शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

सिंधुुदुर्ग : पाडलोसवासीयांचा उपवनसंरक्षकांना घेराओ, गव्यांकडून पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 13:46 IST

गव्यांकडून झालेल्या नुकसानीची कल्पना देऊनही सहा दिवस झाले तरी पंचनामा न केल्याने आक्रमक झालेल्या पाडलोस पंचक्रोशी गावातील ग्रामस्थांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना घेराओ घालत जाब विचारला.

ठळक मुद्देपाडलोसवासीयांचा उपवनसंरक्षकांना घेराओ, गव्यांकडून पिकांचे नुकसान  सहा दिवस झाले तरी नुकसानीबाबत पंचनामे नाहीत; शेतकरी आक्रमक

सिंधुुदुर्ग : गव्यांकडून झालेल्या नुकसानीची कल्पना देऊनही सहा दिवस झाले तरी पंचनामा न केल्याने आक्रमक झालेल्या पाडलोस पंचक्रोशी गावातील ग्रामस्थांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना घेराओ घालत जाब विचारला.

दरम्यान, पंचनामा करण्यास वेळ नसेल तर आम्हाला सेवेत घ्या आम्ही शेतकऱ्यांसाठी झटतो, असे ग्रामस्थांकडून सुनावण्यात आले. यावेळी आपण तत्काळ पंचनामा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कल्पना देतो, असे आश्वासन समाधान चव्हाण यांनी शेतकऱ्यांना दिले.मडुरा, पाडलोसमध्ये गव्यांनी पिकांची नासधूस करण्याचे सत्र सुरु असतानाच वनविभागाने शेतकऱ्यांप्रती दाखविलेल्या उदासीनतेपोटी पाडलोस पंचक्रोशीसह आरोस गावातील शेतकऱ्यांनी सावंतवाडी वनविभाग कार्यालयातील सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना घेराव घातला.यावेळी शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, पाडलोस उपसरपंच महादेव गावडे, मडुरा ग्रामकमिटी माजी अध्यक्ष दिलीप परब, बाळा परब, मडुरा शाखाप्रमुख श्रीकृष्ण भोगले, सुधीर गावडे, बापू गावडे, अमोल माधव, गोविंद माधव, विजय गवंडी, आजगाव वनपाल अमित कटके, पाडलोस वनपाल विशाल पाटील तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी राजू शेटकर म्हणाले की, वनविभागाच्या उदासिन भुमिकेमुळे आज शेतकरी पंचनाम्याकडे पाठ फिरवत आहेत. पंचनामा केला तरी मिळणारी तुटपुंजी भरपाई सावंतवाडी कार्यालयात येण्याजाण्यासाठीच खर्च होते. शेतकऱ्यांनी वनपालांना ते पंचनाम्यासाठी येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वन कर्मचाऱ्यांना कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.दरम्यान अशा उपद्रवी जंगली प्राण्यांपासून शेती वाचवायची असेल तर सौरकुंपणाचा प्रयोग करणे आवश्यक आहे. तसेच दोन दिवसांतून एकदा वनपाल यांनी गावात भेट देऊन पोलीस मित्राप्रमाणे वनमित्र तयार केले पाहिजेत. तरच शेतकऱ्यांच्या समस्या सुटू शकतील.

आम्ही बँकेमधून कर्ज घेऊन बागायती केल्या. परंतु, रात्रीच्या वेळी गव्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे आम्ही कर्ज भरणा कसे करणार, आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.  नविभागाने अशा उपद्रवी प्राण्यांवर योग्य ती उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येस सर्वस्वी वनविभाग जबाबदार राहणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

सौरकुंपणाचा लाभ घ्यायावेळी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्याची भरपाई त्यांना मिळणार आहे. तसेच नावीन्यपूर्ण योजनेतून शेतकऱ्यांनी ८० टक्के अनुदान व २० टक्के भरणा या तत्वावर सौरकुंपण घालून घ्यावे. याचा प्रयोग पाडलोस येथे बाळा परब यांच्या बागेत करणार असल्याचे सांगितले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सौरकुंपणाचा लाभ घ्यावा असे, आवाहनही चव्हाण यांनी केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग