शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

उद्योग प्रशिक्षण केंद्रामुळे सिंधुदुर्ग तरुणांना नोकरी, व्यवसाय देणारा जिल्हा ठरणार - केंद्रीय मंत्री राणे

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 11, 2024 19:21 IST

सिंधुदुर्गनगरी येथील एमएसएमई विभागाचे प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन

सिंधुदुर्ग : भारत सरकारच्या या आधुनिक उद्योग प्रशिक्षण केंद्रामुळे भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा तरुणांना नोकरी देणारा आणि व्यवसाय देणारा जिल्हा ठरेल असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. ते एमएसएमई विभागाच्या प्रशिक्षण केंद्राच्या भूमिपूजन व शिलान्यास कार्यक्रमांत बोलत होते.सिंधुदुर्गनगरी येथील एमएसएमई विभागाचे प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन, शिलान्यास केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार नीलेश राणे, केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे अपर सचिव तथा विकास आयुक्त डॉ. रजनीश, दिल्ली येथील सुधा केसरी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, एमएसएमई मंत्रालयाचे नागपूर येथील संचालक पी. एम. पार्लेवार आदी उपस्थित होते.

सुरुवातील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते विविध भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर या प्रशिक्षण केंद्राच्या इमारत भूमिपूजन शिलान्यासचे अनावरण करण्यात आले. तदनंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे अपर सचिव तथा विकास आयुक्त डॉ. रजनीश म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवीन उद्योजकांना घडविण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी भारत सरकारचे आधुनिक उद्योग प्रशिक्षण केंद्र या जिल्ह्यात सिंधुनगरीत होत आहे. या प्रशिक्षण केंद्रावर १६५ कोटी २८ लाख भारत सरकार खर्च करणार आहे. पीएम विश्वकर्मा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना देशभर राबविली जात असताना या योजनेला आणखी बळकटी देण्यासाठी सिंधुदुर्गातील तरुण-तरुणींना आधुनिक प्रशिक्षण देणाऱ्या या प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन सोहळा सोमवारी केंद्रीय सूक्ष्म लघू मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाला आहे.

समाजाच्या विकासासाठी प्रयत्नकेंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्गनगरी येथे उभे राहत असलेल्या आधुनिक उद्योग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून तरुण-तरुणींना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण नंतर त्यांना योग्य अशा ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. या प्रशिक्षण केंद्रामुळे जिल्ह्याच्या बाहेर जाणार युवक जिल्ह्यातच थांबणार आहे. आपल्या बरोबर समाजाचाही विकास व्हावा अशी आपली धारणा असून आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या सोबतच समाजाचाही विकास व्हावा यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनदेखील मंत्री राणे यांनी यावेळी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे