शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

सिंधुदुर्ग : शेतकऱ्यांसाठी राज्यसभेत आवाज उठविणार : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 14:24 IST

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्यानेच या बँकेचा फायदा तळागाळातील जनतेला होत आहे. शेतकऱ्यांची पत निर्माण करणाऱ्या या जिल्हा बँकेला जिल्ह्याबाहेर व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासोबत राज्यसभेत आवाज उठविणार असल्याची ग्वाही खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटनहसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची उपस्थिती

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्यानेच या बँकेचा फायदा तळागाळातील जनतेला होत आहे. शेतकऱ्यांची पत निर्माण करणाऱ्या या जिल्हा बँकेला जिल्ह्याबाहेर व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासोबत राज्यसभेत आवाज उठविणार असल्याची ग्वाही खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना दिली.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीच्या वास्तूचे उद्घाटन व नवीन पाच योजनांचा शुभारंभ नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, पद्मश्री डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक मंडळ आदी उपस्थित होते.डी. वाय. पाटील साखर कारखान्याला प्रारंभ करताना एकही राष्ट्रीय बँक कर्ज द्यायला तयार नव्हती. मात्र, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने कर्ज पुरवठा केला. आता त्याच राष्ट्रीय बँका आमच्या कारखान्याला रेड कार्पेट घालायला तयार झाल्या आहेत. मात्र, आम्ही जिल्हा बँकेलाच प्राधान्य देणार आहोत. असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.यावेळी हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकांना जिल्ह्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांना शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाला पाहिजे. यासाठी नारायण राणे यांनी दिल्लीत पाठपुरावा करावा, अशी विनंती केली.जिल्हा बँकेच्या नवीन पाच योजना जाहीरजिल्हा बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाचे औचित्य साधून नावीन्यपूर्ण अशा पाच योजना जाहीर करण्यात आल्या. या योजनांमध्ये उद्योग व्यवसायासाठी दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज देणे, पडीक जमिनीवर काजू व बांबू लागवडीसाठी आठ टक्क्यांपर्यंत कर्ज देणे, भाग्यलक्ष्मी वासरू संगोपन करणे, धनलक्ष्मी कुक्कुटपालन योजनेंतर्गत महिलांना पंधरा हजारांपर्यत कर्ज देणे आणि रिक्षा खरेदीसाठी विनातारण पतपुरवठा करणे अशा पाच योजना सुरू करण्यात आल्या. या योजनांच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफsindhudurgसिंधुदुर्ग