शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग: पर्यटन व उद्योग यांच्या माध्यमातून विकास, वनसंज्ञा, सीआरझेड मार्गी लागेल :सुधांशू पांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 10:45 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन व उद्योग यांच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी एक योजना आखली असून या योजनेच्या पुर्ततेसाठी या जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय अधिकारी जिल्ह्यात दाखल झाल आहोत.

ठळक मुद्देपर्यटन व उद्योग यांच्या माध्यमातून विकास, वनसंज्ञा, सीआरझेड मार्गी लागेल :सुधांशू पांडे सुरेश प्रभूंच्या आदेशानुसार विविध खात्याच्या केंद्रीय अधिकारी जिल्ह्यात

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील निसर्ग आणि येथील समुद्र किनारे हे शेजारच्या गोवा राज्यापेक्षा खूप सुंदर आणि स्वच्छ आहेत. याचबरोबर येथील आंबा, काजू, कोकम, जांभूूळ आदी विविध फळेही सुमधुर आहेत. लोककलाही महत्त्वाच्या आहेत. मात्र, ते जगाला माहीत नाहीत. ही माहिती करून देऊन या जिल्ह्याचा पर्यटन व उद्योग यांच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी एक योजना आखली असून या योजनेच्या पुर्ततेसाठी या जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी आम्ही केंद्रीय अधिकारी जिल्ह्यात दाखल झालो आहोत.या सर्व विषयांचा आपण अभ्यास केला असून रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना तसे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या प्रस्तावांना मान्यता दिली जाईल. त्याचबरोबर येथील वनसंज्ञा आणि सीआरझेड चाही प्रश्न मार्गी लावला जाईल अशी ग्वाही केंद्रीय उद्योग सह सचिव सुधांशू पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.केंद्रीय वाणिज्य, उद्योग व हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या सुचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विविध खात्यांच्या केंद्रीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावून येथील निसर्ग, निसर्गदत्त फळे याचबरोबर येथील लोककला, प्रश्न, येथील साधन सामग्री क्षमता यांची पाहणी करून कोणकोणते विषय कोणकोणत्या खात्याअंतर्गत घेता येतील याबाबतची बारकाईने तपासणी केली.

यानंतर जिल्हाधिकारी दालनात सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या नंतर या अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पांडे यांच्यासोबत केंद्रीय हवाई सहसचिव राजिव अग्रवाल, अनिल अग्रवाल, प्रभू यांचे खासगी स्वीय सहाय्यक विजय पिंगळे, अमित भोळे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, माजी आमदार राजन तेली, भाजपा नेते अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.यावेळी सुधांशू पांडे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनदृष्टया मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकतो असा जिल्हा आहे. या जिल्ह्याला अप्रतिम असा निसर्ग लाभला आहे. त्याचबरोबर येथील समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर आहेत.मासे निर्यातीकरीता प्रयत्न सुरूदक्षिण भारतात कायद्याच्या चौकटीत राहून समुद्रात किंवा किनारपट्टीवर पर्यटनदृष्टया विकास करण्यात आला आहे. याच धर्तीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सीआरझेड आणि वनसंज्ञा यातून सूट मिळावी यासाठी प्रयत्न सुरु असून लवकरच त्यावर निर्णय होईल असा विश्वासही पांडे यांनी व्यक्त करताना येथील मासे कसे निर्यात करता येईल यासाठीचा सविस्तर आराखडा तयार असून त्याला ही लवकरच मान्यता मिळेल असेही सुधांशू पांडे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूsindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटन