शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

सिंधुदुर्ग : मोदींना प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य राणेनी दाखवावे : वैभव नाईक यांचा प्रतीटोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:13 IST

वैभववाडी येथील सभेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर तसेच भाजपवर टिका केली आहे. परदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15 लाख रूपये जमा करणार असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्याचे काय झाले? असा प्रश्न त्यानी या सभेत उपस्थित केला. हा प्रश्न दिल्ली येथील खासदारांच्या बैठकीत राणे यांनी नरेंद्र मोदींना विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे असा प्रती टोला शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देमोदींना प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य राणेनी दाखवावे वैभव नाईक यांचा प्रतीटोला, कणकवलीत पत्रकार परिषद

कणकवली : वैभववाडी येथील सभेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर तसेच भाजपवर टिका केली आहे. परदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15 लाख रूपये जमा करणार असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्याचे काय झाले? असा प्रश्न त्यानी या सभेत उपस्थित केला. हा प्रश्न दिल्ली येथील खासदारांच्या बैठकीत राणे यांनी नरेंद्र मोदींना विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे असा प्रती टोला शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.कणकवली येथील विजय भवन मध्ये बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, विधिमंडळात मी काय बोलतो ? याबाबत नारायण राणे यांनी बोलण्यापेक्षा तसेच सभेत शासनाच्या धोरणांबाबत टिका करण्यापेक्षा प्रत्यक्ष पंतप्रधानापुढे खासदारांच्या बैठकीत बोलावे. त्याना प्रश्न विचारावे.सत्तेसाठी शिवसेना लाचार असल्याचे ते सांगत आहेत. मात्र, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा सत्तेसाठी लाचार झालेल्या लोकानीच स्थापन केलेला आहे. हे जनतेला माहिती आहे. एका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तटकरेना तर दुसऱ्या निवडणुकीत भाजपच्या निरंजन डावखरेना पाठिंबा देणाऱ्यांचा उद्देश काय असू शकतो हे जनता ओळखून आहे.

आता ते आपला पक्ष वाढविण्याची स्वप्ने पहात आहेत. परन्तु त्यांच्या सोबत असलेले शेवटचे आमदार कालिदास कोळंबकर भाजप मध्ये गेले आहेत. याउलट शिवसेना आता पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशातील विविध ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करीत आहे.आमच्यावर टक्केवारीचा आरोप त्यांनी केला आहे. परंतु महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रथम थांबविले आणि त्यानंतर सुरु करायला दिले. यामागचे नेमके गौड़ बंगाल काय? याबाबत सध्या जिल्ह्यात चर्चा सूरू आहे. त्याचा प्रथम त्यांनी कानोसा घ्यावा.सर्वत्र स्वाभिमानची लाट आहे असे सांगितले जात आहे. तसे असेल तर आमदार नीतेश राणे यांनी सर्व प्रथम राजीनामा द्यावा. आणि निवडणुकीला उभे रहावे. म्हणजे त्याना कोणाची लाट आहे ते नेमके दिसेल. जनतेने त्याना आता पूर्ण ओळखले असल्याने सत्तेची स्वप्ने पहाणे त्यांनी सोडून द्यावे.सध्या शासनाने घेतलेल्या नवीन निर्णया मुळे विकास कामे स्पर्धेवर सुरु आहेत. त्यामुळे ठेकेदारांशी मिलीभगत करता येत नाही. याच मुळे राणेंच्या लोकांना तोटा होत आहे. तर हेच कारण विकास कामांवर त्यांनी टिका करण्यामागे असल्याचे वैभव नाईक यावेळी म्हणाले.शिवसेनेला फरक पड़त नाही!जयेंद्र रावराणे यांचा जास्तीत जास्त वेळ बुवा बाजीत जायचा . त्यामुळे त्यांना पक्ष तसेच समाज सेवा करायला वेळ मिळत नव्हता . याचसाठी आम्ही त्याना पक्षापासून लांब ठेवले होते. त्यांच्या पक्ष बदलण्यामुळे वैभववाडीत शिवसेनेला फरक पड़त नाही. असे एका प्रश्नाचे उत्तर देताना वैभव नाईक यांनी सांगितले.

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे