शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

सिंधुदुर्ग : मराठा आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून नाहक त्रास : हर्षद गावडे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 16:47 IST

चार मराठा कार्यकर्त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत आहे़ याकडे कणकवली न्यायालयाचे लक्ष आम्ही तक्रार अर्जाद्वारे वेधले आहे, अशी माहिती संशयित आरोपीचे वकील अ‍ॅड. हर्षद गावडे यांनी दिली.

ठळक मुद्देमराठा आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून नाहक त्रास : हर्षद गावडे यांचा आरोप न्यायालयात आरोपींच्यावतीने तक्रार

कणकवली : ओसरगांव ओवळीये तिठा प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या चार मराठा कार्यकर्त्यांना गेले सात दिवस पोलीस कोठडीत आंघोळीसाठी पाणी देण्यात आलेले नाही. त्यांच्या मुलभूत गरजा भागविण्याची पुरेशी व्यवस्था जाणिवपूर्वक करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत आहे़ याकडे कणकवली न्यायालयाचे लक्ष आम्ही तक्रार अर्जाद्वारे वेधले आहे, अशी माहिती संशयित आरोपीचे वकील अ‍ॅड. हर्षद गावडे यांनी दिली.कणकवली येथील मराठा समाज संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाई परब, बाबू राऊळ, गांवकर, राजू राणे आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते़यावेळी अ‍ॅड. हर्षद गावडे म्हणाले, बाळासाहेब सुर्यवंशी, आशितोष सावंत, रामचंद्र बोरगावे, तुकाराम लाड या चार मराठा कार्यकर्त्यांना पोलीस कोठडीत मिळालेली वागणूक निषेधार्ह आहे. ही बाब आम्ही न्यायालयाच्या लक्षात आणून दिली आहे. त्यानंतर न्यायालयाने संबधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

संशयित आरोपींच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्याचे काम पोलीस अधिकाºयांनी केले आहे. मराठा समाजाचे आंदोलक असल्यानेच पोलिसांनी संबधितांना नाहक त्रास दिलेला आहे. याबद्दल संबंधित प्रशासन आणि अधिकाऱ्यांविरोधात मराठा समाजाच्यावतीने लवकरच मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे.तसेच मराठा आंदोलकांना चुकीच्या पद्धतीने वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे अ‍ॅड. हर्षद गावडे यांनी यावेळी सांगितले.ते पुढे म्हणाले, सात दिवस आंघोळ न केल्याने मराठा बांधवांचे स्वास्थ्य बिघडले आहे. पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध न केल्यामुळे जर त्यांची प्रकृती खालावली तर त्याला पोलीसच जबाबदार असतील, असेही अ‍ॅड. गावडे यांनी यावेळी सांगितले.पाणी पुरवठा सहा महिने बंद!पोलीस कोठडीची इमारत उपकोषागार कार्यालयाच्या मालकीची आहे. मागील ६ महिन्यांपासून कोठडीच्या इमारतीत पाणीपुरवठा बंद आहे . त्यामुळे आम्हालाही अडचणी सहन कराव्या लागत आहेत. कोठडीतील आरोपींना नैसर्गिक विधीसाठी कस्टडी गार्ड पोलीस खांद्यावरून पाणी आणून देतात. याबाबत तहसीलदारांना कल्पना दिली आहे.

संशयित आरोपींना आंघोळीसाठी पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र, गार्डनी याबाबत कल्पना दिली नाही. तसेच पाणीपुरवठा सुरळीत करणे ही तहसीलदार आणि बांधकाम विभागाची जबाबदारी आहे. अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी दिली .

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणsindhudurgसिंधुदुर्ग