शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

सिंधुदुर्ग: पर्यटन व उद्योग यांच्या माध्यमातून विकास, वनसंज्ञा, सीआरझेड मार्गी लागेल :सुधांशू पांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 10:45 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन व उद्योग यांच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी एक योजना आखली असून या योजनेच्या पुर्ततेसाठी या जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय अधिकारी जिल्ह्यात दाखल झाल आहोत.

ठळक मुद्देपर्यटन व उद्योग यांच्या माध्यमातून विकास, वनसंज्ञा, सीआरझेड मार्गी लागेल :सुधांशू पांडे सुरेश प्रभूंच्या आदेशानुसार विविध खात्याच्या केंद्रीय अधिकारी जिल्ह्यात

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील निसर्ग आणि येथील समुद्र किनारे हे शेजारच्या गोवा राज्यापेक्षा खूप सुंदर आणि स्वच्छ आहेत. याचबरोबर येथील आंबा, काजू, कोकम, जांभूूळ आदी विविध फळेही सुमधुर आहेत. लोककलाही महत्त्वाच्या आहेत. मात्र, ते जगाला माहीत नाहीत. ही माहिती करून देऊन या जिल्ह्याचा पर्यटन व उद्योग यांच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी एक योजना आखली असून या योजनेच्या पुर्ततेसाठी या जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी आम्ही केंद्रीय अधिकारी जिल्ह्यात दाखल झालो आहोत.या सर्व विषयांचा आपण अभ्यास केला असून रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना तसे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या प्रस्तावांना मान्यता दिली जाईल. त्याचबरोबर येथील वनसंज्ञा आणि सीआरझेड चाही प्रश्न मार्गी लावला जाईल अशी ग्वाही केंद्रीय उद्योग सह सचिव सुधांशू पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.केंद्रीय वाणिज्य, उद्योग व हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या सुचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विविध खात्यांच्या केंद्रीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावून येथील निसर्ग, निसर्गदत्त फळे याचबरोबर येथील लोककला, प्रश्न, येथील साधन सामग्री क्षमता यांची पाहणी करून कोणकोणते विषय कोणकोणत्या खात्याअंतर्गत घेता येतील याबाबतची बारकाईने तपासणी केली.

यानंतर जिल्हाधिकारी दालनात सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या नंतर या अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पांडे यांच्यासोबत केंद्रीय हवाई सहसचिव राजिव अग्रवाल, अनिल अग्रवाल, प्रभू यांचे खासगी स्वीय सहाय्यक विजय पिंगळे, अमित भोळे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, माजी आमदार राजन तेली, भाजपा नेते अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.यावेळी सुधांशू पांडे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनदृष्टया मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकतो असा जिल्हा आहे. या जिल्ह्याला अप्रतिम असा निसर्ग लाभला आहे. त्याचबरोबर येथील समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर आहेत.मासे निर्यातीकरीता प्रयत्न सुरूदक्षिण भारतात कायद्याच्या चौकटीत राहून समुद्रात किंवा किनारपट्टीवर पर्यटनदृष्टया विकास करण्यात आला आहे. याच धर्तीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सीआरझेड आणि वनसंज्ञा यातून सूट मिळावी यासाठी प्रयत्न सुरु असून लवकरच त्यावर निर्णय होईल असा विश्वासही पांडे यांनी व्यक्त करताना येथील मासे कसे निर्यात करता येईल यासाठीचा सविस्तर आराखडा तयार असून त्याला ही लवकरच मान्यता मिळेल असेही सुधांशू पांडे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूsindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटन