शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग : वैद्यकीय सुविधांबरोबरच उद्योग यावेत : बबन साळगावकर, राज ठाकरे यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 15:53 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची आर्थिक प्रगती व्हावी तसेच जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत तसे निवेदनही त्यांना दिले.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग : वैद्यकीय सुविधांबरोबरच उद्योग यावेत : बबन साळगावकर यांची अपेक्षाराज ठाकरे यांना दिले निवेदन

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची आर्थिक प्रगती व्हावी तसेच जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत तसे निवेदनही त्यांना दिले.

मंगळवारपासून राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याला सावंतवाडीतून सुरुवात झाली आहे. त्यामुळे सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्यांची येथील मँगो हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, माजी आमदार परशुराम उपरकर, अनिल शिदोरे, धीरज परब, वाहतूक सेना प्रमुख संजय नाईक, सिंधुदुर्ग वाहतूक सेनाप्रमुख राजू कासकर आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्रांती आणण्यासाठी गेल्या सत्तर वर्षांमध्ये विशेष प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली तर वेगळे चित्र दिसून येईल.  सिंधुदुर्गमधील लोकसंख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे चित्र आहे.

तरुण नोकरीसाठी महानगराच्या ठिकाणी स्थलांतर करीत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी जिल्ह्यात व्यापार-उद्योगांबरोबरच वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेच्या असून, मनसेच्यावतीने प्रयत्न करावेत. काही शहरात थोड्याफार प्रमाणात निवासी संकुले उभी राहिली आहेत. शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला होता.पण गेल्या पंचवीस वर्षांत मूलभूत सुविधांशिवाय पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. या जिल्ह्यात प्रदूषणकारी प्रकल्प नकोत ही येथील लोकांची भावना बरोबर आहे. पण इतर अनेक प्रकल्प आहेत जे या जिल्ह्यात उभे राहू शकतात. नोकऱ्यांसाठी रोजगार मेळावे, शिबिरे, मुलाखती होतात, पण नोकऱ्या नाहीत, असे या निवेदनात म्हटले आहे.साळगावकर यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यात हजारो एकर पडीक जमीन आहे. पण या ठिकाणी औद्योगिकीकरण होऊ शकले नाही. त्यासाठी ठोस निर्णय होणे गरजेचे आहे. कोल्हापूर, सांगली, नाशिक, पुणे तसेच शेजारील गोवा राज्याची प्रगती औद्योगिकीकरणामुळे झाली आहे. तेथील राजकीय शक्ती यासाठी प्रबळ आहे. मात्र येथे होऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध होतो. यामागचे कारण काय, त्याचे समाधान कशात आहे, याची चर्चा सर्व स्तरावर होणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRaj Thackerayराज ठाकरे