शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : वैभव नाईकांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा : मंदार केणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 16:56 IST

आमदार वैभव नाईक हे मच्छिमारांची सहानुभूती मिळण्यासाठी पुतना-मावशीचे दिखाऊ प्रेम दाखवत असून मच्छिमारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेल्या आमदार नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी दिले आहे.

ठळक मुद्देवैभव नाईकांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा : मंदार केणी शिवसेनेकडून मच्छिमारांमध्ये संभ्रम पसरविला जातो

मालवण : आमदार वैभव नाईक हे मच्छिमारांची सहानुभूती मिळण्यासाठी पुतना-मावशीचे दिखाऊ प्रेम दाखवत असून मच्छिमारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेल्या आमदार नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी दिले आहे.मालवण येथे आयोजित पत्रकार परिषदेत केणी यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर टीका करताना मच्छिमारांना न्याय मिळवून देण्यास स्वाभिमानचे अध्यक्ष नारायण राणे सक्षम आहेत. मच्छिमारांचा धगधगता संघर्ष थंड झाल्यावर खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक हे मच्छिमारांची भेट घेतात. त्यांना मच्छिमारांचा पुळका असता तर आंदोलनानंतरचे पाच दिवस कुठे होते? असा सवालही केणी यांनी केला.

शिवसेनेकडून मच्छिमारांमध्ये नेहमीच संभ्रम पसरविला जातो. खासदार रत्नागिरीत पर्ससीनला पाठिंबा देतात आणि मालवणात पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने असल्याचे भासवतात. अनधिकृत मासेमारीविरोधात मच्छिमारांनी कायदा हातात घेतला तर सत्ताधाऱ्यांकडूनच त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले जातात. यावेळी स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत व छोटू सावजी उपस्थित होते.मंदार केणी म्हणाले, आघाडी सरकारने पर्ससीन मासेमारीचे परवाने देण्याचे बंद केले होते. मात्र युती शासनाच्या काळात परवाने देण्याचे सुरू केल्याने मच्छिमारांची आंदोलने पुन्हा संघर्षमय झाली. मालवणातील संघर्ष प्रकरणाशी संबंध नसलेल्या व्यक्तींना पोलीस अधीक्षकांनी अटक करून खंडणीचे गुन्हे दाखल केले.

या प्रकारानंतर मच्छिमार बांधवांनी नारायण राणे यांना हाक देताच त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्याने मच्छिमारांची धरपकड मोहीम बंद झाली. एलईडी नौकांवर कारवाई होण्यासाठी आम्ही वकीलपत्र घालून एलईडी नौकांची छायाचित्रे दिली असून आमचा लढा एलईडी मासेमारीविरोधात असून पक्ष कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे केणी यांनी स्पष्ट केले.पोलिसांच्या धरपकड मोहिमेत महेश देसाई यांना नारायण राणे यांच्या बंगल्यासमोरून ताब्यात घेण्यात आले. यावेळी देसाई यांच्या आईने राणे यांच्याकडे विनवणी केली. त्यावेळी राणे यांनी देसाई हे शिवसैनिक आहेत, असा भेदभाव केला नाही. त्यांना अटक करू नये, अशा सूचना पोलिसांना देत त्यांना पोलीस कोठडीपासून सोडविले.

देसाई जर शिवसैनिक असतील तर ते राणेंच्या बंगल्याबाहेर काय करीत होते ? असा सवाल करताना शिवसेनेचे शहर प्रमुख बाबी जोगी यांनी देसाई यांचे हमीपत्र दिल्याने त्यांना सोडण्यात आले असे सांगत असतील तर पोलिसांच्या अटकेत असलेल्यांना अटक कशी झाली? बाबी जोगी यांनी त्यांना हमीपत्र का दिले नाही? असाही सवाल केणी यांनी उपस्थित केला.वातावरण गढूळ करण्याचा आमदारांचा डावमासळीची लूट रोखण्यासाठी मच्छिमारांची मागणी असलेल्या स्वतंत्र अंमलबजावणी कक्षाची स्थापना अद्याप करण्यात आलेली नाही. प्रशासकीय यंत्रणांकडून परराज्यातील नौकांना मासेमारी करण्यास मुभा दिली जात असल्याचा आरोप करताना परराज्यातील नौका पकडू शकलेले आमदार मत्स्य अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील पर्ससीन नौकाधारकांची नावे सांगून स्थानिक मच्छिमारांमधील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका केणी यांनी केली. तर गोव्यातील राजकीय व्यक्तींनी आपल्या मंत्र्यांवर दबाव आणून पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले. त्यामुळे मच्छिमारांना सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा राहिलेल्या नाहीत, असे अशोक सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे