शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

 सिंधुदुर्ग : रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही : हुसेन दलवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 17:08 IST

लोकांचा विरोध असेल, प्रकल्पात बागायती जात असतील, लोकवस्ती असेल तर हा रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही. त्यासाठी विरोध करणाऱ्या स्थानिकांसोबत आपण शेवटपर्यंत राहू असे प्रतिपादन खासदार हुसेन दलवाई यांनी गिर्ये येथील भेटी दरम्यान स्पष्ट केले.

ठळक मुद्देरिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही : हुसेन दलवाईकाँग्रेसच्या शिष्टमंडळाने स्थानिक, शेतकऱ्यांची घेतली भेट

देवगड : लोकांचा विरोध असेल, प्रकल्पात बागायती जात असतील, लोकवस्ती असेल तर हा रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही. त्यासाठी विरोध करणाऱ्या स्थानिकांसोबत आपण शेवटपर्यंत राहू असे प्रतिपादन खासदार हुसेन दलवाई यांनी गिर्ये येथील भेटी दरम्यान स्पष्ट केले.

राजापूर प्रकल्पबाधित गावांतील शेतकऱ्याच्या भेटीनंतर देवगडमधील गिर्ये-रामेश्वर गावातील लोकांच्या भेटीसाठी व प्रकल्पबाधित क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी दलवाई यांच्या नेतृत्वाखाली काँंग्रेसचे शिष्टमंडळ आले होते.गिर्ये येथील श्री चौदेश्वर देवी मंदिरात आपले म्हणणे मांडण्यासाठी मोठ्या संख्येने गिर्ये-रामेश्वर गावातील शेतकरी एकत्र आले होते. दोन्ही संघर्ष समितीच्यावतीने यावेळी आपले म्हणणे मांडण्यात आले.

यावेळी शिष्टमंडळासोबत विधान परिषद सदस्या हुस्नबानू खलिफे, काँग्रेस प्रवक्ते हरिष रोग्ये, डॉ.भालचंद्र मुणगेकर, अविनाश लाड, रमेश कीर, विश्वनाथ पाटील, मधू चव्हाण, विकास सावंत, राजन भोसले, कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम आदी उपस्थित होते. तसेच उल्हास मणचेकर, आरिफ बगदादी, गिर्ये सरपंच रुपेश गिरकर, रामेश्वर सरपंच विनोद सुके, रामेश्वर संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश केळकर, गिर्ये संघर्ष समिती अध्यक्ष मुनाफ ठाकुर आदी उपस्थित होते.काँग्रेस सरकारच्या काळात लोकांच्या विरोधाला किंमत होती. परंतु, भाजप सरकारला लोकांबद्दल आत्मियताच नाही. अमेरिकेच्या धर्तीवर इकडे मांडणी करण्याचा घाट प्रधानमंत्र्यांचा असून हुकूमशाहीकडे लोकशाही वळविण्याचा प्रयत्न आहे.

ठाणे-सावंतवाडीपर्यंतच्या सर्व एम.आय.डी.सी. या कोकणचा विनाश करणाऱ्या आहेत. कोकणातील लोक सहन करणारे असल्याने इतर सर्वजण त्याचा फायदा घेतात. पण हेच देशावर घडले तर तेथील लोक सोलून काढतील. प्रकल्पात बागायती जात असेल, लोकवस्ती असेल तर असे प्रकल्प करण्याला आमचा विरोध कायम आहे.ओसाड जमिनीवर हे प्रकल्प नेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आम्ही शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढू, वेळप्रसंगी लाठी खाऊ असे विचार खासदार दलवाई यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHussein Dalwaiहुसेन दलवाई