शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

सिंधुदुर्ग : वैद्यकीय सुविधांबरोबरच उद्योग यावेत : बबन साळगावकर, राज ठाकरे यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 15:53 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची आर्थिक प्रगती व्हावी तसेच जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत तसे निवेदनही त्यांना दिले.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग : वैद्यकीय सुविधांबरोबरच उद्योग यावेत : बबन साळगावकर यांची अपेक्षाराज ठाकरे यांना दिले निवेदन

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची आर्थिक प्रगती व्हावी तसेच जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत तसे निवेदनही त्यांना दिले.

मंगळवारपासून राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याला सावंतवाडीतून सुरुवात झाली आहे. त्यामुळे सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्यांची येथील मँगो हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, माजी आमदार परशुराम उपरकर, अनिल शिदोरे, धीरज परब, वाहतूक सेना प्रमुख संजय नाईक, सिंधुदुर्ग वाहतूक सेनाप्रमुख राजू कासकर आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्रांती आणण्यासाठी गेल्या सत्तर वर्षांमध्ये विशेष प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली तर वेगळे चित्र दिसून येईल.  सिंधुदुर्गमधील लोकसंख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे चित्र आहे.

तरुण नोकरीसाठी महानगराच्या ठिकाणी स्थलांतर करीत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी जिल्ह्यात व्यापार-उद्योगांबरोबरच वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेच्या असून, मनसेच्यावतीने प्रयत्न करावेत. काही शहरात थोड्याफार प्रमाणात निवासी संकुले उभी राहिली आहेत. शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला होता.पण गेल्या पंचवीस वर्षांत मूलभूत सुविधांशिवाय पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. या जिल्ह्यात प्रदूषणकारी प्रकल्प नकोत ही येथील लोकांची भावना बरोबर आहे. पण इतर अनेक प्रकल्प आहेत जे या जिल्ह्यात उभे राहू शकतात. नोकऱ्यांसाठी रोजगार मेळावे, शिबिरे, मुलाखती होतात, पण नोकऱ्या नाहीत, असे या निवेदनात म्हटले आहे.साळगावकर यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यात हजारो एकर पडीक जमीन आहे. पण या ठिकाणी औद्योगिकीकरण होऊ शकले नाही. त्यासाठी ठोस निर्णय होणे गरजेचे आहे. कोल्हापूर, सांगली, नाशिक, पुणे तसेच शेजारील गोवा राज्याची प्रगती औद्योगिकीकरणामुळे झाली आहे. तेथील राजकीय शक्ती यासाठी प्रबळ आहे. मात्र येथे होऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध होतो. यामागचे कारण काय, त्याचे समाधान कशात आहे, याची चर्चा सर्व स्तरावर होणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRaj Thackerayराज ठाकरे