शहरं
Join us  
Trending Stories
1
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
2
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
3
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
4
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
5
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
6
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
7
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
8
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
9
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
10
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
11
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
12
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
13
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
14
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
15
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
16
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
17
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
18
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
19
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
20
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : नाटककाराने एकच बाजू लेखनात मांडू नये : प्रेमानंद गज्वी यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:20 IST

नाटककाराने भूमिकेची एकच बाजू आपल्या लेखनातून मांडू नये.तर सर्व समाज समजून घ्यायला हवा, असे मत अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या आपल्या प्रकट मुलाखतीच्या वेळी व्यक्त केले.

ठळक मुद्देनाटककाराने एकच बाजू लेखनात मांडू नये : प्रेमानंद गज्वी यांचे मतनाथ पै एकांकिका स्पर्धेवेळी कणकवली येथे प्रकट मुलाखत

कणकवली : माणसे आता जात आणि पोटजातीतही अडकून पडली आहेत. लेखकाने प्रश्न उपस्थित करण्यासाठी लिहायला हवे आणि प्रश्नांच्या बाजूनेच उभे राहायला हवे. नाटककाराने भूमिकेची एकच बाजू आपल्या लेखनातून मांडू नये.तर सर्व समाज समजून घ्यायला हवा, असे मत अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या आपल्या प्रकट मुलाखतीच्या वेळी व्यक्त केले.येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या एकेचाळिसाव्या बॅ.नाथ पै एकांकिका स्पर्धेच्यावेळी प्रा. डॉ. अनिल फराकटे यांनी घेतलेल्या या मुलाखतीच्या वेळी प्रेमानंद गज्वी यांनी आपला जीवन प्रवास उलगड़ला.यावेळी नाट्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते प्रेमानंद गज्वी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आचरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष वामन पंडित, ज्येष्ठ नाट्यसमीक्षक प्रा .अविनाश कोल्हे, अभिनेते प्रमोद माने उपस्थित होते.प्रेमानंद गज्वी म्हणाले, माझ्यावर बालपणापासून बुद्ध विचारांचे संस्कार झाले . त्या विचारातूनच मी पुढे नाटकाचा विचार करू लागलो. शाळेत असताना नाटकात मी भूमिका करायचो . परंतु पुढे मी कधी नाटक लिहीन असे मला त्यावेळी वाटले नव्हते. मात्र माझे पहिले लेखन महाविद्यालयाच्या मासिकात प्रसिद्ध झाले.

कविता , कथा अशा प्रकारचे लेखनही केले. पण ते कोणाला कधी दाखविले नाही. जेव्हा 'घोटभर पाणी 'ही पहिली एकांकिका लिहिली त्यावेळी बाबा आढावांची' एक गाव एक पाणवठा 'चळवळ सुरू होती. आंबेडकरांच्या चवदार पाण्याचा, रोहिणी नदीचा या एकांकिकेला संदर्भ आहे. या एकांकिकेपासूनच माझ्या लक्षात आले की, मी नाटकाच्या फॉर्म मधून चांगले लिहू शकतो.या एकांकिकेचे आजवर तीन हजार प्रयोग झाले आहेत. अशावेळी नाट्यचळवळ पुढे जाणे महत्त्वाचे असते. लेखन करताना पैसे मिळतील अशी आशा बाळगायची नाही. 'देव नवरी ' ही एकांकिका वर्तमानपत्रातील बातमीवरून मला सुचली.

पु.ल. देशपांडे यांनी या एकांकिकेमध्ये मांडलेल्या देवदासी परंपरे संदर्भात इथे असे घडू शकते. दुसरे काही नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. ही एकांकिका दिल्ली आकाशवाणीवर नभोनाट्यात प्रसारित होणार होती, मात्र तिचा शेवट बदलायला मी नकार दिल्याने ती तिथे सादर होऊ शकली नाही.मी सामाजिक व्यवस्थेचा विचार करतो आणि व्यामिश्र जगणे नाटकात मांडतो. मी कधीही कोणत्याही गटातटात राहिलो नाही. दलित नाट्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यावर मला नाटकवाले जयभीम वाला बोलू लागले. तर जय जय रघुवीर हे नाटक लिहिल्यावर काही ब्राह्मनानी मला विचारले तुला तुझ्या समाजाचे प्रश्न नाहीत का? मी मात्र सगळ्या समाजाचे प्रश्न माझे समजून हे जग सुंदर कसे करता येईल यासाठीच लिहितो.

'तन माजुरी' या नाटकाबद्दल अनेक डाव्या चळवळीवाल्यांना मी आपला लेखक वाटलो. पण मी अशा कुठल्या विचाराने नाटक लिहीत नाही.जगात 6800 जाती आहेत त्या सगळ्यांनी मला स्वीकारले तर आनंदच होईल. आजही देशात गांधी, आंबेडकरांनाच सर्वाधिक मानतात. गांधी-आंबेडकर अस्पृश्यता नष्ट होण्यासाठी झटत होते. पण ते एकत्र आले नाहीत. याचा शोध घेण्यासाठी मी गांधी-आंबेडकर नाटक लिहिले.मी गांधी , आंबेडकर यांच्यापैकी कुणाच्या बाजूने आहे, यापेक्षा मी प्रश्नांच्या बाजूने आहे हे मला महत्त्वाचे वाटते. लेखकाने प्रश्नांच्या बाजूने उभे राहताना सत्यासाठी भांडायला हवे आणि स्वतःच्या लेखनाची जबाबदारी स्वतः स्वीकारायला हवी.

लेखक लिहितो तेव्हापासूनच त्याला धोक्याला सामोरे जावे लागते. आता लेखक भूमिका फार घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. लेखकाने भूमिका घ्यायला हवी. भूमिका घेऊन जर जीव जात असेल तर बिघडलं कुठे? तो देण्याचीही तयारी लेखकाने ठेवावी असेही प्रेमानंद गज्वी यांनी यावेळी सांगितले. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकsindhudurgसिंधुदुर्ग