शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

सिंधुदुर्ग पाणथळ ब्रीफ डॉक्युमेंटरी समिती आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 14:52 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील तलावात अतिक्रमण करण्यात आले आहे. पंप लावून तलावातील पाणी उपसा करण्यात आला असून मातीची भर टाकून वाहने जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. यामुळे तलावातील ९७ वनस्पती, २० वनौषधी आणि ५२ पक्षी यांचे जीवन धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देसंबंधितांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशनेरूर तलावात होतेय अतिक्रमण

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील तलावात अतिक्रमण करण्यात आले आहे. पंप लावून तलावातील पाणी उपसा करण्यात आला असून मातीची भर टाकून वाहने जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. यामुळे तलावातील ९७ वनस्पती, २० वनौषधी आणि ५२ पक्षी यांचे जीवन धोक्यात आले आहे.त्यामुळे संबंधितांवर न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग पाणथळ ब्रीफ डॉक्युमेंटरी समितीने सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

यावेळी मंजुलक्ष्मी यांनी कुडाळ तहसीलदार यांना तत्काळ सबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.यावेळी समितीचे सदस्य डॉ. योगेश कोळी, डॉ. बाळकृष्ण गावडे, डॉ. रवींद्र ठाकूर, अजित कानशेडे, सुषमा केणी, सचिन देसाई, प्रवीण सावंत, हसन खान, संदीप राणे आदी उपस्थित होते.या निवेदनात म्हटले आहे, भारत देशात सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पाणथळ ब्रीफ डॉक्युमेंटरी समिती स्थापन झाली असून जिल्ह्यातील पाणथळ जागांचा सर्व्हे झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ५७ पाणथळ जागा निश्चित झाल्या आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या सर्व पाणथळ जागा संरक्षित करण्यात आलेल्या आहेत. त्यात नेरूर येथील ६०९७ नंबरच्या तलावाचा पाणथळ म्हणून समावेश आहे. या तलावातील पाणी पंप लावून उपसा करण्यात आले आहे. तसेच वाहने चालविण्यासाठी माती टाकून रस्ता करण्यात आला आहे.

तलावात क्रिकेटचे मैदान करण्यात आले आहे. याबाबतची आॅनलाईन तक्रार कोकण आयुक्तांना करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तक्रार केल्यानंतर ४८ तासांत कारवाई होणे बंधनकारक आहे. तरीही ही कारवाई करण्यात न आल्याने पाणथळ ब्रीफ डॉक्युमेंटरी समितीने कुडाळ तहसीलदार यांची प्रथम भेट घेतली. यावेळी तहसीलदार यांनी आपण हजर झाल्यावर चार दिवस झाल्याचे सांगितले.तसेच आजच भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचे आश्वासन दिले होते. तरीही आम्ही आपली भेट घेऊन लक्ष वेधत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी तत्काळ कारवाई करण्याचे कुडाळ तहसीलदार यांना आदेश दिले.९७ वनस्पतींच्या प्रजाती; पक्ष्यांचे जीवन अडचणीतनेरूर तलावात ९७ प्रकारच्या प्रजाती आहेत. या प्रजाती ४८ कुळातील आहेत. यातील २ कुळे शेवाळ जातीची आहेत. ५ एकदल, ४१ द्विदल प्रकारच्या तर एक वाऱ्याला थांबविण्याची क्षमता असणारे विंड मास्टर, ९ रानभाज्या, ४ फळ उत्पादक, एक पाण्यातील वनस्पती आहे. तसेच २० औषधी, ११ पाणथळ प्रजाती आणि २ पाणी देणाऱ्या प्रजाती आहेत. या सर्वांच्या अस्तित्वाला धोका या अतिक्रमणामुळे झाला आहे, असे यावेळी डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी सांगितले.या तलावात एकूण ५२ पक्षी वास्तव्य करतात. यात संकटग्रस्त २ पक्ष्यांचा समावेश आहे. छोटी टिकुकली, कमळ पक्षी यांचा यात समावेश आहे. तसेच स्थलांतरित काळ्या मानेचा करकोचा, नदी सूरय, धनेश या पक्ष्यांचाही समावेश आहे. या पक्ष्यांसह कीटक, जलचर प्राणी यांचाही जीव धोक्यात आला आहे, अशी माहिती यावेळी समिती सदस्यांनी दिली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईsindhudurgसिंधुदुर्ग