शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सिंधुदुर्ग : वैभववाडीतील धान्य दुकानांवरील स्थिती : पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 16:21 IST

रास्त धान्य दुकानांवर पुरविण्यात आलेल्या सदोष ई-पॉस मशीन आणि इंटरनेट कनेक्टिव्हीटीच्या समस्येने तालुक्यातील धान्य दुकानदारांना ग्रासले आहे. त्याचा फटका लाभार्थींना बसत असून बायोमेट्रिकच्या सक्तीमुळे जनतेला नाहक शारीरिक आणि मानसिक त्रास सोसावा लागत आहे.

ठळक मुद्देवैभववाडीतील धान्य दुकानांवरील स्थिती पुरवठा विभागाचे दुर्लक्ष; दुकानदार होताहेत टार्गेटबायोमेट्रिकमुळे लाभार्थी वेठीस

वैभववाडी : रास्त धान्य दुकानांवर पुरविण्यात आलेल्या सदोष ई-पॉस मशीन आणि इंटरनेट कनेक्टिव्हीटीच्या समस्येने तालुक्यातील धान्य दुकानदारांना ग्रासले आहे. त्याचा फटका लाभार्थींना बसत असून बायोमेट्रिकच्या सक्तीमुळे जनतेला नाहक शारीरिक आणि मानसिक त्रास सोसावा लागत आहे. मात्र, पुरवठा विभागाकडून या प्रकाराची दखल घेतली जात नसल्याने धान्य दुकानदार आणि जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.राज्य सरकारने धान्य वितरण व्यवस्थेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली अंमलात आणून धान्य दुकानांवर त्याची सक्ती केली. त्याला संभाव्य अडचणी लक्षात घेऊन धान्य दुकानदारांनी विरोध केला. मात्र धान्य दुकानदारांचा विरोध मोडीत काढून धान्य वितरणासाठी ई-पॉस मशीन पुरविण्यात आल्या. परंतु, धान्य दुकानांवरील समस्या आणि जनतेच्या गैरसोयीकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.तालुक्यातील ३४ गावांमध्ये रास्त धान्य दुकाने मंजूर असून त्यापैकी सध्या ३१ दुकाने कार्यान्वित आहेत. तर तीन गावे लगतच्या धान्य दुकानांवर जोडण्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व धान्य दुकानांवर ई-पॉस मशीनद्वारे ठसे घेऊन बायोमेट्रिक पद्धतीनेच धान्य वितरणाची सक्ती करण्यात आले असून इंटरनेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध नसलेल्या गावांमध्ये आॅफलाईन धान्य वितरणाची मुभा देण्यात आली आहे. परंतु, इंटरनेट कनेक्टिव्हीटी असलेल्या गावातील जनतेचे प्रचंड हाल होत आहेत.

बऱ्याच ई-पॉस मशीन सदोष असल्याने त्यामध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड निर्माण होत आहे. तसेच काही ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध असूनही कनेक्टिव्हीटी मिळत नसल्याने ई-पॉस मशीन एरर दाखवितात. त्यामुळे लाभार्थींना धान्यासाठी दिवस दिवस दुकानावर घालवूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

त्यामुळे धान्य दुकानदारांवर ग्राहक रोष व्यक्त करु लागले आहेत. याबाबत धान्य दुकानदारांनी पुरवठा विभागाला कल्पना देऊनही त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील धान्य दुकानदारांची अवस्था मृदुंगासारखी झाली आहे.आपत्कालीन स्थितीत आॅफलाईनची मुभा द्यावीतालुक्यात ३४ रास्त धान्य दुकाने मंजूर असून त्यापैकी मांगवलीला वेंगसर, अरुळेला निराळे आणि सांगुळवाडीला नावळे गाव जोडण्यात आले आहे. बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरण करताना ई-पॉस मशीनद्वारे ठसे घेतल्याशिवाय धान्य वितरण न करण्याचे पुरवठा विभागाचे सक्त आदेश आहेत.

त्यामुळे दोन गावातील लाभार्थीना बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरणात इंटरनेट कनेक्टिव्हीटीची समस्या अडचणीत टाकत आहे. त्यामुळेच लाभार्थींना दिवस दिवस ताटकळत बसावे लागत असल्याने इंटरनेट कनेक्टिव्हीटी नसताना आणि 'ई-पॉस' मशीनमध्ये तांत्रिक बिघाड उद््भवल्यास आॅफलाईन पध्दतीने धान्य वितरणाची मुभा मिळावी, अशी मागणी धान्य दुकानदार व लाभार्थींकडून केली जात आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcollectorतहसीलदार