शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

सिंधुदुर्ग : मराठा आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून नाहक त्रास : हर्षद गावडे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 16:47 IST

चार मराठा कार्यकर्त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत आहे़ याकडे कणकवली न्यायालयाचे लक्ष आम्ही तक्रार अर्जाद्वारे वेधले आहे, अशी माहिती संशयित आरोपीचे वकील अ‍ॅड. हर्षद गावडे यांनी दिली.

ठळक मुद्देमराठा आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून नाहक त्रास : हर्षद गावडे यांचा आरोप न्यायालयात आरोपींच्यावतीने तक्रार

कणकवली : ओसरगांव ओवळीये तिठा प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या चार मराठा कार्यकर्त्यांना गेले सात दिवस पोलीस कोठडीत आंघोळीसाठी पाणी देण्यात आलेले नाही. त्यांच्या मुलभूत गरजा भागविण्याची पुरेशी व्यवस्था जाणिवपूर्वक करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत आहे़ याकडे कणकवली न्यायालयाचे लक्ष आम्ही तक्रार अर्जाद्वारे वेधले आहे, अशी माहिती संशयित आरोपीचे वकील अ‍ॅड. हर्षद गावडे यांनी दिली.कणकवली येथील मराठा समाज संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाई परब, बाबू राऊळ, गांवकर, राजू राणे आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते़यावेळी अ‍ॅड. हर्षद गावडे म्हणाले, बाळासाहेब सुर्यवंशी, आशितोष सावंत, रामचंद्र बोरगावे, तुकाराम लाड या चार मराठा कार्यकर्त्यांना पोलीस कोठडीत मिळालेली वागणूक निषेधार्ह आहे. ही बाब आम्ही न्यायालयाच्या लक्षात आणून दिली आहे. त्यानंतर न्यायालयाने संबधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

संशयित आरोपींच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्याचे काम पोलीस अधिकाºयांनी केले आहे. मराठा समाजाचे आंदोलक असल्यानेच पोलिसांनी संबधितांना नाहक त्रास दिलेला आहे. याबद्दल संबंधित प्रशासन आणि अधिकाऱ्यांविरोधात मराठा समाजाच्यावतीने लवकरच मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे.तसेच मराठा आंदोलकांना चुकीच्या पद्धतीने वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे अ‍ॅड. हर्षद गावडे यांनी यावेळी सांगितले.ते पुढे म्हणाले, सात दिवस आंघोळ न केल्याने मराठा बांधवांचे स्वास्थ्य बिघडले आहे. पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध न केल्यामुळे जर त्यांची प्रकृती खालावली तर त्याला पोलीसच जबाबदार असतील, असेही अ‍ॅड. गावडे यांनी यावेळी सांगितले.पाणी पुरवठा सहा महिने बंद!पोलीस कोठडीची इमारत उपकोषागार कार्यालयाच्या मालकीची आहे. मागील ६ महिन्यांपासून कोठडीच्या इमारतीत पाणीपुरवठा बंद आहे . त्यामुळे आम्हालाही अडचणी सहन कराव्या लागत आहेत. कोठडीतील आरोपींना नैसर्गिक विधीसाठी कस्टडी गार्ड पोलीस खांद्यावरून पाणी आणून देतात. याबाबत तहसीलदारांना कल्पना दिली आहे.

संशयित आरोपींना आंघोळीसाठी पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र, गार्डनी याबाबत कल्पना दिली नाही. तसेच पाणीपुरवठा सुरळीत करणे ही तहसीलदार आणि बांधकाम विभागाची जबाबदारी आहे. अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी दिली .

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणsindhudurgसिंधुदुर्ग