शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
2
"सांसें उधार हैं... दिल तो महाकाल का है"; भस्म आरतीआधी भक्ताला हार्ट अटॅक, स्टेटसची चर्चा
3
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
4
समोश्यावरून वाद सुरू झाला अन् तलवारीच बाहेर निघाल्या! शेतकऱ्याच्या मृत्यूने परिसर हादरला
5
Video : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान अपघात; हेलिकॉप्टर उतरताच हेलिपॅड खचले, थोडक्यात टळली दुर्घटना 
6
"समजलं तर ठीक, नाही तर...!", कॅनाडामध्ये पंजाबी सिंगर तेजी कहलोंवर गोळीबार; रोहित गोदारा गँगनं घेतली जबाबदारी
7
चित्रांगदा सिंह रुग्णालयात दाखल, ऐन दिवाळीत अभिनेत्रीची तब्येत बिघडली; नक्की झालं तरी काय?
8
प्रायव्हसी धोक्यात? 'Apple Maps' गुपचूप ट्रॅक करतंय तुमची प्रत्येक लोकेशन! लगेच बंद करा 'ही' सेटिंग
9
IND vs AUS : 'मी सचिनपेक्षाही अधिक धावा केल्या असत्या!' पण… ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा मोठा दावा
10
Happy Bhaubeej 2025 Wishes: भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या प्रेमळ नात्याच्या लडिवाळ शुभेच्छा!
11
लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर
12
PPF vs FD: पीपीएफ की एफडी, कुठे गुंतवणूक केल्यावर मिळेल मोठा फायदा? कोणता पर्याय करुन देऊ शकते तुफान कमाई
13
Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहि‍णींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
14
'या' शेअरमध्ये १८ महिन्यांत ६३०००% ची तेजी; आता BSE नं वाजवली धोक्याची घंटा, क्रिकेटरचंही जोडलेलं नाव
15
Hardik Pandya Mahieka Sharma Look ... अन् पांड्याची 'हॉट अँण्ड बोल्ड' गर्लफ्रेंड झाली 'संस्कारी'
16
अवघ्या ५ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, तरुणानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी! व्हिडीओत म्हणाला, "सगळ्यांनी ऐका, माझी बायको.."
17
Gold Silver Price Drop: सोन्या चांदीचे दर जोरदार आपटले; ४ वर्षातील सर्वात मोठी घसरण, काय आहे यामागचं कारण
18
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
19
का रे दुरावा? सुयश टिळक आणि आयुषी भावेच्या नात्यात बिनसलं, दिवाळीलाही एकत्र दिसलं नाही जोडपं
20
ट्रम्प यांचा PM मोदींशी फोनवरून संवाद; ट्रेडवर चर्चा, रशियन तेल खरेदीसंदर्भा पुन्हा मोठा दावा!

सिंधुदुर्ग : मोदींना प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य राणेनी दाखवावे : वैभव नाईक यांचा प्रतीटोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:13 IST

वैभववाडी येथील सभेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर तसेच भाजपवर टिका केली आहे. परदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15 लाख रूपये जमा करणार असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्याचे काय झाले? असा प्रश्न त्यानी या सभेत उपस्थित केला. हा प्रश्न दिल्ली येथील खासदारांच्या बैठकीत राणे यांनी नरेंद्र मोदींना विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे असा प्रती टोला शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देमोदींना प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य राणेनी दाखवावे वैभव नाईक यांचा प्रतीटोला, कणकवलीत पत्रकार परिषद

कणकवली : वैभववाडी येथील सभेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर तसेच भाजपवर टिका केली आहे. परदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15 लाख रूपये जमा करणार असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्याचे काय झाले? असा प्रश्न त्यानी या सभेत उपस्थित केला. हा प्रश्न दिल्ली येथील खासदारांच्या बैठकीत राणे यांनी नरेंद्र मोदींना विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे असा प्रती टोला शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.कणकवली येथील विजय भवन मध्ये बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, विधिमंडळात मी काय बोलतो ? याबाबत नारायण राणे यांनी बोलण्यापेक्षा तसेच सभेत शासनाच्या धोरणांबाबत टिका करण्यापेक्षा प्रत्यक्ष पंतप्रधानापुढे खासदारांच्या बैठकीत बोलावे. त्याना प्रश्न विचारावे.सत्तेसाठी शिवसेना लाचार असल्याचे ते सांगत आहेत. मात्र, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा सत्तेसाठी लाचार झालेल्या लोकानीच स्थापन केलेला आहे. हे जनतेला माहिती आहे. एका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तटकरेना तर दुसऱ्या निवडणुकीत भाजपच्या निरंजन डावखरेना पाठिंबा देणाऱ्यांचा उद्देश काय असू शकतो हे जनता ओळखून आहे.

आता ते आपला पक्ष वाढविण्याची स्वप्ने पहात आहेत. परन्तु त्यांच्या सोबत असलेले शेवटचे आमदार कालिदास कोळंबकर भाजप मध्ये गेले आहेत. याउलट शिवसेना आता पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशातील विविध ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करीत आहे.आमच्यावर टक्केवारीचा आरोप त्यांनी केला आहे. परंतु महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रथम थांबविले आणि त्यानंतर सुरु करायला दिले. यामागचे नेमके गौड़ बंगाल काय? याबाबत सध्या जिल्ह्यात चर्चा सूरू आहे. त्याचा प्रथम त्यांनी कानोसा घ्यावा.सर्वत्र स्वाभिमानची लाट आहे असे सांगितले जात आहे. तसे असेल तर आमदार नीतेश राणे यांनी सर्व प्रथम राजीनामा द्यावा. आणि निवडणुकीला उभे रहावे. म्हणजे त्याना कोणाची लाट आहे ते नेमके दिसेल. जनतेने त्याना आता पूर्ण ओळखले असल्याने सत्तेची स्वप्ने पहाणे त्यांनी सोडून द्यावे.सध्या शासनाने घेतलेल्या नवीन निर्णया मुळे विकास कामे स्पर्धेवर सुरु आहेत. त्यामुळे ठेकेदारांशी मिलीभगत करता येत नाही. याच मुळे राणेंच्या लोकांना तोटा होत आहे. तर हेच कारण विकास कामांवर त्यांनी टिका करण्यामागे असल्याचे वैभव नाईक यावेळी म्हणाले.शिवसेनेला फरक पड़त नाही!जयेंद्र रावराणे यांचा जास्तीत जास्त वेळ बुवा बाजीत जायचा . त्यामुळे त्यांना पक्ष तसेच समाज सेवा करायला वेळ मिळत नव्हता . याचसाठी आम्ही त्याना पक्षापासून लांब ठेवले होते. त्यांच्या पक्ष बदलण्यामुळे वैभववाडीत शिवसेनेला फरक पड़त नाही. असे एका प्रश्नाचे उत्तर देताना वैभव नाईक यांनी सांगितले.

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे