शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

सिंधुदुर्ग : पंचायत समितीत पालकांनी भरवली शाळा, शिक्षकासाठी मालोंड ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 16:19 IST

वारंवार मागणी करूनही शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे न भरणा केल्याने संतप्त बनलेल्या मालोंड शाळा नंबर एक मधील सर्व मुलांना पालकांनी पंचायत समितीत बसवत अनोखे आंदोलन छेडले. शाळेतील सर्व मुले शाळा बंद करून पंचायत समितीत आणण्याच्या या प्रकाराने शिक्षण विभागात खळबळ उडाली.

ठळक मुद्देपंचायत समितीत पालकांनी भरवली शाळा शिक्षकांच्या मागणीसाठी मालोंड ग्रामस्थ-पालक आक्रमक  शिक्षक नेमणुकीनंतर आंदोलन मागे

मालवण : वारंवार मागणी करूनही शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे न भरणा केल्याने संतप्त बनलेल्या मालोंड शाळा नंबर एक मधील सर्व मुलांना पालकांनी पंचायत समितीत बसवत अनोखे आंदोलन छेडले. शाळेतील सर्व मुले शाळा बंद करून पंचायत समितीत आणण्याच्या या प्रकाराने शिक्षण विभागात खळबळ उडाली.दरम्यान,  गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी पालक व गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक यांची बैठक बोलवत समस्या जाणून घेतल्या. अखेर शाळेवर या संपूर्ण वर्षासाठी शिक्षक नेमणूक देण्यात आली. शिक्षकही तातडीने शाळेवर रवाना झाल्याने पालकांनी छेडलेले आंदोलन मागे घेतले.यावेळी सरपंच वैशाली घाडीगांवकर, पोलीस पाटील पांडुरंग तांडेल, सुहास सुर्वे, मकरंद तांडेल, रवींद्र तांडेल, महेश परब, औदुंबर तांडेल, नवनाथ घाडीगांवकर, पुर्वा फणसगावकर, जयवंत पारकर, पद्माकर फणसगावकर, गौरी परब, प्रणाली परब, सुलतान शेख, सुवर्णा मालंडकर आदी व इतर ग्रामस्थ तसेच विद्यार्थी उपस्थित होते. स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उपसभापती अशोक बागवे, शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे यांनीही पालकांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला.मालोंड एक नंबर शाळेत सातवी इयत्तेपर्यंत वर्ग असून सध्या २५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. निकषाचा विचार करता सहावी ते आठवी या वर्गासाठी पदवीधर शिक्षक अपेक्षित आहेत. मात्र तालुक्यात ११२ शिक्षक पदे रिक्त असल्याने शाळेत शिक्षक संख्या कमी आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत होत आहे.मालोंड शाळेत एकही पदवीधर शिक्षक नसल्याने पालक आक्रमक बनले. अखेर विस्तार अधिकारी यांच्या अधिकारात शाळेवर शिक्षक नेमणूक देण्यात आल्याने पालकांनी आंदोलन स्थगित केले.वैभव नाईक यांनी सचिवांची घेतली भेटसिंधुदुर्ग जिल्ह्यात चार हजार साठ शिक्षक पदे मंजूर आहेत. मात्र सध्या तीन हजार चारशे सहासष्ठ शिक्षक कार्यरत आहेत. सहाशे शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यात २३५ शिक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदली झाल्या. त्यातील ६५ शिक्षकांना सोडण्यात आले. तर केवळ ६ शिक्षक जिल्ह्याबाहेरून आले.

शेकडो शिक्षक पदे रिक्त असल्याने शिक्षणावर याचा परिमाण होतो. तरी बदली झालेल्या शिक्षकांना सोडण्यात येऊ नये अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी मंत्रालयात शासन सचिवांकडे केली आहे. शासन सचिवांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSchoolशाळा