शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

सिंधुुदुर्ग : पाडलोसवासीयांचा उपवनसंरक्षकांना घेराओ, गव्यांकडून पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 13:46 IST

गव्यांकडून झालेल्या नुकसानीची कल्पना देऊनही सहा दिवस झाले तरी पंचनामा न केल्याने आक्रमक झालेल्या पाडलोस पंचक्रोशी गावातील ग्रामस्थांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना घेराओ घालत जाब विचारला.

ठळक मुद्देपाडलोसवासीयांचा उपवनसंरक्षकांना घेराओ, गव्यांकडून पिकांचे नुकसान  सहा दिवस झाले तरी नुकसानीबाबत पंचनामे नाहीत; शेतकरी आक्रमक

सिंधुुदुर्ग : गव्यांकडून झालेल्या नुकसानीची कल्पना देऊनही सहा दिवस झाले तरी पंचनामा न केल्याने आक्रमक झालेल्या पाडलोस पंचक्रोशी गावातील ग्रामस्थांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना घेराओ घालत जाब विचारला.

दरम्यान, पंचनामा करण्यास वेळ नसेल तर आम्हाला सेवेत घ्या आम्ही शेतकऱ्यांसाठी झटतो, असे ग्रामस्थांकडून सुनावण्यात आले. यावेळी आपण तत्काळ पंचनामा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कल्पना देतो, असे आश्वासन समाधान चव्हाण यांनी शेतकऱ्यांना दिले.मडुरा, पाडलोसमध्ये गव्यांनी पिकांची नासधूस करण्याचे सत्र सुरु असतानाच वनविभागाने शेतकऱ्यांप्रती दाखविलेल्या उदासीनतेपोटी पाडलोस पंचक्रोशीसह आरोस गावातील शेतकऱ्यांनी सावंतवाडी वनविभाग कार्यालयातील सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना घेराव घातला.यावेळी शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, पाडलोस उपसरपंच महादेव गावडे, मडुरा ग्रामकमिटी माजी अध्यक्ष दिलीप परब, बाळा परब, मडुरा शाखाप्रमुख श्रीकृष्ण भोगले, सुधीर गावडे, बापू गावडे, अमोल माधव, गोविंद माधव, विजय गवंडी, आजगाव वनपाल अमित कटके, पाडलोस वनपाल विशाल पाटील तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी राजू शेटकर म्हणाले की, वनविभागाच्या उदासिन भुमिकेमुळे आज शेतकरी पंचनाम्याकडे पाठ फिरवत आहेत. पंचनामा केला तरी मिळणारी तुटपुंजी भरपाई सावंतवाडी कार्यालयात येण्याजाण्यासाठीच खर्च होते. शेतकऱ्यांनी वनपालांना ते पंचनाम्यासाठी येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वन कर्मचाऱ्यांना कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.दरम्यान अशा उपद्रवी जंगली प्राण्यांपासून शेती वाचवायची असेल तर सौरकुंपणाचा प्रयोग करणे आवश्यक आहे. तसेच दोन दिवसांतून एकदा वनपाल यांनी गावात भेट देऊन पोलीस मित्राप्रमाणे वनमित्र तयार केले पाहिजेत. तरच शेतकऱ्यांच्या समस्या सुटू शकतील.

आम्ही बँकेमधून कर्ज घेऊन बागायती केल्या. परंतु, रात्रीच्या वेळी गव्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे आम्ही कर्ज भरणा कसे करणार, आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.  नविभागाने अशा उपद्रवी प्राण्यांवर योग्य ती उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येस सर्वस्वी वनविभाग जबाबदार राहणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

सौरकुंपणाचा लाभ घ्यायावेळी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्याची भरपाई त्यांना मिळणार आहे. तसेच नावीन्यपूर्ण योजनेतून शेतकऱ्यांनी ८० टक्के अनुदान व २० टक्के भरणा या तत्वावर सौरकुंपण घालून घ्यावे. याचा प्रयोग पाडलोस येथे बाळा परब यांच्या बागेत करणार असल्याचे सांगितले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सौरकुंपणाचा लाभ घ्यावा असे, आवाहनही चव्हाण यांनी केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग