शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

सिंधुदुर्ग : रिफायनरी प्रकल्पाविरोधी आझाद मैदानावर १४, १५ मार्च रोजी धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 11:02 IST

मुंबईच्या आझाद मैदानावर रिफायनरी प्रकल्पाविरोधी पुन्हा एल्गार करण्यात येणार आहे. १४ व १५ मार्च रोजी धरणे आंदोलनातून प्रकल्पाविरोधी तीव्र भावना कोकण विनाशकारी प्रकल्प विरोधी समितीच्यावतीने शासन दरबारी मांडण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रकल्पविरोधी समितीचे अध्यक्ष सुरेश केळकर यांनी दिली आहे.

ठळक मुद्देरिफायनरी प्रकल्पाविरोधी आझाद मैदानावर १४, १५ मार्च रोजी धरणे प्रकल्पाविरोधी पुन्हा एल्गार : सुरेश केळकर

देवगड : मुंबईच्या आझाद मैदानावर रिफायनरी प्रकल्पाविरोधी पुन्हा एल्गार करण्यात येणार आहे. १४ व १५ मार्च रोजी धरणे आंदोलनातून प्रकल्पाविरोधी तीव्र भावना कोकण विनाशकारी प्रकल्प विरोधी समितीच्यावतीने शासन दरबारी मांडण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रकल्पविरोधी समितीचे अध्यक्ष सुरेश केळकर यांनी दिली आहे.रामेश्वर ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये रविवारी सायंकाळी उशिरा घेण्यात आलेल्या विशेष सभेत प्रकल्पबाधित जमीन मालकांनी पुन्हा धरणे आंदोलनातून प्रकल्पविरोधी एकजूट शासनाला दाखविण्याचा निर्धार केला.

विनाशकारी रिफायनरी प्रकल्प जोपर्यंत रद्द केला जात नाही, तोपर्यंत संघर्ष कायम राहिल. रिफायनरी प्रकल्पबाधित भूमिपुत्रांची भूमिका मुख्यमंत्र्यांना दाखविण्यासाठी पुन्हा एकदा एल्गार करण्यात येणार असून गिर्ये-रामेश्वरसह राजापूर-नाणार परिसरातील जमीन मालक या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सुरेश केळकर यांनी सांगितले आहे.

यावेळी सरपंच विनोद सुके, जिल्हा परिषद सदस्या वर्षा पवार, महमंदअली मुकादम, मिलेश बांदकर, मधुकर गिरकर, भरत घारकर, रमेश अणुसरकर तसेच सुमारे २५० हून अधिक ग्रामस्थ जमीन मालक व महिला आदी उपस्थित होते.विरोध असेल तर प्रकल्प लादणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर यापूर्वी प्रकल्पाविरोधी मुंबईच्या आझार मैदानावर केलेल्या आंदोलनाची दखल का घेतली जात नाही? प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक जनतेमध्ये जमीन मालकांमध्ये शासनाच्या दुटप्पी धोरणाबाबत प्रचंड संताप आहे.

जमीन भूसंपादनाच्या नोटिसांना येथील जमीन मालकांनी विरोधाचे लेखी उत्तर देऊनही रिफायनरीची टांगती तलवार येथील भुमिपुत्रांवर शासनाने का ठेवली आहे. त्यामुळे अधिवेशन काळातच शासनाला प्रकल्पाबाबत तीव्र विरोध दर्शविण्यासाठी आंदोलन छेडले आहे.

ग्रामस्थांचा सहभागया आंदोलनात गिर्ये-रामेश्वर व राजापूर-नाणारसह प्रकल्पबाधित गावातील जमीन मालक, ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी होणार आहेत. अधिवेशनात विधानभवनामध्ये भाजपचे आमदार सोडून इतर सर्वपक्षीय आमदार रिफायनरी प्रकल्पाविरोधी मत मांडणार असून त्याचवेळी आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु राहणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMumbaiमुंबई