्रेसतर्फे विलास कोरगावकर हे अन्य दोन उमेदवार रिंगणात असल्याने नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होत आहे.कणकवली नगरपंचायतीच्या १६ आणि नगराध्यक्ष पदासाठी ६ एप्रिलला मतदान झाले. तर प्रभाग १0 मध्ये बुधवार ११ एप्रिलला मतदान होत आहे. त्यानंतर गुरूवारी १२ एप्रिलला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. येथील तहसील कार्यालयात मतमोजणी होणार असून त्याची तयारी देखील केली आहे. त्यामुळे कणकवलीचा नगराध्यक्ष कोण होणार? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.अनोख्या निवडणुकीची राज्यभर चर्चानारायण राणे भाजपातर्फे राज्यसभेवर खासदार आहेत. नारायण राणेंचे सुपूत्र नीतेश राणे काँग्रेसचे आमदार आहेत. असे असताना राणे किवा नीतेश यांना त्यांच्या स्वाभिमान पक्षासाठी मतदान करा, असे जाहीर आवाहन करता येत नव्हते.

राणे आणि नीतेश या दोघांनीही स्वाभिमान पक्षासाठी काम केले. मात्र, त्यांनी या निवडणुकीत कुठल्याच पक्षाचा उल्लेख न करता केवळ उमेदवारांना टार्गेट केले. तर दुसरीकडे राज्यभरात एकमेंकावर दररोज चिखलफेक करणारे राज्यातील सत्ताधारी शिवसेना-भाजप येथे एकत्र लढले. त्यामुळे कणकवलीच्या या अनोख्या निवडणुकीची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली होती.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग