शहरं
Join us  
Trending Stories
1
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
4
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
5
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
6
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
7
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
8
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
9
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
10
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
11
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
12
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
13
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
14
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
15
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
16
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
17
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
18
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
19
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
20
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

सिंधुदुर्ग : आगामी निवडणुकीत ताकद दाखवा : वैभव नाईक यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 1:38 PM

युवासेनेत चांगले काम केलात तर भविष्यात शिवसेनेमध्येही तुम्हांला चांगले भवितव्य आहे. यासाठी प्रथमत: युवासेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नवीन मतदारांची नावनोंदणी करा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी केले.

ठळक मुद्देआगामी निवडणुकीत ताकद दाखवा : वैभव नाईक यांचे आवाहनयुवासेना रिक्त व नूतन पदाधिकारी निवडीसाठीच्या मुलाखतींचा कार्यक्रम

सिंधुदुर्ग : आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. तशीच ती राजकारणातही आहे. यासाठी आपण सक्षम असले पाहिजे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत युवासेनेची ताकद दिसून आली आहे. तसेच काम आगामी निवडणुकांमध्ये होणे गरजेचे आहे. युवासेनेत चांगले काम केलात तर भविष्यात शिवसेनेमध्येही तुम्हांला चांगले भवितव्य आहे. यासाठी प्रथमत: युवासेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नवीन मतदारांची नावनोंदणी करा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी केले.कणकवली विजय भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना कार्यकारिणीमध्ये रिक्त असलेल्या व नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी इच्छुक युवा सैनिकांच्या मुलाखती जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व युवासेना मुंबई कोअर कमिटीच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. यावेळी मार्गदर्शन करताना वैभव नाईक बोलत होते.ते पुढे म्हणाले, नवीन मतदारांची नावनोंदणी झाल्यास कणकवली मतदार संघातही मोठ्या मताधिक्याने शिवसेनेला विजय संपादन करता येईल. त्यासाठी प्रत्येक युवासैनिकाने किमान १० नवीन मतदारांची नावनोंदणी करावी. कुडाळ-मालवण मतदारसंघात विद्यार्थी वर्गासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कणकवलीतही विद्यार्थीप्रमुख नेमून विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घ्यावेत. त्यासाठी लागणारे सहकार्य आम्ही करू, असे आमदार नाईक यांनी सांगितले.यावेळी युवासेना सहसचिव (मुंबई) देवेंद्र कांबळी, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. हर्षद गावडे, कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, वैभववाडी तालुकाप्रमुख स्वप्नील धुरी, कणकवली सरचिटणीस अनुप वारंग, वैभववाडी सरचिटणीस अतुल सरवटे, शहरप्रमुख तेजस राणे, उपतालुकाप्रमुख सचिन पवार, ललित घाडीगांवकर, प्रकाश मेस्त्री, रोहित राणे, सिद्धेश राणे, वैभव सावंत आदी युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संघटना बळकट करा : अरुण दुधवडकरयावेळी अरुण दुधवडकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करीत आहेत . त्यामुळे युवासेनेत उत्साह आहे. हा उत्साह कायम ठेवून युवासेना संघटना बळकट करणे गरजेचे आहे.

यासाठी सर्वांनी जोमाने काम करावे. उद्धव ठाकरे यांनी ह्यएकला चलो रेह्णचा दिलेला नारा यासाठी जिद्दीने अपेक्षित असलेले काम आपण करायचे आहे. येत्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही आमदार व खासदार निवडून आणून आपल्याला पक्षप्रमुखांना अनोखी भेट द्यायची आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग