शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

 सिंधुदुर्ग : रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही : हुसेन दलवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 17:08 IST

लोकांचा विरोध असेल, प्रकल्पात बागायती जात असतील, लोकवस्ती असेल तर हा रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही. त्यासाठी विरोध करणाऱ्या स्थानिकांसोबत आपण शेवटपर्यंत राहू असे प्रतिपादन खासदार हुसेन दलवाई यांनी गिर्ये येथील भेटी दरम्यान स्पष्ट केले.

ठळक मुद्देरिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही : हुसेन दलवाईकाँग्रेसच्या शिष्टमंडळाने स्थानिक, शेतकऱ्यांची घेतली भेट

देवगड : लोकांचा विरोध असेल, प्रकल्पात बागायती जात असतील, लोकवस्ती असेल तर हा रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही. त्यासाठी विरोध करणाऱ्या स्थानिकांसोबत आपण शेवटपर्यंत राहू असे प्रतिपादन खासदार हुसेन दलवाई यांनी गिर्ये येथील भेटी दरम्यान स्पष्ट केले.

राजापूर प्रकल्पबाधित गावांतील शेतकऱ्याच्या भेटीनंतर देवगडमधील गिर्ये-रामेश्वर गावातील लोकांच्या भेटीसाठी व प्रकल्पबाधित क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी दलवाई यांच्या नेतृत्वाखाली काँंग्रेसचे शिष्टमंडळ आले होते.गिर्ये येथील श्री चौदेश्वर देवी मंदिरात आपले म्हणणे मांडण्यासाठी मोठ्या संख्येने गिर्ये-रामेश्वर गावातील शेतकरी एकत्र आले होते. दोन्ही संघर्ष समितीच्यावतीने यावेळी आपले म्हणणे मांडण्यात आले.

यावेळी शिष्टमंडळासोबत विधान परिषद सदस्या हुस्नबानू खलिफे, काँग्रेस प्रवक्ते हरिष रोग्ये, डॉ.भालचंद्र मुणगेकर, अविनाश लाड, रमेश कीर, विश्वनाथ पाटील, मधू चव्हाण, विकास सावंत, राजन भोसले, कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम आदी उपस्थित होते. तसेच उल्हास मणचेकर, आरिफ बगदादी, गिर्ये सरपंच रुपेश गिरकर, रामेश्वर सरपंच विनोद सुके, रामेश्वर संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश केळकर, गिर्ये संघर्ष समिती अध्यक्ष मुनाफ ठाकुर आदी उपस्थित होते.काँग्रेस सरकारच्या काळात लोकांच्या विरोधाला किंमत होती. परंतु, भाजप सरकारला लोकांबद्दल आत्मियताच नाही. अमेरिकेच्या धर्तीवर इकडे मांडणी करण्याचा घाट प्रधानमंत्र्यांचा असून हुकूमशाहीकडे लोकशाही वळविण्याचा प्रयत्न आहे.

ठाणे-सावंतवाडीपर्यंतच्या सर्व एम.आय.डी.सी. या कोकणचा विनाश करणाऱ्या आहेत. कोकणातील लोक सहन करणारे असल्याने इतर सर्वजण त्याचा फायदा घेतात. पण हेच देशावर घडले तर तेथील लोक सोलून काढतील. प्रकल्पात बागायती जात असेल, लोकवस्ती असेल तर असे प्रकल्प करण्याला आमचा विरोध कायम आहे.ओसाड जमिनीवर हे प्रकल्प नेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आम्ही शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढू, वेळप्रसंगी लाठी खाऊ असे विचार खासदार दलवाई यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHussein Dalwaiहुसेन दलवाई