शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

सिंधुदुर्ग : वैद्यकीय सुविधांबरोबरच उद्योग यावेत : बबन साळगावकर, राज ठाकरे यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 15:53 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची आर्थिक प्रगती व्हावी तसेच जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत तसे निवेदनही त्यांना दिले.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग : वैद्यकीय सुविधांबरोबरच उद्योग यावेत : बबन साळगावकर यांची अपेक्षाराज ठाकरे यांना दिले निवेदन

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची आर्थिक प्रगती व्हावी तसेच जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत तसे निवेदनही त्यांना दिले.

मंगळवारपासून राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याला सावंतवाडीतून सुरुवात झाली आहे. त्यामुळे सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्यांची येथील मँगो हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, माजी आमदार परशुराम उपरकर, अनिल शिदोरे, धीरज परब, वाहतूक सेना प्रमुख संजय नाईक, सिंधुदुर्ग वाहतूक सेनाप्रमुख राजू कासकर आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्रांती आणण्यासाठी गेल्या सत्तर वर्षांमध्ये विशेष प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली तर वेगळे चित्र दिसून येईल.  सिंधुदुर्गमधील लोकसंख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे चित्र आहे.

तरुण नोकरीसाठी महानगराच्या ठिकाणी स्थलांतर करीत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी जिल्ह्यात व्यापार-उद्योगांबरोबरच वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेच्या असून, मनसेच्यावतीने प्रयत्न करावेत. काही शहरात थोड्याफार प्रमाणात निवासी संकुले उभी राहिली आहेत. शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला होता.पण गेल्या पंचवीस वर्षांत मूलभूत सुविधांशिवाय पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. या जिल्ह्यात प्रदूषणकारी प्रकल्प नकोत ही येथील लोकांची भावना बरोबर आहे. पण इतर अनेक प्रकल्प आहेत जे या जिल्ह्यात उभे राहू शकतात. नोकऱ्यांसाठी रोजगार मेळावे, शिबिरे, मुलाखती होतात, पण नोकऱ्या नाहीत, असे या निवेदनात म्हटले आहे.साळगावकर यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यात हजारो एकर पडीक जमीन आहे. पण या ठिकाणी औद्योगिकीकरण होऊ शकले नाही. त्यासाठी ठोस निर्णय होणे गरजेचे आहे. कोल्हापूर, सांगली, नाशिक, पुणे तसेच शेजारील गोवा राज्याची प्रगती औद्योगिकीकरणामुळे झाली आहे. तेथील राजकीय शक्ती यासाठी प्रबळ आहे. मात्र येथे होऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध होतो. यामागचे कारण काय, त्याचे समाधान कशात आहे, याची चर्चा सर्व स्तरावर होणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRaj Thackerayराज ठाकरे