शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

सिंधुदुर्ग : कमी पटसंख्येमुळे शाळा होणार बंद, आचरा-भंडारवाडीतील ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 13:56 IST

आचरा-भंडारवाडी येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याने भंडारवाडी शाळा बंद करु नये अशी ग्रामस्थ व पालकांची भूमिका असतानाही शासन निर्णयामुळे आचरा भंडारवाडी शाळा बंद होणार आहे.

ठळक मुद्देकमी पटसंख्येमुळे शाळा होणार बंदआचरा-भंडारवाडीतील ग्रामस्थ आक्रमक गटशिक्षण अधिकाऱ्यांसमोरच पालक, शिक्षकांत खडाजंगी

आचरा : आचरा-भंडारवाडी येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याने भंडारवाडी शाळा बंद करु नये अशी ग्रामस्थ व पालकांची भूमिका असतानाही शासन निर्णयामुळे आचरा भंडारवाडी शाळा बंद होणार आहे.

आचरा भंडारवाडीत शाळेत आलेल्या गटशिक्षण अधिकारी दत्तात्रय मुळीक यांची ग्रामस्थांनी भेट घेत आपला विरोध दर्शविला. मात्र शासन निर्णयामुळे पटसंख्या कमी असल्याने शाळेतील मुलांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.आचरा भंडारवाडी प्राथमिक शाळेची पटसंख्या कमी असल्याने शाळा बंद करुन शाळेतील मुले नजीकच्या गाऊडवाडी शाळेत दाखल केली जातील अशी माहिती पालकांना देण्यात आली होती. त्यानंतर आचरा- भंडारवाडी बौद्धवाडीतील पालकांनी शाळा बंद करण्यास विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले होते.

शुक्रवारी भंडारवाडी शाळेत केंद्रप्रमुखांसह मालवण गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक, दाखल झाल्याची माहिती मिळताच आचरा भंडारवाडी बौद्धवाडीतील पालकांनी गटशिक्षणाधिकाºयांची भेट घेतली.

यावेळी लक्ष्मण आचरेकर, बाळू आचरेकर, स्नेहा कांबळी, प्रभाकर आचरेकर, बाबाजी आचरेकर, जनार्दन आचरेकर, अन्य ग्रामस्थ, पालकांसह शिक्षिका नंदिता सुर्वे व मनिषा शिंदे या हजर होत्या.यावेळी आलेल्या पालकांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना शाळा बंद न करण्याची वारंवार विनंती केली. शाळेत प्रवेश घेऊ पाहणाऱ्या एका विद्यार्थ्याला तर प्रवेश नाकारण्याचे प्रकार या शाळेत झाले आहेत. या शाळेतल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांची गरजच राहिलेली नाही. म्हणूनच शाळा बंद होण्याची वेळ आली आहे.

असा आरोप करताच या शाळेच्या शिक्षिका सुर्वे यांनी ग्रामस्थांच्या म्हणण्याला विरोध करत आम्ही मुले शाळेत येण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केलेत. मात्र पालकच आम्हाला साथ देत नाहीत. शाळेच्या कोणत्याही बैठकीला हजर राहत नाहीत. उलट आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करत आहेत. असे सांगताच पालक व शिक्षिका यांच्यात खडाजंगी झाली.शिक्षकच शाळा बंदा पाडावयाच्या मार्गावर आहे. यावर काय कारवाई करणार असा प्रश्न गटशिक्षणाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी केला. गटशिक्षणाधिकारी मुळीक यांनी ही बाब गंभीर असून शाळा व्यवस्थापनाने नावासहीत आपल्याकडे ठराव पाठवावा. त्यावर नक्कीच कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले.गटशिक्षणाधिकाऱ्यांना जाब विचारलाजोपर्यंत शाळेची पटसंख्या ११ ते १५ होत नाही. तोपर्यंत शाळा बंद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भंडारवाडी शाळेतील शिक्षिका व पालक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होऊन आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. यावेळी प्राथमिक शिक्षकच दुसऱ्या वाडीतील शाळांमधील मुले आपल्या शाळेत पळवत असल्याचा गंभीर प्रकार पालकांनी कथन करत यावर कारवाई होणार काय असा प्रश्न गटशिक्षण अधिकारी यांना विचारला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSchoolशाळा