शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सिंधुदुर्ग : कमी पटसंख्येमुळे शाळा होणार बंद, आचरा-भंडारवाडीतील ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 13:56 IST

आचरा-भंडारवाडी येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याने भंडारवाडी शाळा बंद करु नये अशी ग्रामस्थ व पालकांची भूमिका असतानाही शासन निर्णयामुळे आचरा भंडारवाडी शाळा बंद होणार आहे.

ठळक मुद्देकमी पटसंख्येमुळे शाळा होणार बंदआचरा-भंडारवाडीतील ग्रामस्थ आक्रमक गटशिक्षण अधिकाऱ्यांसमोरच पालक, शिक्षकांत खडाजंगी

आचरा : आचरा-भंडारवाडी येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याने भंडारवाडी शाळा बंद करु नये अशी ग्रामस्थ व पालकांची भूमिका असतानाही शासन निर्णयामुळे आचरा भंडारवाडी शाळा बंद होणार आहे.

आचरा भंडारवाडीत शाळेत आलेल्या गटशिक्षण अधिकारी दत्तात्रय मुळीक यांची ग्रामस्थांनी भेट घेत आपला विरोध दर्शविला. मात्र शासन निर्णयामुळे पटसंख्या कमी असल्याने शाळेतील मुलांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.आचरा भंडारवाडी प्राथमिक शाळेची पटसंख्या कमी असल्याने शाळा बंद करुन शाळेतील मुले नजीकच्या गाऊडवाडी शाळेत दाखल केली जातील अशी माहिती पालकांना देण्यात आली होती. त्यानंतर आचरा- भंडारवाडी बौद्धवाडीतील पालकांनी शाळा बंद करण्यास विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले होते.

शुक्रवारी भंडारवाडी शाळेत केंद्रप्रमुखांसह मालवण गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक, दाखल झाल्याची माहिती मिळताच आचरा भंडारवाडी बौद्धवाडीतील पालकांनी गटशिक्षणाधिकाºयांची भेट घेतली.

यावेळी लक्ष्मण आचरेकर, बाळू आचरेकर, स्नेहा कांबळी, प्रभाकर आचरेकर, बाबाजी आचरेकर, जनार्दन आचरेकर, अन्य ग्रामस्थ, पालकांसह शिक्षिका नंदिता सुर्वे व मनिषा शिंदे या हजर होत्या.यावेळी आलेल्या पालकांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना शाळा बंद न करण्याची वारंवार विनंती केली. शाळेत प्रवेश घेऊ पाहणाऱ्या एका विद्यार्थ्याला तर प्रवेश नाकारण्याचे प्रकार या शाळेत झाले आहेत. या शाळेतल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांची गरजच राहिलेली नाही. म्हणूनच शाळा बंद होण्याची वेळ आली आहे.

असा आरोप करताच या शाळेच्या शिक्षिका सुर्वे यांनी ग्रामस्थांच्या म्हणण्याला विरोध करत आम्ही मुले शाळेत येण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केलेत. मात्र पालकच आम्हाला साथ देत नाहीत. शाळेच्या कोणत्याही बैठकीला हजर राहत नाहीत. उलट आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करत आहेत. असे सांगताच पालक व शिक्षिका यांच्यात खडाजंगी झाली.शिक्षकच शाळा बंदा पाडावयाच्या मार्गावर आहे. यावर काय कारवाई करणार असा प्रश्न गटशिक्षणाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी केला. गटशिक्षणाधिकारी मुळीक यांनी ही बाब गंभीर असून शाळा व्यवस्थापनाने नावासहीत आपल्याकडे ठराव पाठवावा. त्यावर नक्कीच कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले.गटशिक्षणाधिकाऱ्यांना जाब विचारलाजोपर्यंत शाळेची पटसंख्या ११ ते १५ होत नाही. तोपर्यंत शाळा बंद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भंडारवाडी शाळेतील शिक्षिका व पालक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होऊन आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. यावेळी प्राथमिक शिक्षकच दुसऱ्या वाडीतील शाळांमधील मुले आपल्या शाळेत पळवत असल्याचा गंभीर प्रकार पालकांनी कथन करत यावर कारवाई होणार काय असा प्रश्न गटशिक्षण अधिकारी यांना विचारला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSchoolशाळा